शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

स्थलांतरित कुटुंबांना मदतीचा हात

By admin | Updated: May 12, 2016 23:44 IST

कोकण कला, शिक्षण विकास संस्थेचा उपक्रम : शेकडो लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बांदा : विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसत असून, तेथील जनता पाण्याअभावी इतर भागांमध्ये स्थलांतर करीत आहेत. नांदेड येथून मुंबई-घाटकोपर येथे आलेल्या स्थलांतरित शेकडो लोकांना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने खाऊचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच या कुटुंबीयांना शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी यावेळी दिले.यावर्षी भीषण दुष्काळ पडल्याने हजारो लोक आपल्या कुटुंबासह आपली गावे सोडून मुंबई परिसरात रहायला आली आहेत. या स्थलांतरित कुटुंबांची घाटकोपर येथील मैदानात राहण्याची सोय करण्यात आली आहे. या कुटुंबांचा अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. समाजातील बरेच दाते या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी पुढे येत आहेत. अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था तसेच अंथरूण यांची गरज इथे मोठ्या प्रमाणात भासत आहे. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल हे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून नेहमीच मुंबई व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजूंना मदत करत असतात. तसेच ते शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करत असतात. यावेळी संस्थेचे महेश बिर्जे, विश्वनाथ बेटकर, सुधीर राणे, राजेंद्र फणसगावकर, अन्वर अन्सारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदतीसाठी पुढे यावेदुष्काळग्रस्तांच्या गरजा जाणून घेऊन त्यांना तात्पुरते राहण्यासाठी तंबू, झोपण्यासाठी चटई, चादर, औषधे, अन्नधान्य आणि कपड्यांचे येत्या काही दिवसांत वाटप करण्यात येईल, असे आश्वासन कुबल यांनी दिले. मुंबई येथे अशा राहत असलेल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.