शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

उच्च माध्यमिक शाळा अपात्र!

By admin | Updated: April 3, 2016 22:20 IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गवर अन्याय : राज्यात ५०० कनिष्ठ महाविद्यालये अनुदानाला पात्र

सागर पाटील ल्ल टेंभ्ये राज्यातील कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांच्या मान्यता आदेशामधील ‘कायम’ शब्द फेब्रुवारी २०१४मध्ये काढण्यात आला. या शाळांमधील अनुदानास पात्र शाळांची यादी तयार करण्याचे काम आयुक्तांच्या कार्यालयात सुरु आहे. परंतु रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधील एकही उच्च माध्यमिक शाळा अनुदानाला पात्र ठरलेली नाही. शिक्षणमंत्री कोकणातील असतानाही कोकणावर होणारा अन्याय विचार करायला लावणारा आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दोन्ही जिल्ह्यांतील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मोठे नुकसान होत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक यांनी व्यक्त केले. ते रत्नािगरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. राज्यातील अनेक शिक्षक गेल्या १४ वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता प्रलंबित आहेत. अनुदानित माध्यमिक शाळांना जोडून असणाऱ्या विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांची बिंदूनामावली यापूर्वी स्वतंत्र ठेवण्यात आली होती. परंतु या शाळांना अनुदानास पात्र ठरवताना एकत्र बिंदूनामावली निश्चित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासाठी अगोदर आर्थिकदृष्ट्या हलाखीची स्थिती असणाऱ्या शिक्षकांना कोकण आयुक्त कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. या कार्यालयाकडून रोस्टर वेळेनुसार तपासून दिले जात नसल्याने या शिक्षकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही प्रकारचे वेतन मिळत नसतानाही आयुक्त कार्यालय, मुंबई, उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे वारंवार फेऱ्या मारणे, या शिक्षकांना शक्य होत नाही. या शिक्षकांच्या समस्यांकडे प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. वयाची ५४ वर्षे पूर्ण झालेले काही शिक्षक वेतन मिळेल, या आशेने काम करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यापक संघ नेहमी उच्च माध्यमिक शिक्षकांसोबत राहणार असल्याचे जिल्हा सहसचिव सागर पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष एस. व्ही. कुराडे, गौरव पोंक्षे, अध्यापक संघाचे प्रतिनिधी एकनाथ पाटील उपस्थित होते. महेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उदरनिर्वाहासाठी काहीही... विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमध्ये विनावेतन काम करणारे प्राध्यापक आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपले शिक्षण, दर्जा लक्षात न घेता मिळेल ते काम करत आहेत. दुकानात हेल्पर, रात्रपाळीला कंपनीत काम करणे, रिक्षा चालवणे, चहाचा गाडा चालवणे अशी कामे प्राध्यापकाला करायला लागणे, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सत्ताधारी बनल्यानंतर आपली तत्वे बाजूला ठेवली का? या शिक्षकांच्या यातना त्यांना केव्हा कळणार, असे आगतिक प्रश्न प्रा. टी. एन. नाईक यांनी उपस्थित केले.