शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
3
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
4
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
5
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
6
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
7
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
8
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
9
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
10
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?
13
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?
14
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
15
Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका
16
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
17
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
18
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
19
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
20
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी

कोकणाला निधी देऊन आजवरचा अन्याय दूर करू

By admin | Updated: February 12, 2015 00:39 IST

रामदास कदम : दापोलीत सदनिका भूमिपूजनप्रसंगी प्रतिपादन

दापोली : पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यानी कोकणावर नेहमीच अन्याय केला आहे. परंतु आता सत्ता आपली आहे. त्यामुळे शिवसेना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकास केल्याश्विाय गप्प बसणार नाही. कोकणावर आजपर्यंत झालेला अन्याय विकासकामाला भरघोस निधी देऊन दूर करू, असे आश्वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. मंगळवारी दापोलीत जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांच्या खासगी कार्यक्रमाला आलेले असताना झालेल्या छोटेखानी सोहळ्यात ते बोलत होते.आघाडी सरकारच्या काळात कोकण बकाल करण्याचा घाट घातला जात होता. कोकणावर वीज प्रकल्प लादून कोकणाची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारकडून झाला होता. परंतु अशा प्रकारच्या प्रकल्पाला शिवसेनेचा कायम विरोध असेल. कोकणच्या हिताचे निर्णय घेतले जातील. कोकणातील वाळू उत्खनन, चिरेखाण या रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगाना परवानगी देण्यात आली आहे. आघाडी सरकारने वाळू उत्खनन व चिरा व्यवसायावर बंदी घातल्याने कोकणातील रोजगार डबघाईला आला होता. रोजगारावर आधारित विकास थांबला होता. परंतु या पुढे तसे होणार नाही.आता कोकणातील जमिनी परप्रांतीयांच्या घशात जात असून, कोकणातील जमिनी, डोंगर परप्रांतीय लोक खरेदी करत आहेत. भूमिपुत्रांनो जमिनी विकू नका, जमीन विकून स्थानिक मराठी माणूस कोकणातून हद्दपार होईल. मुंबई परप्रांतीयांनी ताब्यात घेतली असून, मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे. भविष्यात मुंबईसारखी परिस्थिती कोकणच्या नश्बिी येण्याची शक्यता आहे. कोकणातील शेतकऱ्यानी जमिनी विकल्यास आपल्याच भूमीत मराठी माणूस परका झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जमिनी विकू नका, असा सल्ला कदम यांनी यावेळी दिला.या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, नगराध्यक्ष जावेद मणियार, उपनगराध्यक्ष सचिन जाधव, पंचायत समिती, खेडचे सभापती अण्णा कदम, संदीप राजपुरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)