शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

पायाभूत सुविधांसाठी मदत करा

By admin | Updated: April 6, 2016 00:26 IST

कोकण विकासावर चर्चा : आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी

रत्नागिरी : मुंंबई कोकण वैधानिक विकास मंडळ स्थापन करून पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव मदत करा, ही मदत पॅकेजरूपी नको, तर गुंतवणूक म्हणून करावी, अशी आग्रही मागणी आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केली.कोकण विकासाच्या प्रस्तावावर चर्चेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. आमदार जाधव यांच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात उपस्थित होते. विधानसभा अस्तित्त्वात आल्यापासून पहिल्यांदाच कोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही चर्चा महत्वाची मानली जात आहे.कोकणच्या विकासावर चर्चा होण्यासाठी आमदार जाधव यांनी चालू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. ३१ मार्च रोजी त्यांनी प्रस्ताव मांडला होता, आज तो चर्चेला आला. या चर्चेची सुरुवातही जाधव यांनी केली. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी कोकणच्या विकासासाठी काय करायला हवं, याबाबतच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या. अतिवृष्टी झाली, वादळ-वारा झाला, पाऊस कमी पडला, पिके धोक्यात आली, नुकसान झालं, तर आक्रस्ताळेपणा करून कोकणी माणूस कधी मदतीसाठी हात पसरत नाही, कर्जमाफी करा, असं म्हणत नाही. त्यामुळे सरकार कोकणला अशी मदत करू शकत नसेल तर कोकणच्या विकासाकरिता, पायाभूत सुविधांकरिता मदत करावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीलाच केली.पर्यटनस्थळांचा विकास, फळांवरील प्रक्रिया आणि मत्स्य व्यवसाय हे डॉलर म्हणजे परकीय चलन मिळवून देऊ शकतात. पण, डॉलर भूमी असलेले कोकण आजपर्यंत दुर्लक्षितच राहिले आहे. शासनाने गुंतवणूक किंवा कर्ज म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी दहा वर्षे मदत करावी. त्यामुळे भविष्यात कोकण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा भार उचलू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग, सागरी महामार्ग पूर्णत्वास न्यावेत, सागरी जलवाहतूक सुरू करावी, कोकणातील केमिकल झोन, औष्णिक उर्जा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा करावी, पर्यटन विकासासाठी विमानतळांचा विकास करावा, कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मत्स्यविद्यापीठ, मेरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारावेत, प्रदूषणकारी कारखान्यांऐवजी कोकणात इंजिनियरिंग, फळप्रक्रिया कारखाने, टेक्स्टाईल पार्क, लॉजिस्टिक बेस उद्योग आणावेत, अशी आग्रही मागणी आमदार जाधव यांनी केली.जाधव यांनी मच्छीमारांच्या घरांखालील जागा त्यांच्या मालकीची करण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशीही मागणी केली.बंदरांचा विकास, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प यावरही त्यांनी भाष्य केले. कोकणात समुद्रबळींची संख्या कमालीची वाढली असून, ही बाब अत्यंत चिंंत्तादायक व पर्यटन विकासाला मारक असल्याचे निदर्शनास आणून दिले. गोव्याच्या धर्तीवर उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी केली.आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार जाधव यांनी कोकणच्या मातीतून घडलेल्या नररत्नांचा उल्लेख करून वैभवशाली परंपरा लाभलेलं कोकण उर्वरित महाराष्ट्राच्या नावाखाली मागास राहिल्याचे सांगितले. मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा प्रगत भागाला कोकण जोडण्यात आल्याने कोकणचा अनुशेष दिसून येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.आता कोकणच्या सर्वांगिण विकासाचा आराखडाच तयार करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. कोकणच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उत्तर देणार असून, आमदार जाधव यांनी मांडलेल्या प्रश्नांवर ते कोणता न्याय देतात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.(प्रतिनिधी)पर्ससीन : बंदीकाळात नव्याने निर्णय घ्याकोकणातील पर्ससीनेट मच्छीमारांवर घालण्यात आलेल्या बंदीवर तात्पुरती स्थगिती देऊन पावसाळ्यात मासेमारी बंदीच्या काळात नव्याने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी जाधव यांनी यावेळी केली...आमदार अनुपस्थितकोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली असताना कोकणातील शिवसेनेचे काही आमदार मात्र अनुपस्थित होते.