शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

घरपट्टी वसुलीत सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

By admin | Updated: May 12, 2016 23:59 IST

कमलाकर रणदिवे : जिल्हा परिषदेला साडेतीन कोटींचा फायदा

सिंधुदुर्गनगरी : घरपट्टी वसुली संदर्भातील सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेला साडेतीन कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. १२ कोटी ७९ लाख एवढ्या घरपट्टीपैकी मार्चअखेर ५ कोटी ४३ लाख एवढी वसुली झाली आहे. घरपट्टी वसुलीचे शासनाचे परिपत्रक आल्यानंतर शेवटच्या १० दिवसांत ही वसुली करण्यात आली असून, घरपट्टी वसुलीत सिंधुदुर्ग महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.पूर्वापार चालत असलेल्या चौरस फुटावरील घरपट्टी आकारणीला शासनाने फाटा देत आता नव्याने रेडीरेकनरनुसार म्हणजेच घराच्या मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. यावर कोणाच्या हरकती अगर आक्षेप असतील तर विहीत मुदतीत शासनाकडे पाठविण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्यानुसार सिंधुदुर्गातील जनतेने शासनाच्या या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला होता. तसे म्हणणेही शासनाला कळविले होते. आक्षेपाच्या बाबतीतही सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या नंबरवर होता.दरम्यान, यानंतरही शासनाने घराच्या मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी केली जाणार असल्याचे निश्चित करत त्या अनुषंगाने घरपट्टी वसूल करावी, असे आदेश देण्यात आले.या संदर्भात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांना विचारले असता ते म्हणाले, घरपट्टी वसुली ही शासनाच्या सुधारित निर्णयानुसार म्हणजे रेडीरेकनरनुसार होणार आहे. या निर्णयामुळे गावातील जुन्या घरांची घरपट्टी कमी, तर शहरानजीक घरांची घरपट्टी वाढली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात तब्बल साडेतीन कोटी रुपयांची वाढ होणार आहे. घरपट्टी वसुलीसंदर्भात शासनाचे उशिराने परिपत्रक आल्याने आर्थिक वर्ष संपायला दहा दिवस असताना ग्रामपंचायत विभागाने तब्बल ५ कोटी ४३ लाखांची घरपट्टी वसुली केली आहे. त्याची टक्केवारी ५८ एवढी आहे. या कामगिरीमुळे सिंधुदुर्ग राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे. उर्वरित घरपट्टी टप्प्याटप्प्याने १०० टक्के वसूल केली जाणार असल्याचेही रणदिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभागही अग्रेसरपाणीपट्टी वसुलीतही जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात ५ कोटी १९ लाख एवढी पाणीपट्टी आकारणी निश्चित करण्यात आली होती. त्याची पूर्तता करताना ५ कोटी ४३ लाख एवढी वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण १०७ टक्के राहिले आहे.