शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो भाविक सातेरी चरणी नतमस्तक

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

वार्षिक जत्रोत्सव : मालवण तालुक्यातील बिळवस येथील जलमंदिर

चौके : मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या बारा वाड्यांची मूळ भूमिका मानल्या जाणाऱ्या बिळवसच्या जलमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणाऱ्या, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री देवी सातेरीचा आषाढ महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव शनिवारी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडला.निसग सौंदर्याने नटलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री देवी सातेरी मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे आहे असे जाणकार सांगतात. श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव एक दिवसाचा असल्याने देवीची ओटी भरण्यासाठी मसुरे व इतर गावातील शेकडो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु श्री देवी सातेरी देवालय ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त यांच्या सुनियोजनामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ होत होते.असा पार पडतो जत्रोत्सवबिळवसमधील प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमून आषाढातील जत्रेची तारीख ठरवितात. जत्रेदिवशी गावातील चाकरमानी, माहेरवाशिणी व देवीचे हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात. यात्रेदिवशी सकाळी देवीला नीळ घालतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून हा नीळ बनवला जातो. नंतर देवीला वस्त्रालंकार, मुखवटा घालून नेसविले जाते. त्यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला प्रत्येक घरातून नैवैद्य आणला जातो. मानाप्रमाणे धार्मिक विधी होऊन पूर्वरितीप्रमाणे गाऱ्हाणी व ओट्या भरण्यास प्रारंभ होतो. यावेळी भक्त दर्शन घेऊन नवस बोलतात व नवसफेड करतात. संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने भरून जातो. सायंकाळी देवीच्या समोर ठेवलेले मडके गावकर मंडळी घेऊन वाजत गाजत गांगोची राय येथे नेतात व त्याठिकाणी वाडी करून गाऱ्हाणे घालतात. पुन्हा ते मडके मंदिराकडे घेऊन येतात. ग्रामस्थांनी देवीसमोर ठेवलेला प्रसाद वेगळा करून दोन भाग देवीसमोर व एक भाग ताटात ठेवतात. त्यानंतर गाऱ्हाणे करून एक भाग मानकरी कुळकर यांना देतात व जमलेला दुसरा भाग जमलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. त्यानंतर देवीवरील वस्त्रे, दागिने उतरवून देवीच्या पेटाऱ्यात ठेवून तो पुन्हा वाजतगाजत नेऊन मानकऱ्यांकडे पोहोचवला जातो. जत्रेदिवशी रात्री मंदिरात कुणीही थांबत नाही. भाविकांनी कुठूनही बोललेला नवस किंवा मागणे देवी सातेरी पूर्ण करतेच अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या जत्रोत्सवासाठी ओट्या, खेळणी, हॉटेल तसेच खाजाची दुकाने थाटण्यात आली होती. शेकडो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन सातेरी चरणी नतमस्तक झाले. (वार्ताहर)