शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आशा’ गटप्रवर्तकांनी आंदोलन छेडले

By admin | Updated: October 13, 2016 23:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अभियानावरील निधी दुप्पट करण्याची मागणी

ओरोस : राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, या अभियानावरील निधी दुप्पट करा, ‘आशा’ गटपर्वतकांना आरोग्य सेवक म्हणून सेवेत कायम करा. ‘आशा’नी रजिस्टर भरावयाचे नसून ते सिस्टरांनी भरावयाचे आहे. आशांना १० हजार, गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये वेतन द्या. यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा आशा वर्कर्स युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन छेडले. राष्ट्रीय ग्रामीण अभियानाची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत आहे. त्यानंतर हे अभियान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील लाखो कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. या अभियानातील आशांना दरमहा १० हजार रुपये मिळालेच पाहिजेत अशा विविध घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे उपाध्यक्ष कॉ. सुभाष निकम, सहसचिव कॉ. विजयाराणी पाटील, जिल्हाध्यक्षा अर्चना धुरी, सुनिता पवार यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो आशा कर्मचारी उपस्थित होत्या. २००५ पूर्वी भारतात माता व बालमृत्यूचे प्रमाण खूपच होते. त्याची गंभीर दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेत भारताला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यास भाग पाडले. या अंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रनिहाय आशा व गटप्रवर्तकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या योगदानामुळे माता व बालमृत्यू दरात तुलनात्मक घट झाली. मात्र एवढे चांगले काम करणाऱ्या आशांचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मार्च २०१७ संपुष्टात येत आहे. त्यानंतरही अभियान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियानांतर्गत काम करणाऱ्या देशातील लाखो आशा गटप्रवर्तक बेरोजगार होणार आहेत. जनहितासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कायमस्वरुपी करुन आरोग्य सेवेचा दर्जा वाढवावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स युनियनच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. २००८ साली आशांना मासिक सभेचा भत्ता १५० रुपये व त्रैमासिक सभेचा भत्ता ७५ रुपये दिला जात होता. २००८ ते २०१६ या आठ वर्षात महागाई तिप्पट वाढली. मात्र आशा कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात १ रुपयाचीही वाढ झालेली नाही. शासनाच्या या उदासीन धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. या सर्व मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात मोठे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. (वार्ताहर) प्रमुख मागण्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कायम करावे. अभियानातील निधीत दुप्पट वाढ करावी. आशा-गटप्रवर्तक-अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी. आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य सेवक म्हणूून शासन सेवेत कायम करावे. इंडियन लेबर कौन्सिलच्या शिफारसी त्वरीत अंमलात आणाव्यात. कामगार कायद्यातील कामगार विरोधी तरतुदी रद्द कराव्यात व सध्याच्या कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी.