शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

आदर्श आमदार ग्रामयोजनेत संदिग्धता

By admin | Updated: May 25, 2015 00:37 IST

माहिती अस्पष्ट : तीन ग्रामपंचायतींची निवड कधी, केव्हा व निधी कसा मिळणार याचा उल्लेखच नाही

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने आदर्श आमदार ग्रामयोजना सुरू केली आहे. मात्र, या निकषात संदिग्धता असल्याचे जाणून येत आहे. २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श करण्याचा हेतू असला तरी आमदारांनी कोणत्या तारखेपर्यंत किंवा कोणत्या महिन्यापर्यंत गावांची निवड करावी. या उपक्रमासाठी नेमका किती निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, आदी माहिती या शासन निर्णयात नसल्याने संदिग्धता निर्माण झाली आहे.माहिती अस्पष्ट : तीन ग्रामपंचायतींची निवड कधी, केव्हा व निधी कसा मिळणार याचा उल्लेखच नाहीग्रामविकास खात्याकडून उपलब्ध शासन निर्णयानुसार प्रत्येक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातून २०१९ पर्यंत किमान तीन ग्रामपंचायती निवडून त्यांचा विकास करावयाचा आहे. विधानपरिषद आमदार व शहरी आमदारांना राज्यातील कोणतीही ग्रामपंचायत या उपक्रमासाठी निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असावी, आमदारांनी त्यांचे स्वत:चे गाव या उपक्रमासाठी निवडू नये, मतदारसंघाचा जरी काही भाग शहरी असला तरी या उपक्रमासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीची निवड करण्यात यावी आदी अटी या उपक्रमासाठी आमदारांना घालून दिल्या आहेत. असे असले तरी २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श करण्याचा हेतू आमदारांनी कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण करावा. तसेच या संबंधित गावांची निवड कोणत्या महिन्यापर्यंत करावी, याबरोबरच यासाठी आवश्यक असणारा शासन निधी किती उपलब्ध करून देण्यात येणार आहे? आणि यामध्ये जिल्हा परिषदेचे नेमके काय योगदान द्यावे. याबाबत कोणतीही माहिती या शासन निर्णयातून स्पष्ट होत नसल्याने या आदेशाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.याशिवाय आदर्श आमदार योजनेतून स्वच्छतेविषयी सवयी विकसित करणे, बालके व महिलांसाठी कुपोषणविषयी जागृती निर्माण करणे, सर्वांना किमान दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलध करून देणे, सामाजिक एकोपा, शांतताप्रिय सहजीवनासाठी वातावरण तयार करणे, गावातील गुन्हेगारी, बेकारी, लिंग भेदभाव आदी दूर करून युवक व स्वयंसहाय्यता समूहाचे ग्रामविकासासाठी योगदान घेणे आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच गावातील आर्थिक स्थैर्य उंचावण्यासाठी शेती सेवा दर्जा सुधारणे, पशुसंवर्धन पाणलोट विकास, लघु ग्रामोद्योग व बँक क्षेत्रातील विविध सेवा उपलब्ध करून देणे, युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, सुसज्ज ग्रामपंचायत उभारणे, उत्तम रस्ते, पूर्णवेळ वीज, अन्य सार्वजनिक सेवा निर्माण करणे, पर्यावरण समृद्धीसाठी वृक्षारोपण करणे, घनकचरा विल्हेवाट लावणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध शेतीसाठी फेरवापर करणे आदी उपक्रम या योजनेतून घेण्याचे निर्देश शासनाने घालून दिले आहेत.स्वतंत्र वेब पोर्टलची निर्मिती ?आदर्श आमदार ग्रामयोजनासाठी आमदारांनी निवडलेल्या गावांना विकासनिधी देण्यासाठी आमदार निधीस राज्य शासनाकडून जोड निधी देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या धर्तीवर आदर्श प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र वेब पोर्टल निर्मितीही करण्यात येत आहे. ग्रामविकास खात्यावर या योजनेची अंमलबजावणी सोपविण्यात आली आहे.