शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

By admin | Updated: July 17, 2017 00:01 IST

मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : मी अवैध मच्छिमारांचा कॅप्टन नसून, गोरगरीब जनतेचा कॅप्टन आहे. त्यामुळे माझ्यावर नाहक टीका करण्यापेक्षा आम्ही केलेल्या विकासकामांना वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून आशीर्वाद द्या, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात २७०० कोटींचा निधी आणल्याचा दावा केला.मंत्री केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गचा विकास हा झपाट्याने होत आहे. मी विकासाचे अनेक प्रकल्प घेऊन येत आहे. या कामाची लवकरच निविदा प्रकियाही होणार आहे; पण सर्व काही मी केले असे म्हणत नाही. मी व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चांदा ते बांदा योजना राज्यात राबवीत आहोत. या योजनेत चंद्रपूर व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचे श्रेय मला घेण्याची गरज नाही, असे सांगत जिल्ह्याचा विकास सर्वांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस नेते नारायण राणे यांनी माझ्यावर पहिली बालवाडी उभारा अशी टीका केली होती; पण माझ्या काळात जिल्हा परिषदेला ७० ते ८० कोटींचा निधी दिला आहे. हे सर्व पैसे पडून आहेत. त्याचा राणे यांनी अभ्यास करावा. त्यात किती बालवाड्या होतील हे बघावे, असे सांगितले. आतापर्यंत आपण मोठमोठी महाविद्यालये उभारली आणि इतरांना बालवाडीची स्वप्ने दाखविता. तुमची महाविद्यालये ही खासगी आहेत. तेथे सर्वसामान्य माणसांना प्रवेश घेताना लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळेच मी शासकीय महाविद्यालय जिल्ह्यात यावे अशी मागणी केली होती, असेही त्यांनी सांगितले. राणे यांनी अजून दहा खासगी महाविद्यालये उभारली तरी मी त्यांचे स्वागतच करेन, असे सांगत जिल्ह्यातील पहिले स्पर्धा परीक्षा सेंटर लवकरच सावंतवाडी येथे सुरू होणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी जाहीर केले.आमदार नीतेश राणे यांनी मला अवैध मच्छिमारांचा कॅप्टन असे म्हटले आहे; पण मी अवैध मच्छिमारांचा कॅप्टन नाही, तर गोरगरीब जनतेचा कॅप्टन आहे. ज्यांनी मच्छिमारांसाठी आतापर्यंत काहीच केले नाही, ते वाद उभा करीत आहेत. पण त्यांनी वाद उभा करताना मला यात नाहक ओढू नये. माझी भूमिका ही नेहमी परराज्यांतील मच्छिमारांच्या विरोधातील आहे. कर्नाटक व गोवा येथील ट्रॉलर्स आपल्या समुद्रात येऊन मच्छिमारी करतात. याविरोधात गस्ती नौका, अतिरिक्त पोलीस बळ हे मी स्वत: उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परराज्यांतील येणारे ट्रॉलर्स बंद झाले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मच्छिमारांना डिझेल तसेच भविष्यात जिल्ह्यातील ८०० बोटींना इंजिन देण्यात येणार आहे. मच्छिमारांचे प्रश्न आम्ही सोडविले. एवढी वर्षे राणे यांनी हे प्रश्न का सोडविले नाहीत? त्यांना सर्वसामान्यांविषयी आस्था नाही. ते फक्त राजकारण करतात, असा टोलाही त्यांनी यावेळी राणे यांना लगावला. पुढील महिन्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आम्ही आणलेल्या निधीतून विकासकामांची उद्घाटने होणार असून, या विकासकामांना वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून नारायण राणे यांनी आशीर्वाद द्यावेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २७०० कोटींचा निधी आणण्यात आला असून, काही विकासकामे निविदेच्या प्रकियेत आहेत. तर काही निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रकिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यातील १४०० कोटी रुपये फक्त रस्त्यासाठी देण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती काँग्रेस नेते नारायण राणे यांना देण्यात आली असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.शासकीय महाविद्यालये मागण्यात गैर काय ? काँग्रेस नेते नारायण राणे हे स्वत: महाविद्यालये उभारतात आणि दुसऱ्यांना मात्र बालवाडीची स्वप्ने दाखवितात. येथील गोरगरीब जनतेला खासगी महाविद्यालयाची फी झेपणार नाही, म्हणूनच आम्ही शासकीय महाविद्यालयाची मागणी केली आहे. त्यात गैर काय, असा सवाल करीत राणे यांच्याकडे नियोजन नसल्यानेच त्यांच्या सर्व योजना फसत गेल्या. त्यात ‘उत्तम स्टील’चाही समावेश करावा लागेल, असेही मंत्री केसरकर म्हणाले.