शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी भवनसमोर उपोषणे

By admin | Updated: May 4, 2016 00:34 IST

पालकमंत्र्यांचे आश्वासन : महाराष्ट्रदिनी विविध प्रलंबित प्रश्नी लक्ष वेधले

सिंधुदुर्गनगरी : विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १ मे या महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी भवनसमोर पाच उपोषणे झाली. दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने सर्व उपोषणे मागे घेतली.नारायण तलावाच्या बांधकामात अनियमिततावेंगुर्ले शहराला बारमाही पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन नारायण तलावाच्या बांधकामात अनियमितता आली आहे.त्यामुळे वेंगुर्ले शहराला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप वेंगुर्ले नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी केला आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधले आहे. तसेच पावसाच्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण करणे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) व निशाण तलावातील गाळ काढणे, आदी उपाययोजनाही सुचविल्या. मात्र, याकडेही प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला असल्याचे हुले यांनी स्पष्ट केले. हुले यांच्याबरोबरच वेंगुर्ले नागरी कृती समितीचे उपाध्यक्ष भाई मोरजे, सचिव प्रदीप वेंगुर्लेकर, सहसचिव संजय तानावडे, सहखजिनदार राजन वालावलकर उपोषणात सहभागी झाले होते. वेंगुर्ले येथे बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याने उपोषण स्थगित केले.नेरूर ग्रामपंचायतीविरोधात विनोद गावडे यांचे उपोषणअनधिकृत बांधकामाकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी नेरूर गणेशवाडी येथील विनोद भानू गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नं. ९०, हिस्सा नं. ३ मध्ये वामन गावडे यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी एका इमारतीच्या अनधिकृत बांधकामास सुरुवात केली होती. याबाबत त्याचवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली होती. मात्र, ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने हे बांधकाम पूर्ण झाले. ग्रा.पं.च्या या बेजबाबदारपणाबद्दल तालुका लोकशाही दिन व जिल्हा लोकशाही दिनात तक्रार केली. मात्र उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे कोकण आयुक्तांकडे दाद मागण्यात आली. त्यांनी याबाबत निर्देशही दिले. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीवरच कारवाई करावी, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)छाया बावीस्कर यांचे उपोषणदेवजी आवडोजी साठे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून मर्जीतील माणसांना हाताशी धरून मूळ मालकाच्या संमतीशिवाय जबरदस्तीने घरात नळ व वीज जोडणी घेतल्याचा आरोप छाया बावीस्कर यांनी केला आहे. रखवालदार म्हणून राहत असलेला माणूस आमच्या मालकीच्या घरात राहून बेकायदेशीर बांधकामही करत असल्याचा आरोपही बावीस्कर यांनी केला. वेेंगुर्ले नगरपालिकेने दिलेल्या ना हरकत दाखल्यातही मालकाने तक्रार केल्यास नगरपरिषद जबाबदार नसल्याचा उल्लेख केला आहे. घराच्या ताब्याबाबत वेंगुर्ले दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल आहे. मात्र, अनेकवेळा तक्रार अर्ज देऊनही प्रशासन न्याय देत नसल्याने उपोषण छेडत असल्याचे बावीस्कर यांनी सांगितले.