शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पालकमंत्र्यांच्या ‘सेटलमेंट’चा निषेध

By admin | Updated: December 5, 2015 23:32 IST

आचरा देवस्थान जमीन प्रश्न पेटला : तीव्र आंदोलनाचीही ग्रामस्थांची तयारी, सरपंचांची माहिती

आचरा : आचरा देवस्थान इनाम जमीनप्रश्नी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या देवस्थान ट्रस्टशी ग्रामस्थांनी ‘सेटलमेंट’ करा. या विधानावर आचरा ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. आम्हा ग्रामस्थांचे पूजनीय असे रामेश्वर देवस्थान आहे. त्या देवालयातील दान वरिष्ठ कब्जेदार आणि कनिष्ठ कब्जेदार ग्रामस्थावर न्यायालयीन दावे टाकून खर्ची करत आहेत. देवस्थान कमिटीवरील घराणेशाहीवर निवडून आलेली मंडळी स्वत:च्या फायद्यासाठी देवाच्या नावाचा गैरवापर वापर करून आपली तिजोरी भरत आहेत. गावात हुकूमशाहीची जुलमी राजवट सुरु आहे, असा आरोप करत यापुढे हे प्रकार न थांबल्यास गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होईल याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशारा सरपंच मंगेश टेमकर यांनी दिला. दरम्यान, आचऱ्यातील ८८७ एकर शासनाची जागाही या राजवटीत कुठे गेली? ते पालकमंत्र्यांनी शोधून दाखवावे. प्रसंगी या जागेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत आचरा ग्रामस्थांची जमीन प्रश्नी पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवार १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता विशेष ग्रामसभा बोलावण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आचरा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंगेश टेमकर बोलत होते. यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्य चंदन पांगे, रेश्मा कांबळी, श्रद्धा सक्रू, अवधूत हळदणकर, जगदीश पांगे, सुभाष नलावडे, अशोक मालवणकर, बबन सक्रू, नारायण वराडकर, विनोद मुणगेकर, जुबेर काझी, रवींद्र मुणगेकर, माजी सरपंच श्याम घाडी, भालचंद्र सक्रू आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) देवस्थानची केवळ २१ एकरच जागा आचरा गावाची साडेसहा हजाराहून अधिक लोकसंख्या आहे. तसेच ४ हजार ९४७ एकर जमीन आहे. यातील देवस्थानच्या नावावर २१ एकर जागा तर १ हजार ७७ एकर सारा जमीन आहे. २६३ एकर गनीम इनाम जमीन, ८८७ एकर शासन जमीन, तर १८५१ वर्ग एक (खालसा) आहे. असे असताना शासनाची ८८७ एकर रस्ते, पाणंद, विहीर, खारी जमीन, स्मशानभूमी, किनारपट्टीवरील जमीन गेली कुठे याचा पालकमंत्री व शासनाने अभ्यास करावा. १७ डिसेंबरच्या ग्रामसभेत पुढील निर्णय यावेळी ग्रामस्थांनी सरपंच टेमकर व आमदार नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव १७ तारीखच्या ग्रामसभेत घेवू असे सांगत यापुढे पालकमंत्र्यांच्या बैठकीला जायचे की नाही तसेच या जमीन वादावर पुढील आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी १७ डिसेंबर रोजीच ग्रामसभेत निर्णय घेतला जाईल, असे मंगेश टेमकर व ग्रामस्थांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आचऱ्यातील हा वाद वाढण्यास मदत होणार आहे, एवढे मात्र निश्चित.