शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पायाभूत सुविधांसाठी मदत करा

By admin | Updated: April 6, 2016 00:26 IST

कोकण विकासावर चर्चा : आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी

रत्नागिरी : मुंंबई कोकण वैधानिक विकास मंडळ स्थापन करून पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव मदत करा, ही मदत पॅकेजरूपी नको, तर गुंतवणूक म्हणून करावी, अशी आग्रही मागणी आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केली.कोकण विकासाच्या प्रस्तावावर चर्चेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. आमदार जाधव यांच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात उपस्थित होते. विधानसभा अस्तित्त्वात आल्यापासून पहिल्यांदाच कोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही चर्चा महत्वाची मानली जात आहे.कोकणच्या विकासावर चर्चा होण्यासाठी आमदार जाधव यांनी चालू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. ३१ मार्च रोजी त्यांनी प्रस्ताव मांडला होता, आज तो चर्चेला आला. या चर्चेची सुरुवातही जाधव यांनी केली. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी कोकणच्या विकासासाठी काय करायला हवं, याबाबतच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या. अतिवृष्टी झाली, वादळ-वारा झाला, पाऊस कमी पडला, पिके धोक्यात आली, नुकसान झालं, तर आक्रस्ताळेपणा करून कोकणी माणूस कधी मदतीसाठी हात पसरत नाही, कर्जमाफी करा, असं म्हणत नाही. त्यामुळे सरकार कोकणला अशी मदत करू शकत नसेल तर कोकणच्या विकासाकरिता, पायाभूत सुविधांकरिता मदत करावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीलाच केली.पर्यटनस्थळांचा विकास, फळांवरील प्रक्रिया आणि मत्स्य व्यवसाय हे डॉलर म्हणजे परकीय चलन मिळवून देऊ शकतात. पण, डॉलर भूमी असलेले कोकण आजपर्यंत दुर्लक्षितच राहिले आहे. शासनाने गुंतवणूक किंवा कर्ज म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी दहा वर्षे मदत करावी. त्यामुळे भविष्यात कोकण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा भार उचलू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग, सागरी महामार्ग पूर्णत्वास न्यावेत, सागरी जलवाहतूक सुरू करावी, कोकणातील केमिकल झोन, औष्णिक उर्जा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा करावी, पर्यटन विकासासाठी विमानतळांचा विकास करावा, कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मत्स्यविद्यापीठ, मेरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारावेत, प्रदूषणकारी कारखान्यांऐवजी कोकणात इंजिनियरिंग, फळप्रक्रिया कारखाने, टेक्स्टाईल पार्क, लॉजिस्टिक बेस उद्योग आणावेत, अशी आग्रही मागणी आमदार जाधव यांनी केली.जाधव यांनी मच्छीमारांच्या घरांखालील जागा त्यांच्या मालकीची करण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशीही मागणी केली.बंदरांचा विकास, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प यावरही त्यांनी भाष्य केले. कोकणात समुद्रबळींची संख्या कमालीची वाढली असून, ही बाब अत्यंत चिंंत्तादायक व पर्यटन विकासाला मारक असल्याचे निदर्शनास आणून दिले. गोव्याच्या धर्तीवर उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी केली.आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार जाधव यांनी कोकणच्या मातीतून घडलेल्या नररत्नांचा उल्लेख करून वैभवशाली परंपरा लाभलेलं कोकण उर्वरित महाराष्ट्राच्या नावाखाली मागास राहिल्याचे सांगितले. मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा प्रगत भागाला कोकण जोडण्यात आल्याने कोकणचा अनुशेष दिसून येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.आता कोकणच्या सर्वांगिण विकासाचा आराखडाच तयार करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. कोकणच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उत्तर देणार असून, आमदार जाधव यांनी मांडलेल्या प्रश्नांवर ते कोणता न्याय देतात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.(प्रतिनिधी)पर्ससीन : बंदीकाळात नव्याने निर्णय घ्याकोकणातील पर्ससीनेट मच्छीमारांवर घालण्यात आलेल्या बंदीवर तात्पुरती स्थगिती देऊन पावसाळ्यात मासेमारी बंदीच्या काळात नव्याने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी जाधव यांनी यावेळी केली...आमदार अनुपस्थितकोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली असताना कोकणातील शिवसेनेचे काही आमदार मात्र अनुपस्थित होते.