शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शंभर वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 00:45 IST

राजन साळवींचे प्रयत्न : खरवते-धनगरवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

वाटूळ : मुंबई - गोवा महामार्गालगत डोंगरमाथ्यावर वसलेल्या खरवते - धनगरवाडीची पिण्याच्या पाण्याची शंभर वर्षांपासून कायम असलेली समस्या अखेर सुटली आहे. आमदार राजन साळवींच्या प्रयत्नांमुळे खरवते - धनगरवाडीत १५ जून रोजी नळपाणी योजना प्रत्यक्ष सुरु झाली आहे.मागील शंभर वर्षांपासून वाडीतील लोकांना डोंगर उतरून जंगलामध्ये असलेल्या नाल्याजवळून पाणी आणावे लागत होते. त्यासाठी पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना दररोज डोंगर उतरुन जंगलात यावे लागे. श्वापदांची भीती उराशी बाळगत पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष खरवतेतील धनगरवाडीला नित्याचा झाला होता. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना मदतीचा हात देऊ केला.राजापूरचे आमदार साळवी यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत वाडीसाठी विहीर व नळपाणी योजना राबवण्याचे अभिवचन दिले होते. या वचनाची पूर्तता झाली असून, १५ जून रोजी विहिरीतील पाणी नळयोजनेच्या सहाय्याने धनगरवाडीमध्ये पोहोचले असून, शंभर वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. सदर योजनेच्या पाठपुराव्यासाठी धनगर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश झोरे, जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे, सरपंच आग्रे, शेखर कुलकर्णी आदींनी मेहनत घेतली. जिल्हा धनगर समाज संघटनेकडून आमदार साळवी, तहसीलदार भालेकर, प्रांताधिकारी यांचे आभार मानले आहेत. (वार्ताहर)वणवण थांबली : ग्रामीण भागात पायपीटजिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खरवते येथील लोकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबण्यासाठी १०० वर्षांची वाट पाहावी लागली.योजना राबवा...पाण्याची समस्या सोडवण्यासाठी योजना राबवण्यात येते. थोड्याच दिवसात ती बंद पडते. त्यामुळे कोणतीही योजना सक्षमपणे राबवणे गरजेचे आहे.