शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

फळमाशीअभावी ‘उष्णजल’ रखडले

By admin | Updated: April 27, 2015 00:11 IST

संशोधन अद्याप नाहीच : तात्पुरत्या उपाययोजनेसाठी बाष्पजलाचा पर्याय

रत्नागिरी : युरोपीय देशांमधील आंबा आयातीवरील बंदी उठावी, यासाठी हाती घेण्यात आलेले उष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजूनही रखडलेलेच आहे. उष्णजल संशोधनासाठी अजून फळमाशीची प्रतीक्षाच आहे. यावर तात्पुरता पर्याय म्हणून बाष्पजल प्रकिया करून आंबा निर्यात सुरू आहे.गोडी, चव, स्वाद, रंग, आकार अशा गुणवैशिष्ट्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. मात्र, हापूसवर फळमाशीचा प्रादुर्भाव असल्याच्या कारणामुळे गतवर्षी युरोपीय देशांनी हापूसची आयात करण्यास नकार दिला. युरोपीय बाजारपेठ अलिकडच्या काही वर्षातच हापूसला खुणावू लागली आहे. तेथे दरही चांगला मिळत असल्याने निर्यातदारांचा त्याकडे बराच कल आहे. त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी या प्रश्नावर संशोधन सुरू करण्यात आले.आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी नोंदवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन मंडळामध्ये संशोधन सुरू करण्यात आले आहे.वास्तविक एप्रिलअखेरीस फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु मार्चपासून संशोधन सुरू करण्यात आल्याने आधी फळमाशी तयार करणे गरजेचे होते. त्यासाठी पेरू आणून ते सडविण्यात आले आहेत. मात्र फळमाशी अद्याप अंडकोषात असल्यामुळे संशोधन अपूर्ण राहिले आहे. संशोधकांना आता अंडकोशातून बाहेर पडणाऱ्या फळमाशीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे हे संशोधन रखडले आहे. याप्रश्नावर हवी तशी ठोस उपाययोजना न केल्याने हे संशोधन रखडल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.युरोपीय देशांनी यावर्षी अटी ठेवत आयातीवरील बंदी उठवली. आयातीसाठी उष्णजल प्रक्रियेला सुरूवातीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठवली जात आहे.मॉरिशस, न्यूझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशांतून आंब्याला मागणी होत आहे. मात्र, अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. निर्यातीला मागणी असूनही त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे हापूसला मागणी जास्त आणि उत्पादन कमी, अशी अवस्था आहे.उष्णजल प्रक्रिया अहवाल लांबल्याने बाष्पजल प्रक्रिया ग्राह्य धरली जात आहे. एप्रिल अखेरीस किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबतची प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)बाष्पजल प्रक्रिया म्हणजे काय?बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना उष्णजल प्रक्रिया करून पाठवण्यात येत आहे.