शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

हिंदुराज मित्रमंडळाने दहीहंडी केली रद्द

By admin | Updated: August 12, 2014 23:23 IST

न्यायालयाच्या आदेशाचा मान : वाचलेल्या रकमेतून गरीब भाविकांना तीर्थयात्रा...

खेड : उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा मान राखीत खेडच्या हिंदुराज मित्रमंडळाने यावर्षी दहीहंडी न बांधण्याचा निर्णय घेतला आहे़ याच पैशांतून तालुक्यातील भाविकांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या मंडळाने घेतला असून, अनेक दहीहंडी उत्सव मंडळांना आदर्श घालून दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखण्याच्या दृष्टीनेच हे पाऊल आपण उचलले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सागितले़ मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान दोन बालकांचा पडून मृत्यू झाला. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून, यावर्षी दहीहंडीवर निर्बंध आणले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील काही मंडळांनी दहीहंडी उत्सवच रद्द केला आहे तर काही मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. यंदा प्रथमच या उत्सवावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.दरम्यान, केवळ निर्बंधांच्या अधीन राहून नव्हे; तर सामाजिक भान राखत हिंदुराज मित्रमंडळाने समाजासमोर आदर्श ठेवणारा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने खेडमधील हिंदुराज मित्रमंडळाने हा उत्सवच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवासाठी येणारा खर्च सामाजिक उपक्रमासाठी खर्ची घालण्याचे मंडळाने ठरवले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गरीब भाविकांना तीर्थयात्रा करण्यासाठी आर्थिक मदत या खर्चातून केली जाणार आहे.खेडमध्ये गेली अनेक वर्षे ंिहंदुराज मित्रमंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहे़ या मंडळाच्या विविध उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)