शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग?

By admin | Updated: February 11, 2016 00:31 IST

बाजारपेठांना सुरुंग : व्यापाऱ्यांचे विस्थापन होण्याची शक्यता

शृंगारतळी : गुहागर - विजापूर राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याच्या चर्चेने या मार्गावरील व्यावसायिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य महामार्गावर वसलेल्या बाजारपेठेत लाखो रूपये खर्च करून व्यावसायिकांनी विकत घेतलेले गाळे व स्थिरावलेले धंदे रस्ता चौपदरीकरणात जाणार, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे.गुहागर ते विजापूर ३२० किमी अंतर असणाऱ्या मार्गावर अनेक बाजारपेठा वसलेल्या आहेत. गुहागरपासून सुरुवात केल्यास तालुक्यातील सर्वांत मोठी शृंगारतळी बाजारपेठ, मार्गताम्हाणे, चिपळूण, खेर्डी, शिरगाव, अलोरे, पोफळी, पाटण, कडेपूर, विटा, जत, विजापूरपर्यंत अनेक लहान मोठ्या बाजारपेठा व रस्त्यालगत घरे आहेत. सध्या गुहागर ते चिपळूण दोन लेनचा मजबूत रस्ता आहे.पुढेही काही ठिकाणी दोन लेन, तर काही ठिकाणी एकदिशा मार्ग आहे. सध्या गुहागर तालुक्यात दाभोळ वीज प्रकल्पवगळता कुठलीही मोठी कंपनी नाही. तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडियन आॅईल यांचा एकत्रित साठ दशलक्ष टनाचा तेल शुध्दीकरण प्रकल्प येणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुहागरात केली होती. मात्र, त्याअनुषंगाने कंपनी सुरू होण्याच्या हालचाली मात्र दिसत नाहीत. त्यामुळे सध्या या मार्गावर त्या प्रमाणात रहदारी नाही. मात्र, भविष्यात या मार्गावर रहदारी वाढू शकते आणि त्यावेळी मात्र या मार्ग चौपदरीकरणाच्या मागणीला आणखीन गती येऊ शकते.चौपदरीकरणासाठी किती कालावधी लागेल, हे कोणी सांगू शकत नाही. मात्र, चार - पाच वर्षे असा मोघम कालावधी सांगितला जात आहे. विशेष म्हणजे या रस्ता प्रकल्पात ज्यांची जागा जाणार आहे, त्यांना मोबदला दांडगा मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे विस्थापन होण्याची भीती आहे. महामार्ग चौपदरीकीरणासाठी शहराला एकास दोन, तर ग्रामीण भागात एकास चार असा दर लागू करण्यात येणार आहे.सरकारी रेडीरेकनरच्या दुप्पट मोबदला शहरात, तर ग्रामीण भागात चारपट मोबदला मिळणार आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करताना घाटात ३० मीटर रूंदी, शहरात ४५ मीटर रूंदी, ग्रामीण भागात ६० मीटर रूंदीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. (वार्ताहर)सांगलीतून मागणी : लोकप्रतिनिधींनीही लावला जोरविशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील लोकांची चौपदरीकरणासाठी विशेष मागणी होती. त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनीही चौपदरीकरणासाठी विशेष जोर लावला होता आणि ही मागणी तडीस नेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही मागणी करण्यास सुरुवात केल्याने हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होण्याची चिन्हे आहेत.चौपदरीकरण गरजगीते यांनी घोषणा केल्याप्रमाणे भविष्यात खरोखरच पेट्रोलियम कंपनी अस्तित्त्वात येईल व चिपळूण कराड रेल्वे मार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मात्र या मार्गाच्या चौपदरीकरणाची गरज भासणार आहे.