शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मुळदेत घर भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Updated: June 2, 2016 00:39 IST

अनर्थ टळला : साहित्य खाक, लाखो रुपयांची हानी

कुडाळ : तालुक्यातील मुळदे-मधलीवाडी येथील सीताराम पालव यांच्या घराला बुधवारी भरदुपारी आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. यावेळी घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, पावसाच्या तोंडावर संपूर्ण घराचे छप्पर व घरातील सर्व साहित्य जळून गेल्याने पालव कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. बुधवारी मुळदे येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात संप्रोक्षण विधी व धार्मिक कार्यक्रम असल्याने सीताराम पालव व त्यांची पत्नी मंदिरात गेली होती, तर त्यांची दोन्ही मुले शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे त्यांच्या घरी कोणीच नव्हते. दरम्यान, दुपारी त्यांच्या बंद असलेल्या घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मंदिराकडे जमलेल्या ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिल्यानंतर ग्रामस्थांनी पालव यांच्या घरी धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण घराने पेट घेतला होता. तेथून जाणाऱ्या रिक्षाचालकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. पालव यांच्या घराच्या मागच्या बाजूला आगीचा बंब असून, त्याच्या बाजूलाच लाकडे, शेणी, आदी साहित्य ठेवले होते. त्यामुळे काही क्षणातच आगीचा मोठा भडका उडून छपराचे पत्रेही फुटले. आग लागल्याची घटना कळताच पालव यांच्या घरी जमलेल्या ग्रामस्थांनी पंपाचे आणि तेथीलच बंटी तुळसकर यांच्या टँकरच्या साहाय्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, भरदुपारची वेळ असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. (प्रतिनिधी) अन् छप्पर कोसळले भरदुपारी लागलेल्या या आगीने छपराचे सर्व वासे, रिपा भस्मसात झाल्या. यामुळे काही क्षणातच घराचे संपूर्ण छप्पर खाली कोसळले. घटनेची माहिती कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. काही क्षणातच अग्निशामक दलाने बंबासहित घटनास्थळी दाखल होत योग्य नियोजन करून आगीवर नियंत्रण मिळविले. ग्रामस्थांचे प्रसंगावधान आगीची तीव्रता लक्षात येताच प्रसंगावधान राखत काही ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नाने घरात घुसून गॅस सिलिंडर तसेच हाताला मिळेल ते महत्त्वाचे साहित्य बाहेर काढले.