शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुराज मित्रमंडळाने दहीहंडी केली रद्द

By admin | Updated: August 12, 2014 23:23 IST

न्यायालयाच्या आदेशाचा मान : वाचलेल्या रकमेतून गरीब भाविकांना तीर्थयात्रा...

खेड : उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा मान राखीत खेडच्या हिंदुराज मित्रमंडळाने यावर्षी दहीहंडी न बांधण्याचा निर्णय घेतला आहे़ याच पैशांतून तालुक्यातील भाविकांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या मंडळाने घेतला असून, अनेक दहीहंडी उत्सव मंडळांना आदर्श घालून दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखण्याच्या दृष्टीनेच हे पाऊल आपण उचलले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सागितले़ मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान दोन बालकांचा पडून मृत्यू झाला. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून, यावर्षी दहीहंडीवर निर्बंध आणले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील काही मंडळांनी दहीहंडी उत्सवच रद्द केला आहे तर काही मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. यंदा प्रथमच या उत्सवावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.दरम्यान, केवळ निर्बंधांच्या अधीन राहून नव्हे; तर सामाजिक भान राखत हिंदुराज मित्रमंडळाने समाजासमोर आदर्श ठेवणारा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने खेडमधील हिंदुराज मित्रमंडळाने हा उत्सवच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवासाठी येणारा खर्च सामाजिक उपक्रमासाठी खर्ची घालण्याचे मंडळाने ठरवले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गरीब भाविकांना तीर्थयात्रा करण्यासाठी आर्थिक मदत या खर्चातून केली जाणार आहे.खेडमध्ये गेली अनेक वर्षे ंिहंदुराज मित्रमंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहे़ या मंडळाच्या विविध उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)