शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

७१ कामगारांवर ५५ हजार नागरिकांचे आरोग्य

By admin | Updated: September 18, 2015 23:16 IST

चिपळूण शहर : ११९१पासून आरोग्य विभागात नवीन भरतीच नाही

चिपळूण : शहराची लोकसंख्या अंदाजे ५५ हजार असून, सन १९९१पासून आरोग्य विभागात सफाई कामगारांची नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे केवळ ७१ कामगार आरोग्य विभागाचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य कसे राखले जाणार, असा सवाल केला जात आहे.चिपळूण शहराची स्वच्छता करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी ८८ कामगारांची नियुक्ती केली होती. या कामगारांच्या मदतीने शहरातील विविध भागांत साफसफाईचे काम केले जात होते. सन १९९१मध्ये शहराची लोकसंख्या अंदाजे ३४ हजार होती. सध्या शहराची लोकसंख्या अंदाजे ५५ हजार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांपैकी १७ कामगार अन्य विभागात बढतीवर काम करत आहेत. शासनाच्या नवीन धोरणानुसार सन १९९१पासून सफाई कामगारांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ७१ कामगारांवरच आरोग्य विभागाचे काम हाकण्याची वेळ आली आहे. शहरातील गटारांची साफसफाई तसेच स्वच्छतेची अन्य कामे सफाई कामगारांकडूनच केली जात आहेत. सण, उत्सव काळातही नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक तेथे याच कामगारांना काम करावे लागत आहे. नवीन भरती न झाल्याने कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांवर ताण पडत आहे. शहरातील गटार कामांचे योग्य नियोजन न झाल्याने काही भागांत पावसाळ्याच्या दिवसात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे काहीवेळा पाणी रस्त्यावर येते. या रोषाला सफाई कामगारांना सामोरे जावे लागत आहे. शहराचा वाढता विस्तार व उभ्या राहणाऱ्या अपार्टमेंट याचा विचार करता सफाई कामगारांच्या संख्येत वाढ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी राजकीय नेते मंडळींनी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)