शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

पालकमंत्र्यांच्या ‘सेटलमेंट’चा निषेध

By admin | Updated: December 5, 2015 23:32 IST

आचरा देवस्थान जमीन प्रश्न पेटला : तीव्र आंदोलनाचीही ग्रामस्थांची तयारी, सरपंचांची माहिती

आचरा : आचरा देवस्थान इनाम जमीनप्रश्नी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या देवस्थान ट्रस्टशी ग्रामस्थांनी ‘सेटलमेंट’ करा. या विधानावर आचरा ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. आम्हा ग्रामस्थांचे पूजनीय असे रामेश्वर देवस्थान आहे. त्या देवालयातील दान वरिष्ठ कब्जेदार आणि कनिष्ठ कब्जेदार ग्रामस्थावर न्यायालयीन दावे टाकून खर्ची करत आहेत. देवस्थान कमिटीवरील घराणेशाहीवर निवडून आलेली मंडळी स्वत:च्या फायद्यासाठी देवाच्या नावाचा गैरवापर वापर करून आपली तिजोरी भरत आहेत. गावात हुकूमशाहीची जुलमी राजवट सुरु आहे, असा आरोप करत यापुढे हे प्रकार न थांबल्यास गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होईल याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशारा सरपंच मंगेश टेमकर यांनी दिला. दरम्यान, आचऱ्यातील ८८७ एकर शासनाची जागाही या राजवटीत कुठे गेली? ते पालकमंत्र्यांनी शोधून दाखवावे. प्रसंगी या जागेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत आचरा ग्रामस्थांची जमीन प्रश्नी पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवार १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता विशेष ग्रामसभा बोलावण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आचरा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंगेश टेमकर बोलत होते. यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्य चंदन पांगे, रेश्मा कांबळी, श्रद्धा सक्रू, अवधूत हळदणकर, जगदीश पांगे, सुभाष नलावडे, अशोक मालवणकर, बबन सक्रू, नारायण वराडकर, विनोद मुणगेकर, जुबेर काझी, रवींद्र मुणगेकर, माजी सरपंच श्याम घाडी, भालचंद्र सक्रू आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) देवस्थानची केवळ २१ एकरच जागा आचरा गावाची साडेसहा हजाराहून अधिक लोकसंख्या आहे. तसेच ४ हजार ९४७ एकर जमीन आहे. यातील देवस्थानच्या नावावर २१ एकर जागा तर १ हजार ७७ एकर सारा जमीन आहे. २६३ एकर गनीम इनाम जमीन, ८८७ एकर शासन जमीन, तर १८५१ वर्ग एक (खालसा) आहे. असे असताना शासनाची ८८७ एकर रस्ते, पाणंद, विहीर, खारी जमीन, स्मशानभूमी, किनारपट्टीवरील जमीन गेली कुठे याचा पालकमंत्री व शासनाने अभ्यास करावा. १७ डिसेंबरच्या ग्रामसभेत पुढील निर्णय यावेळी ग्रामस्थांनी सरपंच टेमकर व आमदार नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव १७ तारीखच्या ग्रामसभेत घेवू असे सांगत यापुढे पालकमंत्र्यांच्या बैठकीला जायचे की नाही तसेच या जमीन वादावर पुढील आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी १७ डिसेंबर रोजीच ग्रामसभेत निर्णय घेतला जाईल, असे मंगेश टेमकर व ग्रामस्थांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आचऱ्यातील हा वाद वाढण्यास मदत होणार आहे, एवढे मात्र निश्चित.