शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रकल्पापुरतेच कांदळवन कसे नाही?

By admin | Updated: December 17, 2014 22:52 IST

काँग्रेसचा सवाल : राजन तेलींनी दाखवलेली कागदपत्रे खोटी

सावंतवाडी : कितीही खोटी कागदपत्रे आणा, आम्ही सत्य काय ते जनतेसमोर आणूच. तसेच जेटी परिसरात कांदळवन नाही म्हणून सांगता, मग प्रकल्पापुरतेच कांदळवन वाढले नाही का? आणि इतरत्र कांदळवन वाढले, हा कसा निसर्गाचा चमत्कार, असा सवाल काँग्रेसने केला. माजी आमदार राजन तेली यांनी मंगळवारी काँग्रेसवर केलेल्या टिकेला काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, काँग्रेस नेते संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष संजू परब यांनी उत्तर दिले. आम्ही गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्यांना आठ दिवसांची मुदत देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी काँग्रेसच्यावतीने प्रवक्ते डॉ. परूळेकर म्हणाले, माजी आमदार राजन तेली बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. भिंत काढणार नाही, असे म्हणणाऱ्या तेलींंना ती भिंत काढावीच लागेल. मेरीटाईमचा रस्ता म्हणता, मग त्यावर बांधकाम विभागाने आतापर्यंत खर्च कसा टाकला आणि जेटीपुरते फक्त कांदळवन आले नाही आणि इतर ठिकाणी कांदळवन कसे आले? आमच्याकडे पाच वर्षांपूर्वीचे उपग्रह नकाशे असून त्या ठिकाणचे पंचनामेही उपलब्ध आहेत, असेही यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर म्हणाले.आतापर्यंत दुसऱ्या कायद्याच्या गोष्टी सांगणाऱ्या तेलींना स्वत:साठी कायदा वापरावा लागला आणि वाचावा लागला, यातच सर्व काही आले, असे सांगत राणेंना नेहमी फसवून ही जेटी लादली. पण आता चक्क भितंच घातल्याने काँग्रेसने या प्रकरणात लक्ष घातले आहे, असे डॉ. परूळेकर यांनी स्पष्ट केले. संदीप कुडतरकर म्हणाले, प्रत्येकाची दिशाभूल करण्यात तेली माहीर आहेत. आम्ही आरोंदावासीयांच्या मागे असून त्यांनी उद्या जेटी हवी आहे, असे म्हटल्यास आम्ही आंदोलनातून माघारही घेऊ. पण त्यांनी आंदोलन केल्यास त्यांना पाठींबा देणे आमचा अधिकार आहे. तेलींनी कितीही खोटी कागदपत्रे सादर करावीत, त्यांना उत्तरे देण्याची आमची तयारी असून ज्या पातळीवर आरोंदा जेटीला विरोध करावा लागेल त्या पातळीवर विरोध करू. भले त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, असा इशाराही संदीप कुडतरकर यांनी दिला.निवडणुकीत आरोंदा गावात काँग्रेसला कमी मते पडली, असा जो आरोप आहे. त्यावर कुडतरकर म्हणाले, तेलींनी धनशक्तीच्या जीवावर ही निवडणूक लढविली. प्रत्येक देवळात जाऊन पैसे वाटले गेले. त्यामुळे मते पडणारच. परंतु आता जेटी हवी की नको, यासाठी मतदान घेतल्यास ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल, असा टोलाही यावेळी कुडतरकर यांनी हाणला. आरोंदा जेटीवरून माजी आमदार राजन तेली राजकारण करत आहेत. असा गंभीर आरोपही यावेळी संदीप कुडतरकर यांनी बोलताना केला. (प्रतिनिधी)तंटे करण्यासाठीच तेलींनी जेटी आणली : आचरेकरकाँग्रेस पक्ष जेटी बंद करू शकत नाही. नारायण राणेच जेटी बंद करू शकतात, असे मत आरोंदा गावचे सरपंच आत्माराम आचरेकर यांनी मांडले. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली आहे. जेटीची बांधकामे झाली आहेत, त्यांना ग्रामपंचायतने कधी ही परवानग्या दिल्या नाहीत. त्यामुळे तंटे निर्माण करण्यासाठीच राजन तेलींनी आरोंद्यात जेटी आणल्याचा आरोपही आचरेकर यांनी केला आहे. या पत्रकात आत्माराम आचरेकर यांनी म्हटले आहे की, राजन तेली यांनी नारायण राणे यांची जेटी असल्याचे भासवले. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध केला नाही. आतापर्यंत तीनदा नोकऱ्या देणार म्हणून मुलाखती घेतल्या, पण एकालाही नोकरी दिली नाही. तेली यांनी तंटे करण्यासाठीच आरोंदा येथे जेटी आणली असून काँग्रेसची जेटी असल्याचे भासवल्यानेच काँग्रेसला आरोंदा येथे मताधिक्य कमी पडल्याचे आचरेकर यांनी स्पष्ट केले आहे.