शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांच्या उत्साहाला लगाम

By admin | Updated: August 28, 2014 22:22 IST

चाकरमान्यांचा ओघ सुरू : मासळी-आंबा हंगाम लाभदायी होण्यासाठी साकडे

नरेंद्र बोडस -देवगड -पावसाळी वातावरणामुळे एका बाजूला सुमारे १००० मिमी पावसाच्या तुटीची भरपाई होईल या आशेवर भातशेतीधारक शेतकरी आहे. पण त्याचबरोबर त्याला अतिवृष्टीपासूनही संरक्षण हवे आहे. दुसरीकडे आंबा बागायतदार हलक्या पावसाच्या सरी व्हाव्यात अशाच मताचा आहे. तसे त्याचे गणरायाकडे साकडेही आहे. महागाईच्या तडाख्यामुळे सजावट, पाहुण्यांची सरबराई आणि गणेशोत्सवासाठी वाढीव खर्च यामुळे सर्वसामान्य देवगडवासीयसुद्धा हवालदील आहे. यंदाचा आंबा आणि मासळी हंगाम लाभदायी व्हावा अशीच आता सर्व गणेशभक्तांची गणरायाकडे प्रार्थना आहे.देवगड तालुक्यामध्ये यावर्षी सुमारे १००० मिमी पावसाची तूट आहे. यंदाच्या मोसमात १५८९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. गतवर्षी यावेळपर्यंत २५०० पेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र, आता ही तूट भरून काढण्यासाठी सध्याच्या पावसाळी वातावरणात जोरदार वृष्टी झाली तर आंबा भातपीकाचेही नुकसान होईल असाच समज बागायतदार-मच्छिमारांचा आहे. अति पावसामुळे हंगामही लांबू शकतो तर मच्छिमारी बोटी आता हळूहळू समुद्रात मच्छिमारीसाठी जावू लागल्या आहेत त्यांना हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो. देवगडच्या आंबा बागायतदारांसाठीसुद्धा सप्टेंबरच्या मध्यात पाऊस ओसरू लागणे महत्त्वाचे ठरते. याचे कारण म्हणजे बहुतांश बागायतदार संजीवकाचा वापर करतात. संजीवकाचा प्रभावी परिणाम दिसण्यासाठी सप्टेंबर मध्यापासून पावसाचे प्रमाण ओसरू लागणे महत्वाचे असते. त्यामुळे त्यांची हाक बाप्पा ऐकणार का? हा प्रश्न बागायतदारांसमोर उभा राहिला आहे.आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे. आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे.