शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

कुडाळात चक्रीवादळ

By admin | Updated: July 10, 2016 23:58 IST

पावसाचा जोर : झाडांची पडझड; घरांचेही नुकसान; खारेपाटणमध्ये पूरसदृश स्थिती

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यात झालेल्या जोरदार चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे, तर कुडाळ येथील महामार्गावर काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती, तर वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. पावसामुळे खारेपाटण शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाबरोबरच चक्रीवादळाचा फटका कुडाळ तालुक्यातील बऱ्याच गावांना सहन करावा लागला. नांदगाव मधलीवाडी येथील दत्तमंदिर स्टॉपलगत रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एक म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला आलेल्या भरती व पुराच्या पाण्यामुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर पाणी हळूहळू कमी होऊ लागले. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलापासून जवळच हिवाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाची फांदी तुटून पडली, त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. (वार्ताहर) सिंधुदुर्गात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दोडामार्गमध्ये ६० मि.मी., सावंतवाडी ९५ मि.मी., कुडाळ ७५ मि.मी., वेंगुर्ले ८६.४० मि.मी., मालवण ५४ मि.मी., देवगड ३१ मि.मी., वैभववाडी ७९ मि.मी., तर कणकवली तालुक्यात ६८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. कणकवली तालुक्यात रविवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ४८ मि.मी. पाऊस झाला होता. वेंगुर्ले, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतही जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, पावसामुळे खूप मोठे नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत आपत्कालीन कक्षात झालेली नव्हती. मालवण बंदरात धोक्याचा तीन नंबरचा बावटा ४मालवणात दमदार पावसासह वादळी वाऱ्यांनी जोर पकडला आहे. समुद्रही चांगलाच खवळलेला आहे. शनिवारी बंदर विभागाने पुन्हा एकदा धोक्याचा तीन नंबर बावटा बंदरात लावला आहे. ४गेल्या १५ दिवसांत बंदरात धोक्याचा तीन नंबर बावटा तीन वेळा लावण्यात आला. मच्छिमारांनी मासेमारीस जाऊ नये, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे बंदर विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.