शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेकडो भाविक सातेरी चरणी नतमस्तक

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

वार्षिक जत्रोत्सव : मालवण तालुक्यातील बिळवस येथील जलमंदिर

चौके : मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या बारा वाड्यांची मूळ भूमिका मानल्या जाणाऱ्या बिळवसच्या जलमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणाऱ्या, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री देवी सातेरीचा आषाढ महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव शनिवारी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडला.निसग सौंदर्याने नटलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री देवी सातेरी मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे आहे असे जाणकार सांगतात. श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव एक दिवसाचा असल्याने देवीची ओटी भरण्यासाठी मसुरे व इतर गावातील शेकडो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु श्री देवी सातेरी देवालय ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त यांच्या सुनियोजनामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ होत होते.असा पार पडतो जत्रोत्सवबिळवसमधील प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमून आषाढातील जत्रेची तारीख ठरवितात. जत्रेदिवशी गावातील चाकरमानी, माहेरवाशिणी व देवीचे हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात. यात्रेदिवशी सकाळी देवीला नीळ घालतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून हा नीळ बनवला जातो. नंतर देवीला वस्त्रालंकार, मुखवटा घालून नेसविले जाते. त्यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला प्रत्येक घरातून नैवैद्य आणला जातो. मानाप्रमाणे धार्मिक विधी होऊन पूर्वरितीप्रमाणे गाऱ्हाणी व ओट्या भरण्यास प्रारंभ होतो. यावेळी भक्त दर्शन घेऊन नवस बोलतात व नवसफेड करतात. संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने भरून जातो. सायंकाळी देवीच्या समोर ठेवलेले मडके गावकर मंडळी घेऊन वाजत गाजत गांगोची राय येथे नेतात व त्याठिकाणी वाडी करून गाऱ्हाणे घालतात. पुन्हा ते मडके मंदिराकडे घेऊन येतात. ग्रामस्थांनी देवीसमोर ठेवलेला प्रसाद वेगळा करून दोन भाग देवीसमोर व एक भाग ताटात ठेवतात. त्यानंतर गाऱ्हाणे करून एक भाग मानकरी कुळकर यांना देतात व जमलेला दुसरा भाग जमलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. त्यानंतर देवीवरील वस्त्रे, दागिने उतरवून देवीच्या पेटाऱ्यात ठेवून तो पुन्हा वाजतगाजत नेऊन मानकऱ्यांकडे पोहोचवला जातो. जत्रेदिवशी रात्री मंदिरात कुणीही थांबत नाही. भाविकांनी कुठूनही बोललेला नवस किंवा मागणे देवी सातेरी पूर्ण करतेच अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या जत्रोत्सवासाठी ओट्या, खेळणी, हॉटेल तसेच खाजाची दुकाने थाटण्यात आली होती. शेकडो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन सातेरी चरणी नतमस्तक झाले. (वार्ताहर)