शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गणेशभक्तांच्या उत्साहाला लगाम

By admin | Updated: August 28, 2014 22:22 IST

चाकरमान्यांचा ओघ सुरू : मासळी-आंबा हंगाम लाभदायी होण्यासाठी साकडे

नरेंद्र बोडस -देवगड -पावसाळी वातावरणामुळे एका बाजूला सुमारे १००० मिमी पावसाच्या तुटीची भरपाई होईल या आशेवर भातशेतीधारक शेतकरी आहे. पण त्याचबरोबर त्याला अतिवृष्टीपासूनही संरक्षण हवे आहे. दुसरीकडे आंबा बागायतदार हलक्या पावसाच्या सरी व्हाव्यात अशाच मताचा आहे. तसे त्याचे गणरायाकडे साकडेही आहे. महागाईच्या तडाख्यामुळे सजावट, पाहुण्यांची सरबराई आणि गणेशोत्सवासाठी वाढीव खर्च यामुळे सर्वसामान्य देवगडवासीयसुद्धा हवालदील आहे. यंदाचा आंबा आणि मासळी हंगाम लाभदायी व्हावा अशीच आता सर्व गणेशभक्तांची गणरायाकडे प्रार्थना आहे.देवगड तालुक्यामध्ये यावर्षी सुमारे १००० मिमी पावसाची तूट आहे. यंदाच्या मोसमात १५८९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. गतवर्षी यावेळपर्यंत २५०० पेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र, आता ही तूट भरून काढण्यासाठी सध्याच्या पावसाळी वातावरणात जोरदार वृष्टी झाली तर आंबा भातपीकाचेही नुकसान होईल असाच समज बागायतदार-मच्छिमारांचा आहे. अति पावसामुळे हंगामही लांबू शकतो तर मच्छिमारी बोटी आता हळूहळू समुद्रात मच्छिमारीसाठी जावू लागल्या आहेत त्यांना हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो. देवगडच्या आंबा बागायतदारांसाठीसुद्धा सप्टेंबरच्या मध्यात पाऊस ओसरू लागणे महत्त्वाचे ठरते. याचे कारण म्हणजे बहुतांश बागायतदार संजीवकाचा वापर करतात. संजीवकाचा प्रभावी परिणाम दिसण्यासाठी सप्टेंबर मध्यापासून पावसाचे प्रमाण ओसरू लागणे महत्वाचे असते. त्यामुळे त्यांची हाक बाप्पा ऐकणार का? हा प्रश्न बागायतदारांसमोर उभा राहिला आहे.आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे. आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे.