शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

फळमाशीअभावी ‘उष्णजल’ रखडले

By admin | Updated: April 27, 2015 00:11 IST

संशोधन अद्याप नाहीच : तात्पुरत्या उपाययोजनेसाठी बाष्पजलाचा पर्याय

रत्नागिरी : युरोपीय देशांमधील आंबा आयातीवरील बंदी उठावी, यासाठी हाती घेण्यात आलेले उष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजूनही रखडलेलेच आहे. उष्णजल संशोधनासाठी अजून फळमाशीची प्रतीक्षाच आहे. यावर तात्पुरता पर्याय म्हणून बाष्पजल प्रकिया करून आंबा निर्यात सुरू आहे.गोडी, चव, स्वाद, रंग, आकार अशा गुणवैशिष्ट्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. मात्र, हापूसवर फळमाशीचा प्रादुर्भाव असल्याच्या कारणामुळे गतवर्षी युरोपीय देशांनी हापूसची आयात करण्यास नकार दिला. युरोपीय बाजारपेठ अलिकडच्या काही वर्षातच हापूसला खुणावू लागली आहे. तेथे दरही चांगला मिळत असल्याने निर्यातदारांचा त्याकडे बराच कल आहे. त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी या प्रश्नावर संशोधन सुरू करण्यात आले.आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी नोंदवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन मंडळामध्ये संशोधन सुरू करण्यात आले आहे.वास्तविक एप्रिलअखेरीस फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु मार्चपासून संशोधन सुरू करण्यात आल्याने आधी फळमाशी तयार करणे गरजेचे होते. त्यासाठी पेरू आणून ते सडविण्यात आले आहेत. मात्र फळमाशी अद्याप अंडकोषात असल्यामुळे संशोधन अपूर्ण राहिले आहे. संशोधकांना आता अंडकोशातून बाहेर पडणाऱ्या फळमाशीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे हे संशोधन रखडले आहे. याप्रश्नावर हवी तशी ठोस उपाययोजना न केल्याने हे संशोधन रखडल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.युरोपीय देशांनी यावर्षी अटी ठेवत आयातीवरील बंदी उठवली. आयातीसाठी उष्णजल प्रक्रियेला सुरूवातीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठवली जात आहे.मॉरिशस, न्यूझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशांतून आंब्याला मागणी होत आहे. मात्र, अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. निर्यातीला मागणी असूनही त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे हापूसला मागणी जास्त आणि उत्पादन कमी, अशी अवस्था आहे.उष्णजल प्रक्रिया अहवाल लांबल्याने बाष्पजल प्रक्रिया ग्राह्य धरली जात आहे. एप्रिल अखेरीस किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबतची प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)बाष्पजल प्रक्रिया म्हणजे काय?बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना उष्णजल प्रक्रिया करून पाठवण्यात येत आहे.