शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

कोकणात गारपीटीचा इशारा

By admin | Updated: March 12, 2015 00:02 IST

बागायतदार हवालदिल : हवामान खात्याने दिला सावधगिरीच्या सूचना

रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर परिसराला मंगळवारी सकाळी गारपीटीच्या पावसाने झोडपल्यानंतर हवामान खात्याने संपूर्ण कोकण परिसराला १६ मार्चपर्यंत गारपीटीसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वीच्या पावसातून सावरलेल्या आंबा व काजू बागायतदारांसमोर पुन्हा एक नवे संकट उभे राहिले आहे.काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार आगमन केले होते. त्यानंतर शिमगोत्सवात पावसाने विश्रांती घेणे पसंत केले. आता मंगळवारपासून अवकाळी पाऊस पुन्हा बरसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात तर गारपीटीसह पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील बागायतदार अडचणीत सापडण्याची शक्यता पुन्हा दुणावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात मंगळवार कोरडा गेला असला, तरी या भागात उकाडा सुरु झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस दाखल होण्याची शक्यता शेतकऱ्यांसह हवामान खात्यानेही व्यक्त केली आहे. हवामान आधारित कृषी सल्ला समितीने कोकण परिसरात १६ मार्चपर्यंत हलक्या प्रमाणात गारपीट होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे परिपक्व झालेल्या फळांची त्वरित काढणी करून तो माल विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावा, असे आवाहन या समितीने केले आहे.हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज आणि काही तालुक्यांमधील सतत बदलते वातावरण यामुळे बागायतदार निराश झाला आहे. पुन्हा औषध फवारणी सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या बागायतदारांना पावसाने पुन्हा एक फटका दिला आहे.१५ दिवस विश्रांतीवर गेलेल्या पावसाने सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कब्जा सुरु केला आहे. बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर उर्वरित ठिकाणीही पावसाने आपली लक्षणे दाखवण्यास सुरूवात केली आहे. सध्या जिल्ह्यातून हापूस वाशी मार्केटच्या दिशेने आगेकूच करत असतानाच जिल्ह्यातील बागायतदारांसमोर पुन्हा पावसाचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजांमुळे बागायतदारांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)मेघगर्जनेसह होणार पाऊस...हवामान खात्याने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी १६ मार्चपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण वगळता इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या प्रमाणात गारपीट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे विशेष पत्र कृषी उपसंचालक (माहिती) पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुूळे कोकणात आणखी पाच दिवस तरी पावसाळी वातावरण राहणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे.