शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

हातीपमध्ये चक्क तळीच गेली चोरीला, तक्रार दाखल

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

दापोली तालुका : संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना सापडली वादात

दापोली : तालुक्यातील हातीप- बौध्दवाडी येथे चोरीची घटना घडली आहे. मात्र, यावेळी सोने-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम चोरीला गेलेली नाही तर संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योेजनेतून सन २००२-०३मध्ये बांधलेली तळी चोरीला गेली आहे. या गमतीशीर पण तितक्याच संतापजनक परिस्थितीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.हातीप - बौध्दवाडीमध्ये सन २००२-०३ मध्ये बांधण्यास घेतलेल्या तळी बांधकामाची चौकशी करण्याची मागणी जान्हवी गोडबोले आणि ग्रामस्थांनी केली होती. यापूर्वी या तळीच्या बांधकामाची पंचायत समिती स्तरावरून पाहणी करण्यात आली होती. १४ जानेवारीला प्रत्यक्ष जागेवर जाऊन ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह पंचांसमक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये सर्व्हे नं. ७२ व हिस्सा नं. १४ या जागेत तळीचे बांधकाम केल्याच्या कोणत्याही स्वरूपाच्या खुणा आढळलेल्या नाहीत.तसेच या जागेवर सद्यस्थितीत खोदाई अथवा बांधकाम न झाल्याचा निर्वाळा जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपअभियंत्यांनी पाहणीत काढला आहे. तळीच्या केलेल्या मूल्यांकनाची पडताळणी करण्यासाठी ग्रामसेवकांकडे मोजमाप वहीची व अंदाजपत्रकाची मागणी करण्यात आली होती. मात्र, मोजमाप वही ठेवण्यात आली नसून, अंदाजपत्रकाची प्रत, खर्ची घालण्यात आलेल्या मस्टर व साहित्याची व्हाऊचर्स दाखवण्यात आली. मात्र, मोजमाप वही उपलब्ध नसल्यामुळे मस्टर व साहित्य व्हाऊचर याची पडताळणी करण्यात आलेली नाही. यामुळे केलेले मूल्यांकन नेमके कसले करण्यात आले, हे गुलदस्त्यात राहिले आहे.पाहणीमध्ये ज्या जागेवर तळी बांधल्याचे ग्रामपंचायतीकडून नमूद करण्यात आले होते, त्या जागी सद्यस्थितीत खोदाई अथवा बांधकाम केल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. तक्रारदार जान्हवी गोडबोले आणि गजानन सागवेकर यांनी प्रत्यक्षात तळीचे बांधकामच न झाल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.उपसरपंच बळीराम होडबे यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी आपण कायमस्वरूपी मुंबईत वास्तव्यास असल्याने आपणास माहीत नसल्याचे सांगितले. बौध्दवाडीतील ग्रामस्थ जितेंद्र पवार यांनी सन २००२-0३ मध्ये चौकोनी आकारात ७ ते ८ फूट खोलीचे तळीचे खोदकाम करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, लांबी व रूंदी नक्की सांगण्यात असमर्थता दर्शवली. पाहणीमध्ये येथे तळी नक्की बांधली की नाही, हे मोजमापवहीसमोर आलेले नाही. पाहणीप्रसंगी तक्रारदार जान्हवी गोडबोले, गजानन सागवेकर, उपसरपंच बळीराम होडबे, ग्रामस्थ जितेंद्र पवार, ग्रामपंचायत शिपाई संजय शेडगे, ग्रामसेवक अशोक शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता आर. अ‍े. देसाई, शाखा अभियंता दि. अ. धारप आदी उपस्थित होते. मात्र, सरपंचांना उपस्थित राहण्याबद्दल कळवल्यानंतरही संबंधित सरपंच उपस्थित न राहिल्याने तळीचे गौडबंगाल कायम राहिले आहे. (प्रतिनिधी)