शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महामार्गाचे काम शहर विकासाच्या दृष्टीने व्हावे

By admin | Updated: May 19, 2015 00:27 IST

कुडाळात अधिकारी, ग्रामस्थांची बैठक : आवश्यक त्या सुधारणा सूचविल्या

कुडाळ : कुडाळ हे जिल्ह्याचे सर्वात महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी आवश्यक असणारा महामार्ग येथील शहराच्या विकासाच्यादृष्टीने व्हावा, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती कुडाळवासीयांनी महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिली. तसेच कुडाळ तालुक्यातील चौपदरीकरणाच्या महामार्गासंदर्भात आवश्यक त्या सुधारणाही सांगितल्या. कुडाळ ग्रामस्थांनी कुडाळ तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या महामार्गासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक सोमवारी कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण, आर. पी. धुमाळे या अधिकाऱ्यांसह प्रसाद रेगे, राजू राऊळ, बंड्या सावंत, हेमंत कुडाळकर, संतोष शिरसाट, सत्यवान कांबळी, नीलेश तेंडोलकर, अमृत सामंत, राजन नाईक, सत्यवान कांबळी, बबन परब तसेच कुडाळ शहरातील व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण म्हणाले, कुडाळ तालुक्यातील कसाल ते झाराप याठिकाणी चौपदरीकरणाचा रस्ता होत आहे. यामध्ये कसाल येथे शून्य पॉर्इंटचा रस्ता, तर ओरोस तिठा येथे ब्लॉकवेल बसविण्यात येणार आहे. कुडाळ येथील शहराचा विचार करता भंगसाळ नदीवरील पूल हे सध्याच्या उंचीपेक्षा चार मीटर अधिक उंच होणार आहे. तसेच शहरामध्ये गाड्या येण्या- जाण्यासाठी एसटी डेपोसमोरील महामार्गावर शून्य पॉर्इंटचा रस्ता ठेवण्यात येणार असून, एमआयडीसी येथे वाहने नेण्या-जाण्याकरिताही पॉर्इंटचा रस्ता, तर हॉटेल आरएसएन येथे बॉक्सवेल बसविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच साळगाव येथे पॉर्इंटचा रस्ता ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हायवेमुळे कुडाळ शहराला एक वेगळे महत्त्व मिळावे, कुडाळ हे महत्त्वाचे ठिकाण व्हावे, याकरिता कुडाळ येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार आरएसएन हॉटेलकडे वाहनांसाठी भुयारी मार्ग ठेवावा. तसेच राज हॉटेलकडील एमआयडीसी मार्गात विमानतळावर व एमआयडीसीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावर शून्य पॉर्इंटचा रस्ता व्हावा व तिथे सर्कल व्हावे, अशी मागणी केली. कुडाळ येथील महामार्गासंंदर्भात आवश्यक असणाऱ्या मागण्यांबाबत लवकरच येथील ग्रामस्थ या विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. काश्मीर ते कन्याकुमारी हा देशाचा भाग जोडण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा असून येथील विकासासाठी व देशाच्या संरक्षणाच्यादृष्टीने हा महामार्ग महत्त्वाची जबाबदारी निभावणार आहे. तर शहरी भागात वाहनांचा वेग कमी होणार असल्याने ४५ मीटर तसेच घाटरस्त्यावर ताशी ३० किलोमीटर वाहनांच्या वेगामुळे तेथे ३० मीटर जमीन संपादित केलीजाणार असल्याचे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)