शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरण मोबदला वाटप प्रक्रियेस सुरू वात

By admin | Updated: March 3, 2017 23:48 IST

या दोन तालुक्यांतील मिळून २० हजार मोबदलाप्राप्त खातेदार आहेत.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील २९ गावांचा निवाडा जाहीर झाला असून, या गावांसाठी मोबदल्याची ३८१ कोटी इतकी रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. आता या रकमेच्या वाटपाची प्रक्रिया येथील प्रांत कार्यालयाकडून सुरू झाली आहे. ही भरपाई संबंधितांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी तालुक्यातील १२ आणि संगमेश्वर तालुक्यातील २२ अशा एकूण ३४ गावांचा समावेश आहे. त्यापैकी रत्नागिरीतील चार आणि संगमेश्वरमधील सहा अशा एकूण दहा गावांचा निवाडा पहिल्या टप्प्यात, तर १९ गावांचा निवाडा दुसऱ्या टप्प्यात जाहीर करण्यात आला. निवाडा जाहीर झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील आठ आणि संगमेश्वर तालुक्यातील २१ गावांसाठी शासनाकडून भरपाई म्हणून ३८१ कोटी रुपये नुकतेच प्राप्त झालेआहेत. यापैकी २०३ कोटी रुपये रत्नागिरी तालुक्यासाठी, तर १७८ कोटी रुपये संगमेश्वर तालुक्यासाठी आहेत. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मोबदला वाटप प्रक्रिया झाली नाही. मात्र, आता निवडणुका संपल्याने वाटपाचे काम हाती घेण्यात येणार आहे.या दोन तालुक्यांतील मिळून २० हजार मोबदलाप्राप्त खातेदार आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रनिहाय भरपाईची रक्कम कळवण्यात येणार आहे. त्यानंतर त्या-त्या गावांमध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी जावून लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक गोळा करणार आहेत. त्यानंतर त्या खात्यावर मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील एकूण ३४ गावांचा समावेश आहे. त्यापैकी निवाडा प्रक्रिया पूर्ण झालेल्या २९ गावांना आता मोबदला वाटप करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, चरवेली, कोठारेवाडी या चार गावांचा तसेच संगमेश्वरमधील निढळेवाडी अशा एकूण ५ गावांचा निवाडा तांत्रिक अडचणींमुळे तसेच ग्रामस्थांच्या हरकतींमुळे अद्याप झालेला नाही. (प्रतिनिधी)निढळेवाडीचे लवकर सर्वेक्षणरत्नागिरी तालुक्यातील चरवेली, कोठारवाडी, पाली, पाली बाजारपेठ या चार गावांमधील ग्रामस्थांच्या हरकतींमुळे या गावांचा अद्याप निवाडा झालेला नाही. काही निकषांमध्ये बदल झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडीचे सर्वेक्षण पुन्हा करण्यात येणार आहे.रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील गावेझरेवाडी, नागलेवाडी, मराठेवाडी, तारवेवाडी, निवळी - रावणंगवाडी, हातखंबा, खानू.मानसकोंड, तळे, कोळंबे, कोंडआंबेड, ओझरखोल, आंबेडबुद्रुक, आरवली, हरेकरवाडी, तुरळ, गोळवली, धामणी, आंबेडखुर्द, कसबा-संगमेश्वर, रामपेठ, वाडा नावडी, माभळे, कुरधुंडाखुर्द, कुरधुंडा, सोनगिरी, वांद्री, कांटे. निवडणुकीमुळे काम रखडलेरत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यांमध्ये सुमारे २० हजार खातेदार आहेत. आॅगस्टमध्ये २९ गावांचे निवाडे जाहीर झाल्यानंतर पाच महिन्यानंतर जानेवारीमध्ये मोबदला रक्कम प्राप्त झाली. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कालावधीत आल्याने मोबदला वाटपाचे काम प्रांत कार्यालयाला हाती घेता आले नव्हते.