शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

प्रचाराची ‘घरघर’; विजयाची हुरहूर

By admin | Updated: October 27, 2015 00:13 IST

रत्नागिरी नगर परिषद : चुरशीच्या झुंजीत मतांचा जोगवा--रणसंग्राम

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीला आता अवघे चार दिवस उरले आहेत. सेना-राष्ट्रवादीतील या चुरशीच्या झुंजीत दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. प्रचाराची ही ‘घरघर’ सुरू असतानाच कोणत्याही पक्षाला कुठे काय होईल, कोण निवडून येईल, आपण किती पाण्यात आहोत, याचा थांगपत्ताही मतदारांनी लागू दिलेला नाही. त्यामुळे विजयाबाबत ‘हुरहूर’ निर्माण झाली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात चारही जागा राष्ट्रवादीलाच मिळतील, असे वातावरण निर्माण करण्यात उमेश शेट्ये यशस्वी झाले. मात्र, त्यानंतर शिवसेनाही पेटून उठली. प्रचाराचे रांगडे तंत्र अवलंबत प्रत्येक घरी आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांनी भेट देऊन मतदारांना विश्वासात घेण्याचा, विकासकामांबाबत आश्वासने देण्याचा झपाटाच सुरू केला. त्यातच माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उमेश शेट्येंविरोधात आरोपांच्या तोफा डागल्याने शेट्ये यांच्या प्रचारावर काहीसा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतदानाला अवघे चार दिवस उरलेले असताना काय होणार, याबाबतचे वातावरण संदिग्ध असून, कोणालाही या पोटनिवडणुकीत निर्भेळ यश मिळेल, असे वातावरण सध्यातरी नाही. उमेश शेट्ये यांचा उद्देश साध्य न झाल्यास त्यांच्या २०१६ व २०१९ च्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार काय? या प्रश्नांबरोबरच उमेश शेट्ये यांच्याबाबतच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)२०१६ ची तयारी?उमेश शेट्ये यांना निवडणुकीत रोखले नाही तर २०१६मधील पालिकेच्या निवडणुकीत त्यांचे वारू रोखणे कठीण होणार असल्याची भीती सेनेलाही वाटत आहे. शेट्येंना रोखून राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याची सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. भाजप, मनसे चिडीचूप?१ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचे मतदान होणार असतानाही या निवडणुकीत चारही उमेदवार उभे करणाऱ्या भाजपच्या हालचाली एकदम संथ आहेत. मनसेने दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये शांतता आहे. भाजप नेते, उमेदवार गुपचूप प्रचार करीत असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१६च्या सार्वत्रिक निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीच मनसेकडून ही निवडणूक दोन जागांवर लढविली जात असल्याचीही चर्चा आहे. रिक्षातून विनापरवाना प्रचार?अखेरच्या टप्प्यात काही उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेचे नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. कोणतीही परवानगी न घेताच रिक्षांतून प्रचार केला जात असून, या रिक्षांना प्रचार फलकही चिकटविण्यात आल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून परवानगी न घेता प्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अशा संशयित रिक्षांची पाहणीही सुरू असल्याचे सांगण्यात आले.