शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

कुडाळात चक्रीवादळ

By admin | Updated: July 10, 2016 23:58 IST

पावसाचा जोर : झाडांची पडझड; घरांचेही नुकसान; खारेपाटणमध्ये पूरसदृश स्थिती

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यात झालेल्या जोरदार चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे, तर कुडाळ येथील महामार्गावर काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती, तर वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. पावसामुळे खारेपाटण शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाबरोबरच चक्रीवादळाचा फटका कुडाळ तालुक्यातील बऱ्याच गावांना सहन करावा लागला. नांदगाव मधलीवाडी येथील दत्तमंदिर स्टॉपलगत रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एक म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला आलेल्या भरती व पुराच्या पाण्यामुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर पाणी हळूहळू कमी होऊ लागले. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलापासून जवळच हिवाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाची फांदी तुटून पडली, त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. (वार्ताहर) सिंधुदुर्गात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दोडामार्गमध्ये ६० मि.मी., सावंतवाडी ९५ मि.मी., कुडाळ ७५ मि.मी., वेंगुर्ले ८६.४० मि.मी., मालवण ५४ मि.मी., देवगड ३१ मि.मी., वैभववाडी ७९ मि.मी., तर कणकवली तालुक्यात ६८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. कणकवली तालुक्यात रविवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ४८ मि.मी. पाऊस झाला होता. वेंगुर्ले, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतही जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, पावसामुळे खूप मोठे नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत आपत्कालीन कक्षात झालेली नव्हती. मालवण बंदरात धोक्याचा तीन नंबरचा बावटा ४मालवणात दमदार पावसासह वादळी वाऱ्यांनी जोर पकडला आहे. समुद्रही चांगलाच खवळलेला आहे. शनिवारी बंदर विभागाने पुन्हा एकदा धोक्याचा तीन नंबर बावटा बंदरात लावला आहे. ४गेल्या १५ दिवसांत बंदरात धोक्याचा तीन नंबर बावटा तीन वेळा लावण्यात आला. मच्छिमारांनी मासेमारीस जाऊ नये, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे बंदर विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.