शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नगराध्यक्षांचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील

By admin | Updated: July 8, 2014 23:19 IST

व्हिक्टर डान्टस : राष्ट्रवादी पक्षनिरीक्षक उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

सिंधुदुर्गनगरी : मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार असून पक्ष निरीक्षक गुरुवारी ओरोस येथील बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक १७ जुलैला होणार आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार आहेत. त्यांना अधिकार आहेत. त्यांनी निरीक्षक पाठवावा अशी मागणी आम्ही केली आहे. गुरुवार १० जुलैला ओरोस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. आपल्या व्यथा मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना डान्टस म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष अडचणीत असताना पक्षाने आमच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तरीही पक्षाचे हित लक्षात घेऊन आमच्यामुळे जर पक्षाला बाधा येणार असेल तर आम्ही केव्हाही पद सोडायला तयार आहोत. पक्ष मोठा झाला पाहिजे. शरद पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविणे सर्वांचेच काम आहे. तेव्हा पक्षापेक्षा व्यक्ती मोठी नाही. शरद पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे निवडणुकीत अपयश आले हे मान्यच करावे लागेल. मला राष्ट्रवादीत गट-तट मान्य नाही. मात्र काहीजण दुखावले असतील तर त्यांनी पक्ष निरीक्षकांशी चर्चा करावी. पक्षहितासाठी एकत्रित यावे. एकमेकांवर वृत्तपत्रातून टीकाटीप्पणी करून, एकमेकांशी झगडत बसून पक्षाचे नुकसान करण्यापेक्षा एकत्रितपणे पक्षाचे धोरण जनतेसमोर मांडायला हवे. वैचारिक मतभेद असले तरी सर्व कार्यकर्त्यांची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून पक्षाला बळ देण्याची गरज आहे. मग मालवण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक पूजा करलकर असोत अथवा आमदार दीपक केसरकर असोत. या सर्वांनी पुन्हा एकदा या प्रवाहात यावे. उमेदवार पक्षश्रेष्ठी निवडणार आहेत. ते जो उमेदवार देतील त्याच्या पाठिशी आम्ही राहणार आहोत. तेव्हा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. तसेच एकमेकांवर टीकाटीप्पणी करून पक्षाला अडचण निर्माण करण्यापेक्षा आपल्या व्यथा, समस्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करून सोडवाव्यात. पदापेक्षा पक्षाला महत्त्व देतो. जिल्ह्याची नाजूक स्थिती निर्माण झाली असताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी आमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ती जबाबदारी स्वीकारणारा पक्षाला मिळाला की आम्ही केव्हाही यातून मुक्त होऊन पक्षासाठी एकनिष्ठेने काम करायला तयार आहोत, असे डान्टस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)