शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

मनावर चांगले संस्कार रुजवावेत

By admin | Updated: March 23, 2015 00:46 IST

मनोज अंबिके : कणकवली येथे ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ कार्यक्रमात मार्गदर्शन

कणकवली : पालक हे आपल्या पाल्याला संपूर्णपणे स्वातंत्र्य देत नाहीत. त्यांना अनेक बंधनांत अडकून ठेवतात. त्यामुळे पाल्याला आपले पालक हे हिटलर वाटतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे मित्र बनावे. त्याच्यामधील क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे. पालकांनी पाल्यांच्या मनावर चांगल्या संस्कारांची रुजवण करावी, असे आवाहन मनोज अंबिके यांनी केले.एलआयसी आॅफ इंडियातर्फे कणकवली येथे ‘कानमंत्र आई- बाबांसाठी’ हा कार्यक्रम गुरुवारी आयोजिला होता. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपपोलीस निरीक्षक जे. डी. भोमकर, अशोक करंबेळकर, श्रीनिवास पळसुले उपस्थित होते. अंबिके पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात पालक व पाल्यांमध्ये संवाद होत नाही. त्यामुळे कुटुंबात अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत आहेत. यावर मात करायची असेल तर पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र बनले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. यातून त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षात येईल. पालक व पाल्यांमध्ये होणाऱ्या सुसंवादामुळे कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न व समस्या सुटतील असे त्यांनी सांगितले.पालक व पाल्यांमध्ये सुसंवाद होत नसल्यानेच त्यांची पावले वाईट मार्गाकडे वळतात. हे टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांसाठी दिवसातून काही वेळ द्यावा. जेणेकरून त्यांचे भावविश्व काय आहे याची कल्पना येईल. त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे हे समजून येईल. त्यांचे जर चुकीचे पाऊल पडत असेल तर त्यांना आपण रोखू शकतो. पालकांनी पाल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्राचे ज्ञान द्यावे. त्यांच्यावर दबाव आणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)++मनोज अंबिके यांनी या कार्यक्रमात उपस्थित पालकांशी थेट संवाद साधून आपल्या पाल्यांशी कसे वागावे याच्या टीप्स दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते; परंतु पालक हे आपल्या पाल्याने हेच केले पाहिजे याकरिता त्याच्यावर सातत्याने दबाव टाकत असतात. त्यामुळे ते पाल्य दबावाखाली असते. त्यामुळे या पाल्याला आपले पालक जणू हिटलरच आहेत असे वाटू लागते.अलिकडच्या काळात पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष देत नाहीत ही बाब खूप गंभीर आहे.