शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

कोकणात गारपीटीचा इशारा

By admin | Updated: March 12, 2015 00:02 IST

बागायतदार हवालदिल : हवामान खात्याने दिला सावधगिरीच्या सूचना

रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर परिसराला मंगळवारी सकाळी गारपीटीच्या पावसाने झोडपल्यानंतर हवामान खात्याने संपूर्ण कोकण परिसराला १६ मार्चपर्यंत गारपीटीसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वीच्या पावसातून सावरलेल्या आंबा व काजू बागायतदारांसमोर पुन्हा एक नवे संकट उभे राहिले आहे.काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार आगमन केले होते. त्यानंतर शिमगोत्सवात पावसाने विश्रांती घेणे पसंत केले. आता मंगळवारपासून अवकाळी पाऊस पुन्हा बरसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात तर गारपीटीसह पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील बागायतदार अडचणीत सापडण्याची शक्यता पुन्हा दुणावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात मंगळवार कोरडा गेला असला, तरी या भागात उकाडा सुरु झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस दाखल होण्याची शक्यता शेतकऱ्यांसह हवामान खात्यानेही व्यक्त केली आहे. हवामान आधारित कृषी सल्ला समितीने कोकण परिसरात १६ मार्चपर्यंत हलक्या प्रमाणात गारपीट होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे परिपक्व झालेल्या फळांची त्वरित काढणी करून तो माल विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावा, असे आवाहन या समितीने केले आहे.हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज आणि काही तालुक्यांमधील सतत बदलते वातावरण यामुळे बागायतदार निराश झाला आहे. पुन्हा औषध फवारणी सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या बागायतदारांना पावसाने पुन्हा एक फटका दिला आहे.१५ दिवस विश्रांतीवर गेलेल्या पावसाने सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कब्जा सुरु केला आहे. बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर उर्वरित ठिकाणीही पावसाने आपली लक्षणे दाखवण्यास सुरूवात केली आहे. सध्या जिल्ह्यातून हापूस वाशी मार्केटच्या दिशेने आगेकूच करत असतानाच जिल्ह्यातील बागायतदारांसमोर पुन्हा पावसाचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजांमुळे बागायतदारांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)मेघगर्जनेसह होणार पाऊस...हवामान खात्याने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी १६ मार्चपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण वगळता इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या प्रमाणात गारपीट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे विशेष पत्र कृषी उपसंचालक (माहिती) पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुूळे कोकणात आणखी पाच दिवस तरी पावसाळी वातावरण राहणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे.