शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

७१ कामगारांवर ५५ हजार नागरिकांचे आरोग्य

By admin | Updated: September 18, 2015 23:16 IST

चिपळूण शहर : ११९१पासून आरोग्य विभागात नवीन भरतीच नाही

चिपळूण : शहराची लोकसंख्या अंदाजे ५५ हजार असून, सन १९९१पासून आरोग्य विभागात सफाई कामगारांची नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे केवळ ७१ कामगार आरोग्य विभागाचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य कसे राखले जाणार, असा सवाल केला जात आहे.चिपळूण शहराची स्वच्छता करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी ८८ कामगारांची नियुक्ती केली होती. या कामगारांच्या मदतीने शहरातील विविध भागांत साफसफाईचे काम केले जात होते. सन १९९१मध्ये शहराची लोकसंख्या अंदाजे ३४ हजार होती. सध्या शहराची लोकसंख्या अंदाजे ५५ हजार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांपैकी १७ कामगार अन्य विभागात बढतीवर काम करत आहेत. शासनाच्या नवीन धोरणानुसार सन १९९१पासून सफाई कामगारांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ७१ कामगारांवरच आरोग्य विभागाचे काम हाकण्याची वेळ आली आहे. शहरातील गटारांची साफसफाई तसेच स्वच्छतेची अन्य कामे सफाई कामगारांकडूनच केली जात आहेत. सण, उत्सव काळातही नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक तेथे याच कामगारांना काम करावे लागत आहे. नवीन भरती न झाल्याने कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांवर ताण पडत आहे. शहरातील गटार कामांचे योग्य नियोजन न झाल्याने काही भागांत पावसाळ्याच्या दिवसात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे काहीवेळा पाणी रस्त्यावर येते. या रोषाला सफाई कामगारांना सामोरे जावे लागत आहे. शहराचा वाढता विस्तार व उभ्या राहणाऱ्या अपार्टमेंट याचा विचार करता सफाई कामगारांच्या संख्येत वाढ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी राजकीय नेते मंडळींनी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)