शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फळमाशीअभावी ‘उष्णजल’ रखडले

By admin | Updated: April 27, 2015 00:11 IST

संशोधन अद्याप नाहीच : तात्पुरत्या उपाययोजनेसाठी बाष्पजलाचा पर्याय

रत्नागिरी : युरोपीय देशांमधील आंबा आयातीवरील बंदी उठावी, यासाठी हाती घेण्यात आलेले उष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजूनही रखडलेलेच आहे. उष्णजल संशोधनासाठी अजून फळमाशीची प्रतीक्षाच आहे. यावर तात्पुरता पर्याय म्हणून बाष्पजल प्रकिया करून आंबा निर्यात सुरू आहे.गोडी, चव, स्वाद, रंग, आकार अशा गुणवैशिष्ट्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. मात्र, हापूसवर फळमाशीचा प्रादुर्भाव असल्याच्या कारणामुळे गतवर्षी युरोपीय देशांनी हापूसची आयात करण्यास नकार दिला. युरोपीय बाजारपेठ अलिकडच्या काही वर्षातच हापूसला खुणावू लागली आहे. तेथे दरही चांगला मिळत असल्याने निर्यातदारांचा त्याकडे बराच कल आहे. त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी या प्रश्नावर संशोधन सुरू करण्यात आले.आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी नोंदवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन मंडळामध्ये संशोधन सुरू करण्यात आले आहे.वास्तविक एप्रिलअखेरीस फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु मार्चपासून संशोधन सुरू करण्यात आल्याने आधी फळमाशी तयार करणे गरजेचे होते. त्यासाठी पेरू आणून ते सडविण्यात आले आहेत. मात्र फळमाशी अद्याप अंडकोषात असल्यामुळे संशोधन अपूर्ण राहिले आहे. संशोधकांना आता अंडकोशातून बाहेर पडणाऱ्या फळमाशीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे हे संशोधन रखडले आहे. याप्रश्नावर हवी तशी ठोस उपाययोजना न केल्याने हे संशोधन रखडल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.युरोपीय देशांनी यावर्षी अटी ठेवत आयातीवरील बंदी उठवली. आयातीसाठी उष्णजल प्रक्रियेला सुरूवातीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठवली जात आहे.मॉरिशस, न्यूझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशांतून आंब्याला मागणी होत आहे. मात्र, अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. निर्यातीला मागणी असूनही त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे हापूसला मागणी जास्त आणि उत्पादन कमी, अशी अवस्था आहे.उष्णजल प्रक्रिया अहवाल लांबल्याने बाष्पजल प्रक्रिया ग्राह्य धरली जात आहे. एप्रिल अखेरीस किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबतची प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)बाष्पजल प्रक्रिया म्हणजे काय?बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना उष्णजल प्रक्रिया करून पाठवण्यात येत आहे.