शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

सभागृहाला सील ठोकणे हा नगराध्यक्षांचा दळभद्रीपणाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:44 IST

विनायक राऊत यांच्याकडून समाचार : सभागृहातच सादरीकरण करण्याची सेना नगरसेवकांची भूमिका अयोग्य

रत्नागिरी : पालिकेच्या सभागृहाचेही काही नियम आहेत, सभागृहाचा मान प्रत्येकाने राखला पाहिजे. काहीही झाले तरी प्रेझेंटेशन सभागृहातच करणार, अशी काही नगरसेवकांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. त्याचबरोबर सील ठोकून नगरपरिषद सभागृह बंद ठेवणे, हा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचा वैचारिक दळभद्रीपणा असून, ही बाब दुर्दैवी आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी नगरपरिषदेत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत तीव्र नापसंती व्यक्त केली. पाणी योजनेच्या सादरीकरणानंतर उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांच्या दालनात त्यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. येथे पक्षीय वादंगाचा प्रश्न मुळीच नाही. पाणीपुरवठा योग्यरित्या होणे, हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुबलक पाणी पुरवठा हवा, ही शहरवासीयांची मागणी आहे. रत्नागिरी हे भविष्यात अधिक विस्तारणारे शहर आहे. त्यामुळे योजना बनविताना लाखाची नव्हे; तर सव्वा ते दीड लाख लोकांसाठी बनवावी, अशी सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. शहरातील पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षात विस्कळीत आहे. पाणी वाटपातही अनियमितता आहे. मुबलक पाणी असूनही वितरण व्यवस्था ठप्प असल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे जो पाणी आराखडा तयार केला आहे, त्याची माहिती लोकप्रतिनिधींना व्हावी, म्हणून हा आराखडा पाहणीचा प्रपंच आहे. त्यातून आराखड्यातील त्रुटीही दूर करणे शक्य होणार आहे, असे खासदार राऊत म्हणाले. प्रस्ताव शासनाकडे गेला असला तरी योजनेला सुकाणू समितीची मान्यता नाही. त्यातील त्रुटी दूर होऊन परिपूर्ण प्रस्ताव सुकाणू समितीसमोर जावा म्हणून आम्ही सूचना दिल्या आहेत. पानवलच्या धरणाचे पाणी ही दैवी देणगी आहे. धरणाची उंची वाढविणे आवश्यक आहे तसेच धरणाला मोठी गळती असून, ते पूर्णत: दुुरुस्त करण्याची गरज आहे. धरणातील गाळ उपसाही करावा लागेल. सध्या दीड मीटर उंची तात्पुरती वाढवली आहे. परंतु ती कायमस्वरुपी वाढवण्याची व्यवस्था करावी. योजनेत २१ दशलक्ष लीटर पाणी गृहीत धरण्यात आले आहे. शीळची जॅकवेल अधिक जवळ उभारली जाणार आहे. ११० किलोमीटर लांबीची जलवाहिनी ही न गंजणाऱ्या धातूची वापरली जाणार आहे. शहरात १५ ठिकाणी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ठेवून जनतेला माहिती दिली जाणार आहे. सूज्ञ नागरिकांकडून आणखी चांगल्या सूचना आल्यास त्यांचा आराखड्यात समावेश व्हावा, असेही अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या प्रश्नावरून सेनेने वातावरण भडकावण्याचे काम कधीही केलेले नाही. यावेळी सेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे, बंड्या साळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)