शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’

By admin | Updated: July 7, 2015 21:15 IST

महेंद्र नाटेकर : नाटकाचे कणकवलीत प्रकट वाचन

कणकवली : कोकण विकास म्हणजे केवळ धरणे, पाटबंधारे, बंदर, रेल्वे, रस्ते, कारखाने, उद्योगधंदे, शिक्षण, इत्यादींचा विकास करणे नव्हे तर हा विकास करीत असताना कोकणी माणूस मध्यवर्ती धरून विकास केला पाहिजे; अन्यथा या विकासाचा लाभ कोकणाबाहेरील लोक घेतील नव्हे घेत असून, कोकणी माणूस देशोधडीला लागत आहे. तेव्हा ‘कोकण विकास म्हणजे कोकणी माणसाचा विकास’ ही संकल्पना लक्षात घेऊन ‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’ या नाटकाचे लेखन केले आहे, असे मत प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केले.‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’ या नाटकाचे प्रकट वाचन येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यघरात झाले. यानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना प्रा. महेंद्र नाटेकर यांनी नाट्य लेखनामागील आपली प्रेरणा स्पष्ट केली. यावेळी वामन पंडित, नाट्य दिग्दर्शक दीपक परब, राजेश कदम, मनोहर पालयेकर, मोहन काणेकर, डॉ. अनिल तेंडुलकर, डॉ. संदीप नाटेकर, वामन तर्फे, नाटककार पाताडे, विश्वनाथ केरकर, श्रृतिशया डोंगरे, डॉ. विद्याधर करंदीकर, वाय. पी. राणे, शिवाजीराव देसाई, वाय. जी. राणे, सुरेश पाटकर, अशोक राणे, आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, कोकणी लोकांवर महाराष्ट्र शासन प्रचंड अन्याय करीत असून, ही अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांची अस्मिता जागृत करणे हाही नाट्यलेखनाचा उद्देश आहे. ती कोकणी माणसाच्या विकासाबरोबरच त्याच्या स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्यच हवे, असे त्यांनी प्रतिपादन केले.नाट्यदिग्दर्शक दीपक परब, राजेश कदम व प्रा. महेंद्र नाटेकर यांनी नाटकाचे प्रभावी वाचन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कोकणावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडताना हृदयाला हात घातला गेला. शिक्षण, निवडणुका, वैद्यकीय सेवा, रस्ते, राजकारण, शेती, बागायती, मच्छिमारी, बेरोजगारी, क्रीडा, राजकारणी, आदींवर प्रकाशझोत टाकून दंभस्फोट केला आहे, अशा बहुसंख्य रसिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.नाट्यदिग्दर्शक दीपक परब म्हणाले, या नाटकातून कोकणातील तरुणांच्या व्यथा, वेदना व्यक्त झाल्या आहेत. नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आल्यानंतर पालकांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.नाटककार करंदीकर म्हणाले, कोकण राज्यनिर्मितीसाठी विविध माध्यमातून हा विषय मांडला जात आहे. प्रा. महेंद्र नाटेकर यांनी हा विषय नाटकाच्या माध्यमातून एकोणीस प्रवेशातून उत्तमरीतीने हाताळला आहे.डॉ. अनिल तेंडुलकर म्हणाले, हे नाटक तरुणांसाठी मार्गदर्शक असल्याने त्यांच्यासाठी या नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी आयोजित करणे आवश्यक आहे. डॉ. संदीप नाटेकर म्हणाले, नाटक वाचन प्रभावी झाले. कोकणातील विविध समस्या तीव्रतेने थोडक्या वेळात समजल्या. या नाटकाशिवाय अनेक एकांकिका सादर झाल्यास अधिक बरे होईल.गंगाराम साटम म्हणाले, कोकण राज्याबद्दल माझ्या मनात बऱ्याच शंका होत्या; पण आता त्या दूर झाल्या. कोकण राज्य झालेच पाहिजे. कलात्मकतेबरोबर माहितीचा आनंद मिळाला. यावेळी पालयेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)