शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग?

By admin | Updated: February 11, 2016 00:31 IST

बाजारपेठांना सुरुंग : व्यापाऱ्यांचे विस्थापन होण्याची शक्यता

शृंगारतळी : गुहागर - विजापूर राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याच्या चर्चेने या मार्गावरील व्यावसायिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य महामार्गावर वसलेल्या बाजारपेठेत लाखो रूपये खर्च करून व्यावसायिकांनी विकत घेतलेले गाळे व स्थिरावलेले धंदे रस्ता चौपदरीकरणात जाणार, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे.गुहागर ते विजापूर ३२० किमी अंतर असणाऱ्या मार्गावर अनेक बाजारपेठा वसलेल्या आहेत. गुहागरपासून सुरुवात केल्यास तालुक्यातील सर्वांत मोठी शृंगारतळी बाजारपेठ, मार्गताम्हाणे, चिपळूण, खेर्डी, शिरगाव, अलोरे, पोफळी, पाटण, कडेपूर, विटा, जत, विजापूरपर्यंत अनेक लहान मोठ्या बाजारपेठा व रस्त्यालगत घरे आहेत. सध्या गुहागर ते चिपळूण दोन लेनचा मजबूत रस्ता आहे.पुढेही काही ठिकाणी दोन लेन, तर काही ठिकाणी एकदिशा मार्ग आहे. सध्या गुहागर तालुक्यात दाभोळ वीज प्रकल्पवगळता कुठलीही मोठी कंपनी नाही. तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडियन आॅईल यांचा एकत्रित साठ दशलक्ष टनाचा तेल शुध्दीकरण प्रकल्प येणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुहागरात केली होती. मात्र, त्याअनुषंगाने कंपनी सुरू होण्याच्या हालचाली मात्र दिसत नाहीत. त्यामुळे सध्या या मार्गावर त्या प्रमाणात रहदारी नाही. मात्र, भविष्यात या मार्गावर रहदारी वाढू शकते आणि त्यावेळी मात्र या मार्ग चौपदरीकरणाच्या मागणीला आणखीन गती येऊ शकते.चौपदरीकरणासाठी किती कालावधी लागेल, हे कोणी सांगू शकत नाही. मात्र, चार - पाच वर्षे असा मोघम कालावधी सांगितला जात आहे. विशेष म्हणजे या रस्ता प्रकल्पात ज्यांची जागा जाणार आहे, त्यांना मोबदला दांडगा मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे विस्थापन होण्याची भीती आहे. महामार्ग चौपदरीकीरणासाठी शहराला एकास दोन, तर ग्रामीण भागात एकास चार असा दर लागू करण्यात येणार आहे.सरकारी रेडीरेकनरच्या दुप्पट मोबदला शहरात, तर ग्रामीण भागात चारपट मोबदला मिळणार आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करताना घाटात ३० मीटर रूंदी, शहरात ४५ मीटर रूंदी, ग्रामीण भागात ६० मीटर रूंदीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. (वार्ताहर)सांगलीतून मागणी : लोकप्रतिनिधींनीही लावला जोरविशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील लोकांची चौपदरीकरणासाठी विशेष मागणी होती. त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनीही चौपदरीकरणासाठी विशेष जोर लावला होता आणि ही मागणी तडीस नेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही मागणी करण्यास सुरुवात केल्याने हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होण्याची चिन्हे आहेत.चौपदरीकरण गरजगीते यांनी घोषणा केल्याप्रमाणे भविष्यात खरोखरच पेट्रोलियम कंपनी अस्तित्त्वात येईल व चिपळूण कराड रेल्वे मार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मात्र या मार्गाच्या चौपदरीकरणाची गरज भासणार आहे.