शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नगराध्यक्षांचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील

By admin | Updated: July 8, 2014 23:19 IST

व्हिक्टर डान्टस : राष्ट्रवादी पक्षनिरीक्षक उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

सिंधुदुर्गनगरी : मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार असून पक्ष निरीक्षक गुरुवारी ओरोस येथील बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक १७ जुलैला होणार आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार आहेत. त्यांना अधिकार आहेत. त्यांनी निरीक्षक पाठवावा अशी मागणी आम्ही केली आहे. गुरुवार १० जुलैला ओरोस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. आपल्या व्यथा मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना डान्टस म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष अडचणीत असताना पक्षाने आमच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तरीही पक्षाचे हित लक्षात घेऊन आमच्यामुळे जर पक्षाला बाधा येणार असेल तर आम्ही केव्हाही पद सोडायला तयार आहोत. पक्ष मोठा झाला पाहिजे. शरद पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविणे सर्वांचेच काम आहे. तेव्हा पक्षापेक्षा व्यक्ती मोठी नाही. शरद पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे निवडणुकीत अपयश आले हे मान्यच करावे लागेल. मला राष्ट्रवादीत गट-तट मान्य नाही. मात्र काहीजण दुखावले असतील तर त्यांनी पक्ष निरीक्षकांशी चर्चा करावी. पक्षहितासाठी एकत्रित यावे. एकमेकांवर वृत्तपत्रातून टीकाटीप्पणी करून, एकमेकांशी झगडत बसून पक्षाचे नुकसान करण्यापेक्षा एकत्रितपणे पक्षाचे धोरण जनतेसमोर मांडायला हवे. वैचारिक मतभेद असले तरी सर्व कार्यकर्त्यांची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून पक्षाला बळ देण्याची गरज आहे. मग मालवण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक पूजा करलकर असोत अथवा आमदार दीपक केसरकर असोत. या सर्वांनी पुन्हा एकदा या प्रवाहात यावे. उमेदवार पक्षश्रेष्ठी निवडणार आहेत. ते जो उमेदवार देतील त्याच्या पाठिशी आम्ही राहणार आहोत. तेव्हा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. तसेच एकमेकांवर टीकाटीप्पणी करून पक्षाला अडचण निर्माण करण्यापेक्षा आपल्या व्यथा, समस्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करून सोडवाव्यात. पदापेक्षा पक्षाला महत्त्व देतो. जिल्ह्याची नाजूक स्थिती निर्माण झाली असताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी आमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ती जबाबदारी स्वीकारणारा पक्षाला मिळाला की आम्ही केव्हाही यातून मुक्त होऊन पक्षासाठी एकनिष्ठेने काम करायला तयार आहोत, असे डान्टस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)