शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

गणेशभक्तांच्या उत्साहाला लगाम

By admin | Updated: August 28, 2014 22:22 IST

चाकरमान्यांचा ओघ सुरू : मासळी-आंबा हंगाम लाभदायी होण्यासाठी साकडे

नरेंद्र बोडस -देवगड -पावसाळी वातावरणामुळे एका बाजूला सुमारे १००० मिमी पावसाच्या तुटीची भरपाई होईल या आशेवर भातशेतीधारक शेतकरी आहे. पण त्याचबरोबर त्याला अतिवृष्टीपासूनही संरक्षण हवे आहे. दुसरीकडे आंबा बागायतदार हलक्या पावसाच्या सरी व्हाव्यात अशाच मताचा आहे. तसे त्याचे गणरायाकडे साकडेही आहे. महागाईच्या तडाख्यामुळे सजावट, पाहुण्यांची सरबराई आणि गणेशोत्सवासाठी वाढीव खर्च यामुळे सर्वसामान्य देवगडवासीयसुद्धा हवालदील आहे. यंदाचा आंबा आणि मासळी हंगाम लाभदायी व्हावा अशीच आता सर्व गणेशभक्तांची गणरायाकडे प्रार्थना आहे.देवगड तालुक्यामध्ये यावर्षी सुमारे १००० मिमी पावसाची तूट आहे. यंदाच्या मोसमात १५८९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. गतवर्षी यावेळपर्यंत २५०० पेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र, आता ही तूट भरून काढण्यासाठी सध्याच्या पावसाळी वातावरणात जोरदार वृष्टी झाली तर आंबा भातपीकाचेही नुकसान होईल असाच समज बागायतदार-मच्छिमारांचा आहे. अति पावसामुळे हंगामही लांबू शकतो तर मच्छिमारी बोटी आता हळूहळू समुद्रात मच्छिमारीसाठी जावू लागल्या आहेत त्यांना हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो. देवगडच्या आंबा बागायतदारांसाठीसुद्धा सप्टेंबरच्या मध्यात पाऊस ओसरू लागणे महत्त्वाचे ठरते. याचे कारण म्हणजे बहुतांश बागायतदार संजीवकाचा वापर करतात. संजीवकाचा प्रभावी परिणाम दिसण्यासाठी सप्टेंबर मध्यापासून पावसाचे प्रमाण ओसरू लागणे महत्वाचे असते. त्यामुळे त्यांची हाक बाप्पा ऐकणार का? हा प्रश्न बागायतदारांसमोर उभा राहिला आहे.आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे. आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे.