शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

सुरूंग स्फोटामुळे घरांना तडे

By admin | Updated: January 2, 2015 00:07 IST

सात वर्षे भुखंडाची प्रतीक्षा : विर्डी धरण प्रकल्प प्रशासनाविरोधात रण पेटणार

वैभव साळकर - दोडामार्ग --‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ असे धोरण असताना विर्डी धरण प्रकल्प प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. धरणाचे काम सुरू झाले. मात्र, १४ प्रकल्पबाधित कुटुंबांना अद्याप भूखंड वाटप करण्यात आले नाही. परिणामी प्रकल्पबाधितांना धरणाचे काम सुरू असताना करण्यात येणारे सुरूंग स्फोट व मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी धुळ याचा सामना करावा लागत आहे. गेली सात वर्षे येथील नागरिक भुखंडाच्या प्रतीक्षेत आहेत.नोव्हेंबर २00७ पासून विर्डी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. ४३ कोटींचा असलेल्या या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे चार कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. विर्डीतील १४ पेक्षा अधिक कुटुंबे विर्डी प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. नोव्हेंबर २00७ पासून प्रत्यक्षरित्या काम सुरू झाले. गेल्या सात वर्षात मुख्य विर्डी धरणाचे काम निम्मे पूर्ण झाले आहे. धरणाचे काम सुरू करताना घरांचे संपादन झाले नाही. गेली सात वर्षे त्यासाठी प्रकल्पग्रस्त शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत. मात्र, शासनाने त्यांच्या या महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. प्रकल्पबाधित कु टुंबाना पर्यायी जमीन, प्रकल्पग्रस्त दाखले, भूखंड वाटप, घरटी एकाला शासकीय नोकरी आदी मागण्या शासनाने तत्काळ पूर्ण कराव्यात, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. विर्डी पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाने विर्डी धरणाचे काम पुन्हा एकदा वेगाने सुरू केले आहे. एका ठिकाणी प्रकल्पासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने विर्डी प्रकल्पाला चालना मिळणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी निधी उपलब्ध करूनही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनाने अद्यापही दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा विर्डी प्रकल्प प्रशासन विरोधात प्रकल्पग्रस्त असे रण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने तेथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी पांडुरंग विठ्ठल गवस, विष्णु सातु गवस, महादेव साळु गवस, भिवा रामा गवस, लक्ष्मण कृष्णा गवस, अर्जुन कृष्णा गवस, विश्वनाथ तुकाराम गवस, नामदेव साळु गवस, पांडुरंग साळु गवस, भिकाजी सोमा गवस, संदीप वसंत चारी, दशरथ गुणाजी चारी, साळुबाई अर्जुन गवस, नामदेव गोपाळ गवस व वसंत महादेव गवस हे मुळ जमिनबाधित असून आता ही कुटुंबसंख्या साठपर्यंत पोहोचली आहे. नव्या नियमाचा फटकाबाधित प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नव्या नियमाचा फटका बसला आहे. पूर्वी शेतीची जमीन व घर या दोन्हींचे मूल्यांकन केले जायचे पण आता या दोन्हीत ज्या मूल्यांकनाची रक्कम जास्त होईल तेच भरपाई देण्याचे ठरले.याचा फटका बसला असून पूर्वीच्या निकषानुसार भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.घरे बांधायची कधी ?येथील प्रकल्पग्रस्तांची दोन दिवसांपूर्वी विर्डी येथील सातेरी मंडपात प्रकल्प अधिकाऱ्यांसह बैठक झाली. यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी आपल्या भूमिका मांडल्या. त्यानंतर मे महिन्यात भूखंड वाटप करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण त्यानंतर जूनमध्ये पावसाळा येतो मग घरे बांधायची कधी आणि कशी? हा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना आहे.