शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग?

By admin | Updated: February 11, 2016 00:31 IST

बाजारपेठांना सुरुंग : व्यापाऱ्यांचे विस्थापन होण्याची शक्यता

शृंगारतळी : गुहागर - विजापूर राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याच्या चर्चेने या मार्गावरील व्यावसायिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य महामार्गावर वसलेल्या बाजारपेठेत लाखो रूपये खर्च करून व्यावसायिकांनी विकत घेतलेले गाळे व स्थिरावलेले धंदे रस्ता चौपदरीकरणात जाणार, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे.गुहागर ते विजापूर ३२० किमी अंतर असणाऱ्या मार्गावर अनेक बाजारपेठा वसलेल्या आहेत. गुहागरपासून सुरुवात केल्यास तालुक्यातील सर्वांत मोठी शृंगारतळी बाजारपेठ, मार्गताम्हाणे, चिपळूण, खेर्डी, शिरगाव, अलोरे, पोफळी, पाटण, कडेपूर, विटा, जत, विजापूरपर्यंत अनेक लहान मोठ्या बाजारपेठा व रस्त्यालगत घरे आहेत. सध्या गुहागर ते चिपळूण दोन लेनचा मजबूत रस्ता आहे.पुढेही काही ठिकाणी दोन लेन, तर काही ठिकाणी एकदिशा मार्ग आहे. सध्या गुहागर तालुक्यात दाभोळ वीज प्रकल्पवगळता कुठलीही मोठी कंपनी नाही. तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडियन आॅईल यांचा एकत्रित साठ दशलक्ष टनाचा तेल शुध्दीकरण प्रकल्प येणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुहागरात केली होती. मात्र, त्याअनुषंगाने कंपनी सुरू होण्याच्या हालचाली मात्र दिसत नाहीत. त्यामुळे सध्या या मार्गावर त्या प्रमाणात रहदारी नाही. मात्र, भविष्यात या मार्गावर रहदारी वाढू शकते आणि त्यावेळी मात्र या मार्ग चौपदरीकरणाच्या मागणीला आणखीन गती येऊ शकते.चौपदरीकरणासाठी किती कालावधी लागेल, हे कोणी सांगू शकत नाही. मात्र, चार - पाच वर्षे असा मोघम कालावधी सांगितला जात आहे. विशेष म्हणजे या रस्ता प्रकल्पात ज्यांची जागा जाणार आहे, त्यांना मोबदला दांडगा मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे विस्थापन होण्याची भीती आहे. महामार्ग चौपदरीकीरणासाठी शहराला एकास दोन, तर ग्रामीण भागात एकास चार असा दर लागू करण्यात येणार आहे.सरकारी रेडीरेकनरच्या दुप्पट मोबदला शहरात, तर ग्रामीण भागात चारपट मोबदला मिळणार आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करताना घाटात ३० मीटर रूंदी, शहरात ४५ मीटर रूंदी, ग्रामीण भागात ६० मीटर रूंदीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. (वार्ताहर)सांगलीतून मागणी : लोकप्रतिनिधींनीही लावला जोरविशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील लोकांची चौपदरीकरणासाठी विशेष मागणी होती. त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनीही चौपदरीकरणासाठी विशेष जोर लावला होता आणि ही मागणी तडीस नेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही मागणी करण्यास सुरुवात केल्याने हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होण्याची चिन्हे आहेत.चौपदरीकरण गरजगीते यांनी घोषणा केल्याप्रमाणे भविष्यात खरोखरच पेट्रोलियम कंपनी अस्तित्त्वात येईल व चिपळूण कराड रेल्वे मार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मात्र या मार्गाच्या चौपदरीकरणाची गरज भासणार आहे.