शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटीच्या जंगलात खेकडा प्रकल्पाची आशा

By admin | Updated: August 18, 2015 22:59 IST

बाणकोट ते दाभोळ : खेकडा संवर्धनातून मिळणार रोजगाराच्या संधी

शिवाजी गोरे -दापोली  समुद्र किनाऱ्यावरील खारफुटी निसर्गाचे वरदान असून, खारफुटीमुळे समुद्राचे आक्रमण रोखले जाऊन अनेक जीवजंतूंच्या उत्पत्तीत वाढ होते. अलिकडच्या काळात काही ठिकाणी समुद्राच्या पाण्याने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची भातशेती नष्ट होऊन खारफुटीची जंगले वाढली आहेत. अशा जंगलांचा वापर करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून, बाणकोट ते दाभोळ १०० किलोमीटरच्या गावात ठिकठिकाणी खेकडा संवर्धन प्रकल्प राबवून खारफुटीच्या संवर्धनाबरोबरच खेकडा प्रकल्प मार्गी लागणार आहे.भारत सरकारच्या कांदळवन विभागामार्फत वन विभागाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दाभोळ ते बाणकोट दरम्यानच्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन चिखलातील खेकडा संवर्धन, खारफुटीतील मधुमखी पालन, समुद्र वनस्पती प्रकल्प राबवण्यात येणार असून, या प्रकल्पातून येत्या पाच वर्षात ५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सुरुवातीच्या काळात सरकारी जागेत हा पायलट प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. स्थानिकांना या प्रकल्पाद्वारे ट्रेनिंग, मार्गदर्शन शिबिर, प्रात्यक्षिके देण्यात येणार आहेत. भारतामध्ये साबण व टुथपेस्ट बनवणाऱ्या काही कंपन्या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. अशा प्रकारची वनस्पती समुद्र किनाऱ्यावरील खारफुटीच्या जंगलात आढळून येते. समुद्र वनस्पतीचा वापर अनेक कंपन्या करु लागल्या आहेत. काही गावांमध्ये परसबाग उद्ध्वस्त होऊन त्या ठिकाणी खारफुटीने जागा घेतली आहे. मात्र, खारफुटी तोडण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याचे होणारे नुकसान लक्षात घेता त्या शेतकऱ्याना पर्यायी उद्योग उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. खारफुटीचे संवर्धन व पर्यायी शेती हा उपाय शेतकऱ्यापुढे राहिल्यास शेतकऱ्याला खारफुटीच्या जंगलातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्थानिकांच्या रोजगाराचा व पर्यावरण रक्षणाचा विचार करुन समुद्र किनाऱ्यावरील गावात खेकडा, मधुमखी पालन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याकरिता बाणकोट, केळशी, आंजर्ले, दाभोळ, आडे, उटंबर या गावातील ग्रामसभांना भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. दाभोळ ते बाणकोट या गावातील समुद्र किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांचे शंकासमाधान करण्यात येत असून, आंजर्ले, केळशी, वेळास, बाण्कोट, वेसवी या गावांतील ग्रामसभेत या प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा प्रकल्प अधिकाऱ्याने दिले असून ग्रामसभेत या प्रकल्पाबद्दल एकमत होऊन स्थानिकांनी संपूर्ण सहकार्य करण्याचा ठरावसुद्धा ग्रामसभेत केला. आंजर्ले ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन ग्रामस्थांचे समाधान करण्यात आले. खेकडा प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळणार असून, ६०० ते १५०० ग्रॅम वजन सहा ते आठ महिन्यात होते. याची किंमत सुमारे १ हजार ते १२०० रुपये असणार आहे. या प्रकल्पातून महिला बचतगट, तरुण, सुशिक्षित बेकार स्त्री, पुरुष यांना रोजगार मिळणार आहे. शेतकऱ्याच्या खासगी शेतीत खारफुटीने आक्रमण केल्यामुळे शेतीपासून वंचित होण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. खारफुटीने शेती नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. परंतु या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पामुळे शेतीतसुद्धा हा प्रकल्प राबविण्यास पुढे येतील. भविष्यात स्थानिकांना याचा फायदा होईल.- राजेश जैन,प्रगतशील शेतकरी, आंजर्ले