शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांसाठी कठीण पेपर!

By admin | Updated: October 2, 2014 00:11 IST

प्रत्येक पक्षाची राजकीय ताकदही उघड होणार, पक्षांतराचीच अधिक चर्चा

प्रकाश वराडकर- रत्नागिरी --राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे सेनेत पक्षांतर झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी मतदारसंघात येत्या १५ आॅक्टोबरला चौरंगी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. युती, आघाडी न झाल्याने प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे त्यामुळे कोण किती पाण्यात, कोणाची ताकद किती यांचाही जाहीर पंचनामा होणार आहे. परिणामी सर्व पक्षाच्या उमेदवारांसाठी या निवडणुकीचा पेपर सोपा नसल्याने या निवडणुकीत गहिरे रंग भरले आहेत. रत्नागिरी मतदारसंघात चार मुख्य पक्षांसह ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. मात्र, राष्ट्रवादीतून सेनेत गेलेले उदय सामंत, भाजपाचे बाळ माने, कॉँग्रेसचे रमेश कीर व राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा चौघांमध्ये मुख्य लढत होईल. या चौरंगी लढतीतही उदय सामंत व बाळ माने यांच्यातील लढाई ही ‘जिंंकू किंवा मरू’ अशा त्वेषाने लढली जाणार असल्याचे चित्र आहे. ग्रामपातळीवर शिवसेना बळकट आहे. सेनेच्या शाखा ग्रामपातळीवर सक्षम आहेत. त्याचा फायदा उदय सामंत यांना होईल. राष्ट्रवादीतून शिवसेनेत येताना सामंत यांच्याबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. सामंत यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. परंतु अजूनही त्यांनी आपण राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळालेला असताना शिवसेनेत का प्रवेश केला, याबाबत प्रभावी खुलासा केलेला नाही. त्यांच्या पक्षबदलाच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनातील संशयाची भूमिका कायम आहे. आपल्याला पाडण्यासाठी षडयंत्र रचल्यामुळे आपण सेनेत आल्याचे सामंत यांनी सांगितले असले तरी तपशिलातील भूमिका १९ आॅक्टोबरला निकालानंतरच बोलेन, असे सांगितले आहे. ते आपली भूमिका मोकळेपणाने मांडत नसल्याने त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांमध्येही संशय निर्माण झाला आहे. त्यातच सेनेतही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.एकिकडे सामंत यांची ही स्थिती असताना त्यांचे मुख्य स्पर्धक ज्यांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये सामंत यांनी पराभूत केले आहे ते भाजपाचे बाळ माने यांनी आपली यंत्रणा मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासूनच राबविली आहे. त्यांच्या विजयासाठी भाजपाचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारीही जोमाने कामाला लागले आहेत. सामंत आपल्या विरोधात आहेत, शिवसैनिक आपले मित्र आहेत, असे पत्रकारपरिषदेत सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. सामंत यांच्या उमेदवारीने सेनेचे पदाधिकारी उत्साही दिसत आहेत, परंतु शिवसैनिकांत नाराजी आहे, अशी चर्चा आहे. ही नाराजी दूर झाली नाही तर त्याचा फायदा माने यांना होऊ शकतो. राष्ट्रवादीतून बशीर मुर्तुझा रिंगणात आहेत. मुस्लिम समाज त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. परंतु हे चित्र मतदानात प्रत्यक्षात उतरणार का? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काही पदाधिकारी अद्याप राष्ट्रवादीतच आहेत. पक्षातून गेलेल्यांची स्थिती काय असेल हे निकालानंतर कळेलच, असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये दिला आहे. त्यामुळे अन्य लोकांप्रमाणेच रत्नागिरीलाही हा इशारा आहे, असे मानले जात आहे. कॉँग्रेसचे बळ या मतदारसंघात यथातथाच आहे. रमेश कीर कॉँग्रेसमधून उभे आहेत. कॉँग्रेसची पारंपरिक मते त्यांच्या बाजूने असतील. एकूणच ही निवडणूक चौरंगी असली तरी खरी लढत भाजपा-सेनेत होईल, असे चित्र आहे.रत्नागिरीएकूण मतदार २,६५,२७९नावपक्षउदय सामंतशिवसेनारमेश कीरकाँग्रेसदिनेश पवारबसपाबशीर मुर्तुझाराष्ट्रवादीसुरेंद्र तथा बाळ मानेभाजपप्रवीण जाधवबहुजन मु. पार्टीउदय सावंतअपक्षमनिष तळेकरअपक्षनंदकुमार मोहितेअपक्षसुनील सुर्वेअपक्षसंदीप गावडेअपक्ष