शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गणेशभक्तांच्या उत्साहाला लगाम

By admin | Updated: August 28, 2014 22:22 IST

चाकरमान्यांचा ओघ सुरू : मासळी-आंबा हंगाम लाभदायी होण्यासाठी साकडे

नरेंद्र बोडस -देवगड -पावसाळी वातावरणामुळे एका बाजूला सुमारे १००० मिमी पावसाच्या तुटीची भरपाई होईल या आशेवर भातशेतीधारक शेतकरी आहे. पण त्याचबरोबर त्याला अतिवृष्टीपासूनही संरक्षण हवे आहे. दुसरीकडे आंबा बागायतदार हलक्या पावसाच्या सरी व्हाव्यात अशाच मताचा आहे. तसे त्याचे गणरायाकडे साकडेही आहे. महागाईच्या तडाख्यामुळे सजावट, पाहुण्यांची सरबराई आणि गणेशोत्सवासाठी वाढीव खर्च यामुळे सर्वसामान्य देवगडवासीयसुद्धा हवालदील आहे. यंदाचा आंबा आणि मासळी हंगाम लाभदायी व्हावा अशीच आता सर्व गणेशभक्तांची गणरायाकडे प्रार्थना आहे.देवगड तालुक्यामध्ये यावर्षी सुमारे १००० मिमी पावसाची तूट आहे. यंदाच्या मोसमात १५८९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. गतवर्षी यावेळपर्यंत २५०० पेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र, आता ही तूट भरून काढण्यासाठी सध्याच्या पावसाळी वातावरणात जोरदार वृष्टी झाली तर आंबा भातपीकाचेही नुकसान होईल असाच समज बागायतदार-मच्छिमारांचा आहे. अति पावसामुळे हंगामही लांबू शकतो तर मच्छिमारी बोटी आता हळूहळू समुद्रात मच्छिमारीसाठी जावू लागल्या आहेत त्यांना हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो. देवगडच्या आंबा बागायतदारांसाठीसुद्धा सप्टेंबरच्या मध्यात पाऊस ओसरू लागणे महत्त्वाचे ठरते. याचे कारण म्हणजे बहुतांश बागायतदार संजीवकाचा वापर करतात. संजीवकाचा प्रभावी परिणाम दिसण्यासाठी सप्टेंबर मध्यापासून पावसाचे प्रमाण ओसरू लागणे महत्वाचे असते. त्यामुळे त्यांची हाक बाप्पा ऐकणार का? हा प्रश्न बागायतदारांसमोर उभा राहिला आहे.आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे. आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे.