शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहाला सील ठोकणे हा नगराध्यक्षांचा दळभद्रीपणाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:44 IST

विनायक राऊत यांच्याकडून समाचार : सभागृहातच सादरीकरण करण्याची सेना नगरसेवकांची भूमिका अयोग्य

रत्नागिरी : पालिकेच्या सभागृहाचेही काही नियम आहेत, सभागृहाचा मान प्रत्येकाने राखला पाहिजे. काहीही झाले तरी प्रेझेंटेशन सभागृहातच करणार, अशी काही नगरसेवकांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. त्याचबरोबर सील ठोकून नगरपरिषद सभागृह बंद ठेवणे, हा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचा वैचारिक दळभद्रीपणा असून, ही बाब दुर्दैवी आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी नगरपरिषदेत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत तीव्र नापसंती व्यक्त केली. पाणी योजनेच्या सादरीकरणानंतर उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांच्या दालनात त्यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. येथे पक्षीय वादंगाचा प्रश्न मुळीच नाही. पाणीपुरवठा योग्यरित्या होणे, हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुबलक पाणी पुरवठा हवा, ही शहरवासीयांची मागणी आहे. रत्नागिरी हे भविष्यात अधिक विस्तारणारे शहर आहे. त्यामुळे योजना बनविताना लाखाची नव्हे; तर सव्वा ते दीड लाख लोकांसाठी बनवावी, अशी सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. शहरातील पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षात विस्कळीत आहे. पाणी वाटपातही अनियमितता आहे. मुबलक पाणी असूनही वितरण व्यवस्था ठप्प असल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे जो पाणी आराखडा तयार केला आहे, त्याची माहिती लोकप्रतिनिधींना व्हावी, म्हणून हा आराखडा पाहणीचा प्रपंच आहे. त्यातून आराखड्यातील त्रुटीही दूर करणे शक्य होणार आहे, असे खासदार राऊत म्हणाले. प्रस्ताव शासनाकडे गेला असला तरी योजनेला सुकाणू समितीची मान्यता नाही. त्यातील त्रुटी दूर होऊन परिपूर्ण प्रस्ताव सुकाणू समितीसमोर जावा म्हणून आम्ही सूचना दिल्या आहेत. पानवलच्या धरणाचे पाणी ही दैवी देणगी आहे. धरणाची उंची वाढविणे आवश्यक आहे तसेच धरणाला मोठी गळती असून, ते पूर्णत: दुुरुस्त करण्याची गरज आहे. धरणातील गाळ उपसाही करावा लागेल. सध्या दीड मीटर उंची तात्पुरती वाढवली आहे. परंतु ती कायमस्वरुपी वाढवण्याची व्यवस्था करावी. योजनेत २१ दशलक्ष लीटर पाणी गृहीत धरण्यात आले आहे. शीळची जॅकवेल अधिक जवळ उभारली जाणार आहे. ११० किलोमीटर लांबीची जलवाहिनी ही न गंजणाऱ्या धातूची वापरली जाणार आहे. शहरात १५ ठिकाणी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ठेवून जनतेला माहिती दिली जाणार आहे. सूज्ञ नागरिकांकडून आणखी चांगल्या सूचना आल्यास त्यांचा आराखड्यात समावेश व्हावा, असेही अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या प्रश्नावरून सेनेने वातावरण भडकावण्याचे काम कधीही केलेले नाही. यावेळी सेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे, बंड्या साळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)