शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळेच महामार्गाचे काम

By admin | Updated: February 1, 2016 00:42 IST

नारायण राणे : आंबेगाव येथे मंदिराचा जीर्णोद्धार

सावंतवाडी : कोकणचा खरोखरच विकास करायचा असेल, तर कोकणात रेल्वे वर्कशॉप, इंजिनियरिंग, पॉवर प्रोजेक्टचे प्रकल्प आणा. मात्र, कोकणात अणुऊर्जा केमिकलसारखे प्रकल्प आणून कोकण अधोगतीकडे नेण्याचा युती सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला. इंदापूर ते झाराप महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी काँग्रेसनेच पाठपुरावा केला. आता भाजप फक्त भूमिपूजन करून ठेकेदार नेमण्याचे काम करेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आंबेगाव येथे श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिर जीर्णोध्दार भूमिपूजन कार्यक्रम सोहळा पार पडला. या मंदिराचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, आंबेगाव माजी सरपंच वासुदेव परब, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, रविंद्र मडगावकर, प्रमोद गावडे, राजन भगत आदी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, जेवढे आपण देवाला महत्त्व देतो, तेवढेच महत्त्व शिक्षणालाही द्या. आजच्या युगात मुलांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उद्याच्या लढायाही संगणकानेच होतील, एवढी क्रांती आजच्या काळात संगणकांनी केली आहे. यामुळे या देवळाच्या बाजूला संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे, यासाठी आपण आवश्यक ती मदत करू, असे सांगितले. योग्य वेळेत मुलांना योग्य ते ज्ञान दिले, तर कर्तृत्ववान नागरिक उद्याच्या काळात संबोधले जातील. जिल्ह्यात विकासालाही खिळ बसली असून, शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये कपातीचे धोरण सरकारने अवलंबल्याने शिक्षणाचाही दर्जा खालावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री या पदाची शान गेली असून, नियोजन बैठकीतून उठून जाणारा कधी पालकमंत्री असू शकतो का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही जिल्ह्याचा विकास करताना स्वार्थ ठेवला नाही. त्यामुळे आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्याकडे येतात. उद्योगमंत्री असताना अनेकांना रोजगार दिला. पण युती सरकार आले आणि अच्छे दिनासाठी आम्हाला पंचांग घेऊन बसावे लागते. तरीही यांचे अच्छे दिन येत नाहीत, अशी कोपरखळी भाजपला मारली. डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी युती शासनावर सडकून टीका केली. पालकमंत्री घोषणा करतात, पण प्रत्यक्षात काय करीत नाहीत. म्हणून जनतेने आता सावध व्हावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. सल्लागार समितीचे अध्यक्ष वासुदेव परब यांनी, गावाच्या विकासासाठी राणे यांच्या कारकिर्दीत कोट्यवधी रूपयांची कामे झाली असल्याचे सांगितले. (वार्ताहर) असा राणे होणे नाही मी कधीही कोणाच्या टक्केवारीत नाही. माझ्यावर कसला आरोप नाही, मी कुणाकडे जेवतही नाही. मग माझ्या विरोधात वातावरण का निर्माण केले जाते, असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणे यांनी करीत जिल्ह्यात माझ्यासारखे काम कोणी केले नाही आणि कोण करणारही नाही, असा नारायण राणे पुन्हा होणे नाही, असे भावोद्गार राणे यांनी यावेळी काढले.