शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनावर चांगले संस्कार रुजवावेत

By admin | Updated: March 23, 2015 00:46 IST

मनोज अंबिके : कणकवली येथे ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ कार्यक्रमात मार्गदर्शन

कणकवली : पालक हे आपल्या पाल्याला संपूर्णपणे स्वातंत्र्य देत नाहीत. त्यांना अनेक बंधनांत अडकून ठेवतात. त्यामुळे पाल्याला आपले पालक हे हिटलर वाटतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे मित्र बनावे. त्याच्यामधील क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे. पालकांनी पाल्यांच्या मनावर चांगल्या संस्कारांची रुजवण करावी, असे आवाहन मनोज अंबिके यांनी केले.एलआयसी आॅफ इंडियातर्फे कणकवली येथे ‘कानमंत्र आई- बाबांसाठी’ हा कार्यक्रम गुरुवारी आयोजिला होता. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपपोलीस निरीक्षक जे. डी. भोमकर, अशोक करंबेळकर, श्रीनिवास पळसुले उपस्थित होते. अंबिके पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात पालक व पाल्यांमध्ये संवाद होत नाही. त्यामुळे कुटुंबात अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत आहेत. यावर मात करायची असेल तर पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र बनले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. यातून त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षात येईल. पालक व पाल्यांमध्ये होणाऱ्या सुसंवादामुळे कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न व समस्या सुटतील असे त्यांनी सांगितले.पालक व पाल्यांमध्ये सुसंवाद होत नसल्यानेच त्यांची पावले वाईट मार्गाकडे वळतात. हे टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांसाठी दिवसातून काही वेळ द्यावा. जेणेकरून त्यांचे भावविश्व काय आहे याची कल्पना येईल. त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे हे समजून येईल. त्यांचे जर चुकीचे पाऊल पडत असेल तर त्यांना आपण रोखू शकतो. पालकांनी पाल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्राचे ज्ञान द्यावे. त्यांच्यावर दबाव आणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)++मनोज अंबिके यांनी या कार्यक्रमात उपस्थित पालकांशी थेट संवाद साधून आपल्या पाल्यांशी कसे वागावे याच्या टीप्स दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते; परंतु पालक हे आपल्या पाल्याने हेच केले पाहिजे याकरिता त्याच्यावर सातत्याने दबाव टाकत असतात. त्यामुळे ते पाल्य दबावाखाली असते. त्यामुळे या पाल्याला आपले पालक जणू हिटलरच आहेत असे वाटू लागते.अलिकडच्या काळात पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष देत नाहीत ही बाब खूप गंभीर आहे.