शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात चक्क बासमतीचे पीक

By admin | Updated: November 8, 2015 23:35 IST

या भाताला आता चांगल्या प्रमाणात केसरे आली असून, एका काडीला सुमारे पाच लोंब्या आल्या आहेत. झालेल्या खर्चाएवढे तरी उत्पन्न मिळेल का?

विनोद पवार- राजापूर--आवड असली की, अनेक गोष्टी सहजपणे साध्य करता येतात. फक्त त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असावी लागते. तशी इच्छाशक्ती असल्यामुळेच राजापूर शहरातील इलेक्ट्ीक व्यावसायिक राजू रानडे यांनी आपल्या कुंभारमळा येथील सुमारे १२ गुंठे जागेत बासमती भाताचे यशस्वीपणे पीक घेतले आहे. कोकणात बासमती जातीचे भात होत नसल्याचा गैरसमज असल्यामुळे येथील शेतकरी सहज होणाऱ्या बासमती भाताचे पीक घेण्यास धजावत नाहीत. त्यामुळे रानडे यांचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी दिशा देणारा ठरणार आहे. दरवर्षी आपल्या कुंभारमळा येथील जागेत रानडे हे शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करत असतात. यावर्षी आपल्या शेतात बासमती भाताचे पीक घोण्याचे ठरवल्यानंतर रानडे यांनी राजेंद्र भोगवती जातीचे बियाणे कोल्हापूर येथून मागवले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रारंभी त्यांनी लागवड केलेल्या या भाताची वाढ काही प्रमाणात खुंटली होती. त्यामुळे बासमती भात लागवडीचा हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, याबाबत राजू रानडे यांच्या मनात शंका होती. मात्र, त्यानंतर त्यांनी खताची योग्य मात्रा देत पंपाने पाणीही दिले. त्यामुळे काहीशी वाढ खुंटलेले व म्हणावा तसा जोर नसलेले हे भात चांगलेच वर आले. रानडे यांनी लावलेल्या या भाताला आता चांगल्या प्रमाणात केसरे आली असून, एका काडीला सुमारे पाच लोंब्या आल्या आहेत. झालेल्या खर्चाएवढे तरी उत्पन्न मिळेल का? अशी शंका रानडे यांना आली होती. मात्र, खुरपणी व तण काढणी यामुळे उत्पन्नात भर पडली आहे. १२ गुंठे जागेत घेतलेले हे पीक सुमारे २० मण म्हणजे आठशे किलो भाताचे उत्पन्न देईल, असा विश्वास रानडे यांनी व्यक्त केला आहे.