शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

मानवी मनाला भजनातून अतीव समाधान मिळते

By admin | Updated: October 27, 2015 00:13 IST

शंकरराव वैरागकर यांच्याशी संवाद : कसालमधील भजन जुगलबंदी भजन रसिकांसाठी प्रेरणादायी

गिरीश परब-सिंधुदुर्गनगरी -एकाच लयीत लावलेले तानपुरे व त्यांच्या स्वरात चाललेला आमचा गुंजारव ऐकून तल्लीन होणाऱ्या समोरच्या श्रोत्यांमध्ये साक्षात पांडुरंग असतो. तो संवाद आत्म्याची एक वेगळीच अनुभूती देतो. म्हणूनच मानवी मनाला अतीव समाधान भजनातून मिळते, असे उद्गार प्रसिद्ध संगीत भजन गायक पंडित शंकरराव वैरागकर (आप्पा) यांनी काढले. वयाच्या ७१ व्या वर्षी भजनातून साक्षात पांडुरंगाला तल्लीन करणाऱ्या ‘आप्पांचा’ उत्साह एखाद्या विशीतल्या तरुणासारखा दिसत होता. कसाल येथील पावणाई रवळनाथ मंदिरात सांप्रदायिक भजन जुगलबंदी कार्यक्रमात पंडित शंकरराव वैरागकर व तानाजी जाधव यांचे बहारदार भजन झाले. कोकणी भजनी संस्कृती ही वेगळी आहे तर सांप्रदायिक भजन संस्कृती वेगळी आहे. शास्त्रीय संगीताचा आधार घेत संतांचे अभंग नादरुपाने श्रोत्यांना सोपे करून सांगण्याचे काम दोघांनी केले. यावेळी कसाल पंचक्रोशीतील हजारो श्रोत्यांचे कान तृप्त झाले. आपल्या संगीत साधनेविषयी दोघांशी साधलेले हे हितगुज...पंडित शंकरराव वैरागकर (आप्पा)सिंधुदुर्गात म्हणजेच तळकोकणात प्रथमच आलेल्या आप्पांना सिंधुदुर्गच्या आसमंतातील संगीताने लुब्ध केले. एकतारी भजनाची परंपरा असलेल्या आप्पांच्या घराण्यात शैव पंथाचा पगडा होता. वयाच्या दोन वर्षापासून कोणताही गुरु न घेता मोडकी तोडकी हातपेटी वाजविणे व गाणे म्हणणे हा त्यांचा छंद होता. त्याकाळी लातूरसारख्या जिल्ह्यात सावकारी असलेल्या वैरागकरांच्या घराण्यात गाणे म्हणणारा व त्यात तल्लीन होणारा कोणी जन्मला नव्हता. आपला मुलगा वकील किंवा डॉक्टर व्हावा अशी अपेक्षा असणाऱ्या घराण्यातून आपल्याला संगीत साधना करता येणार नाही म्हणून १० वर्षांचे असताना आप्पांनी घरातून पलायन केले व पंडित बसवराज राजगुरु (सोलापूर) यांच्याकडे संगीत साधना सुरु केली. त्यानंतर गदग येथे व्यंकटेशकुमार व पुणे येथे पद्माकर कुलकर्णी यांच्याकडेही ते संगीत शिकले. यावेळी सावकारी असलेल्या या साधकानी प्रसंगी पोट भरण्यासाठी पर्वतीला भीकही मागितली. याचवेळी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या मैफिलीमध्ये तानपुरा वाजविण्याची संधी त्यांना मिळाली आणि तेथून त्यांच्या एका वेगळ्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली. कलकत्त्याला पंडित व्ही. जी. जोग यांच्याकडे शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यावर रशिद खाँ, गिरीजादेवी अशा मातब्बर गायकांच्या सान्निध्यात संगीत साधना करता आली. प्रा. तानाजी जाधवशब्द, तान आणि खर्जापासून तारसप्तकापर्यंत फिरणारा मोकळा आवाज अशी ओळख असलेल्या प्राध्यापक तानाजी जाधव यांनी या जुगलबंदीमध्ये एक वेगळेच भावविश्व निर्माण केले. उत्तराखंड येथे एका आंतरराष्ट्रीय शाळेत संगीत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या तानाजी जाधव यांनी दोन दिवसांचा प्रवास करून कसालसारख्या एका छोटेखानी गावातील श्रोत्यांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपला शिणवटा कुठच्या कुठे पळून गेला असेही ते विनयाने म्हणाले.अहमदनगर जिल्ह्यातील पाटमेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील तानाजी जाधव यांचे आजोबा दरबार गायक होते. त्यामुळे गायनाची परंपरा घराण्यातूनच मिळाली. सांप्रदायिक भजन वेगळे आहे. यामध्ये असलेले रुपाचे, ध्यानाचे अभंग, संत अभंग, गौळण, उपदेशपर अभंग यातील शब्दांच्या भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे म्हणजेच देवाला आपलेसे करून घेणे आहे. भावार्थ लक्षात घेऊन ज्यावेळी आपण संगीत गातो तो एक अवर्णनीय आनंद असतो असेही ते म्हणाले. आताच्या भजनांमध्ये काहीवेळा सिनेमातील गाण्यांच्या चालींचा वापर होतो त्याला प्रसारमाध्यमे कारणीभूत आहेत. मात्र परमेश्वराच्याजवळ जाण्याच्या दृष्टीने संगीताला शास्त्रीय संगीताबरोबरच आध्यात्मिकतेचा बाज असणे आवश्यक आहे. असेही तानाजी जाधव यांनी सांगितले.