शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

राजापुरात चक्क बासमतीचे पीक

By admin | Updated: November 8, 2015 23:35 IST

या भाताला आता चांगल्या प्रमाणात केसरे आली असून, एका काडीला सुमारे पाच लोंब्या आल्या आहेत. झालेल्या खर्चाएवढे तरी उत्पन्न मिळेल का?

विनोद पवार- राजापूर--आवड असली की, अनेक गोष्टी सहजपणे साध्य करता येतात. फक्त त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असावी लागते. तशी इच्छाशक्ती असल्यामुळेच राजापूर शहरातील इलेक्ट्ीक व्यावसायिक राजू रानडे यांनी आपल्या कुंभारमळा येथील सुमारे १२ गुंठे जागेत बासमती भाताचे यशस्वीपणे पीक घेतले आहे. कोकणात बासमती जातीचे भात होत नसल्याचा गैरसमज असल्यामुळे येथील शेतकरी सहज होणाऱ्या बासमती भाताचे पीक घेण्यास धजावत नाहीत. त्यामुळे रानडे यांचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी दिशा देणारा ठरणार आहे. दरवर्षी आपल्या कुंभारमळा येथील जागेत रानडे हे शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करत असतात. यावर्षी आपल्या शेतात बासमती भाताचे पीक घोण्याचे ठरवल्यानंतर रानडे यांनी राजेंद्र भोगवती जातीचे बियाणे कोल्हापूर येथून मागवले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रारंभी त्यांनी लागवड केलेल्या या भाताची वाढ काही प्रमाणात खुंटली होती. त्यामुळे बासमती भात लागवडीचा हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, याबाबत राजू रानडे यांच्या मनात शंका होती. मात्र, त्यानंतर त्यांनी खताची योग्य मात्रा देत पंपाने पाणीही दिले. त्यामुळे काहीशी वाढ खुंटलेले व म्हणावा तसा जोर नसलेले हे भात चांगलेच वर आले. रानडे यांनी लावलेल्या या भाताला आता चांगल्या प्रमाणात केसरे आली असून, एका काडीला सुमारे पाच लोंब्या आल्या आहेत. झालेल्या खर्चाएवढे तरी उत्पन्न मिळेल का? अशी शंका रानडे यांना आली होती. मात्र, खुरपणी व तण काढणी यामुळे उत्पन्नात भर पडली आहे. १२ गुंठे जागेत घेतलेले हे पीक सुमारे २० मण म्हणजे आठशे किलो भाताचे उत्पन्न देईल, असा विश्वास रानडे यांनी व्यक्त केला आहे.