शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
7
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
8
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
9
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
11
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
12
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
13
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
14
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
15
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
16
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
17
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
18
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
19
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
20
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

महामार्ग रोखला : आदेशाने कुडाळात भातखरेदी

By admin | Updated: May 28, 2015 00:57 IST

भात खरेदीबाबत तहसीलदार समीर घारे यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करीत महामार्गावर आंदोलकांनी ठाण मांडले. मात्र, शासनाकडून तसा आदेश आल्याशिवाय आपण लेखी आश्वासन देऊ शकत नाही

कणकवली : भात गोदामे खाली करण्यासाठी कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. कणकवलीत आमदार नीतेश राणे यांनी स्वत: आंदोलनात सहभाग घेतला. कणकवलीत राष्ट्रीय महामार्ग आणि बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावर रास्तारोको करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार राणे यांच्यासह जिल्हाभरातून एकूण ९७ कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीने कुडाळ येथे गोदामातील भात खरेदी केली. आंदोलनाचा परिणाम म्हणून भात खरेदी सुरू झाल्याचा दावा कॉँग्रेसने केला.कणकवलीत आमदार राणेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रस्ता रोकोमुळे दीड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. तर बांदा येथे तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कणकवलीत ७२ कार्यकर्त्यांना तर बांद्यात २५ जणांना अटक केली. यापुढे कोकणातील जनतेला जिल्हाधिकाऱ्यांनी धमकी दिली तर महाराष्ट्रात त्यांना कुठेही फिरू देणार नाही. त्यामुळे त्यांनी येथील जनतेबद्दल बोलताना विचार करूनच बोलावे, असा इशारा आमदार राणे यांनी दिला. या आंदोलनामुळे येथे तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांची यामुळे दमछाक झाली.गाडी पेटवलीभात गोदामासमोर आंदोलन सुरू असताना तेथूनच काही अंतरावर महामार्गावर एमएच ०४, ए- ९१९७ या क्रमांकाची मारूती कार अज्ञातांनी पेटवली. त्यामुळे आगीच्या भडक्याबरोबरच धुराचे लोळ पसरले होते. टायरनी पेट घेतल्याने बराचवेळ गाडी पेटत होती. मात्र हे कृत्य कोणी केले? हे समजू शकले नाही. तहसीलदारांशी चर्चाभात खरेदीबाबत तहसीलदार समीर घारे यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करीत महामार्गावर आंदोलकांनी ठाण मांडले. मात्र, शासनाकडून तसा आदेश आल्याशिवाय आपण लेखी आश्वासन देऊ शकत नाही, असे तहसीलदारांनी सांगितले.पोलीस महानिरीक्षक सावंतवाडीत काँग्रेसच्यावतीने आमदार नीतेश राणे यांनी ‘सिंधुदुर्ग गोदाम खाली’ आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे बुधवारी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. त्यांनी काहीवेळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात थांबून ते ओरोसकडे गेले.वनविभागाच्या कार्यालयासमोर रास्ता रोकोपोलीस आंदोलकांना कणकवली पोलीस स्थानकात घेऊन जात असताना वनविभागाच्या कार्यालयासमोरील महामार्गावर काही आंदोलक तसेच शेतकऱ्यांनी भाताची पोती ठेवून रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. ही पोती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस मोकळा करण्यात आला. तसेच आंदोलकांना पोलीस स्थानकात आणण्यात आले.