शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

प्रचाराची ‘घरघर’; विजयाची हुरहूर

By admin | Updated: October 27, 2015 00:13 IST

रत्नागिरी नगर परिषद : चुरशीच्या झुंजीत मतांचा जोगवा--रणसंग्राम

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीला आता अवघे चार दिवस उरले आहेत. सेना-राष्ट्रवादीतील या चुरशीच्या झुंजीत दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. प्रचाराची ही ‘घरघर’ सुरू असतानाच कोणत्याही पक्षाला कुठे काय होईल, कोण निवडून येईल, आपण किती पाण्यात आहोत, याचा थांगपत्ताही मतदारांनी लागू दिलेला नाही. त्यामुळे विजयाबाबत ‘हुरहूर’ निर्माण झाली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात चारही जागा राष्ट्रवादीलाच मिळतील, असे वातावरण निर्माण करण्यात उमेश शेट्ये यशस्वी झाले. मात्र, त्यानंतर शिवसेनाही पेटून उठली. प्रचाराचे रांगडे तंत्र अवलंबत प्रत्येक घरी आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांनी भेट देऊन मतदारांना विश्वासात घेण्याचा, विकासकामांबाबत आश्वासने देण्याचा झपाटाच सुरू केला. त्यातच माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उमेश शेट्येंविरोधात आरोपांच्या तोफा डागल्याने शेट्ये यांच्या प्रचारावर काहीसा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतदानाला अवघे चार दिवस उरलेले असताना काय होणार, याबाबतचे वातावरण संदिग्ध असून, कोणालाही या पोटनिवडणुकीत निर्भेळ यश मिळेल, असे वातावरण सध्यातरी नाही. उमेश शेट्ये यांचा उद्देश साध्य न झाल्यास त्यांच्या २०१६ व २०१९ च्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार काय? या प्रश्नांबरोबरच उमेश शेट्ये यांच्याबाबतच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)२०१६ ची तयारी?उमेश शेट्ये यांना निवडणुकीत रोखले नाही तर २०१६मधील पालिकेच्या निवडणुकीत त्यांचे वारू रोखणे कठीण होणार असल्याची भीती सेनेलाही वाटत आहे. शेट्येंना रोखून राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याची सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. भाजप, मनसे चिडीचूप?१ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचे मतदान होणार असतानाही या निवडणुकीत चारही उमेदवार उभे करणाऱ्या भाजपच्या हालचाली एकदम संथ आहेत. मनसेने दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये शांतता आहे. भाजप नेते, उमेदवार गुपचूप प्रचार करीत असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१६च्या सार्वत्रिक निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीच मनसेकडून ही निवडणूक दोन जागांवर लढविली जात असल्याचीही चर्चा आहे. रिक्षातून विनापरवाना प्रचार?अखेरच्या टप्प्यात काही उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेचे नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. कोणतीही परवानगी न घेताच रिक्षांतून प्रचार केला जात असून, या रिक्षांना प्रचार फलकही चिकटविण्यात आल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून परवानगी न घेता प्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अशा संशयित रिक्षांची पाहणीही सुरू असल्याचे सांगण्यात आले.