शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

खेडमध्ये हायटेक शिक्षण

By admin | Updated: January 20, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद : दोन वर्षांच्या प्रयोगाला मिळतेय शाळाशाळांमधून यश

श्रीकांत चाळके-खेड -हायटेक शिक्षणाची कास धरून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेने भर दिला आहे. प्राथमिक पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तंत्रशिक्षणाची भर पडावी, हा यामागचा हेतू आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १३३ प्राथमिक शाळांनी विजेची बिले न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, आता अशा शाळांची संख्या कमी झाल्याने खेड तालुक्यातील संगणक असलेल्या ८३ शाळांना याचा लाभ झाला आहे़ खेड तालुक्यात ३७९ प्राथमिक शाळा आहेत़ त्यातील ८५ प्राथमिक शाळांमधील वीज जोडणी तोडण्यात आली आहे. शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम हाती घेतली होती़ त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होऊ शकले़ त्यापाठोपाठ आजच्या गतिमान शिक्षण प्रणालीच्या प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्र्थ्यांना ओढण्यासाठी जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणक उपलब्ध करून दिले गेले. मात्र, वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे त्याचा लाभ शाळांना मिळत होता. शासनाकडून मिळणाऱ्या ४ टक्के सादील निधीतून आवश्यक सुविधा मिळत होत्या. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसह विविध बिलेही थकली आहेत़ ४ टक्के सादील योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतूनच ही बिले भरली जातात. मात्र, हा निधी न मिळाल्याने बिले भरलेली नाहीत़ वीजबिलांना वाणिज्य दर लावण्यात आल्याने ती भरणेही ग्रामस्थांना अशक्य झाले़ त्यामुळें गेल्या दोन वर्षात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. खेड तालुक्यातील अल्प शाळांमध्ये आता वीजबिले न भरण्याचे प्रमाण राहिले. मात्र, आता या तालुक्यातील शाळांमध्ये पुन्हा हायटेकपध्दतीने शिक्षण देणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. अशा शाळांमध्ये नवनवीन प्रयोग सादर करण्यास तेथील शिक्षक, पालक सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात येते.बिले वाणिज्य दराने नाही...वीज जोडण्या तोडल्यानंतर पुन्हा जोडल्या.प्राथमिक शाळांमध्ये संगणक शिक्षण.शाळांची बिले न भरल्याने संगणक प्रणालीवर झाला होता परिणाम. वाणिज्य दराने शाळांची बिले तयार झाल्याने ती भरणे ग्रामस्थानाही अशक्य. आता सुकर खेड तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानामधून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, मधल्या काळात वीजबिल न भरल्याने शाळा हायटेक करण्याला थोडा ब्रेक लागला होता.