शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

पालकमंत्र्यांना इतिवृत्तावर सहीला वेळ नाही

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

परशुराम उपरकर : वचनपूर्ती अहवालातून दिशाभूल

कणकवली : जिल्हा नियोजन बैठकीच्या इतिवृत्तावर सही करायला पालकमंत्री दीपक केसरकर यांना वेळ नाही. तेच केसरकर आपल्या वचनपूर्ती अहवालातूनही जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शुक्रवारी येथील पत्रकार परिषदेतून केली. उपरकर म्हणाले की, शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त पालकमंत्री केसरकर यांनी प्रसिद्ध केलेला वचनपूर्ती अहवाल म्हणजे फसव्या पालकमंत्र्यांचा फसवा अहवाल आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून १२५ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे म्हटले असून, हा संशोधनाचा विषय आहे. प्रसिद्धी माध्यमातून रस्ते, पुलांसाठी १०० कोटी रुपये आणल्याचे केसरकर सांगत असले, तरी माहितीच्या अधिकारात अशी कोणतीही तरतूद झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिलारी धरणग्रस्तांसाठी १२ कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान दिल्याचे केसरकर आपल्या अहवालातून सांगत असले, तरी हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अद्याप धरणग्रस्त वनटाईम सेटलमेंटप्रश्नी उपोषण करीत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांतून झालेल्या सावंतवाडी टर्मिनसचे श्रेय केसरकर आपल्या खात्यावर टाकीत आहेत. केंद्राचा प्रकल्प असलेल्या हत्ती पकड मोहिमेसाठी ३८ लाखांचा खर्च झाला. त्या मोहिमेत प्रत्यक्षात तीन हत्ती मरण पावले. या निधीत मोठा भ्रष्टाचार आहे. पर्यटनासाठी कोट्यवधी रुपये आणणार असल्याचे केसरकर सांगतात. प्रत्यक्षात ५० लाखांपैकी ३७ लाख रुपये एकट्या ‘कॉफीटेबल बुक’वर खर्च झाले. आठ लाख रुपये फक्त पर्यटनाच्या अहवालावर खर्च झाले आहेत. कॉफीटेबल बुकमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. चिपी विमानतळ ते गोवा विमानतळ या मार्गासाठी १७८ कोटी प्रस्तावित असल्याचे अहवालात सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. आरोग्य सुविधांसाठी २३ कोटीची तरतूद असताना आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी दोन वेळा केली. मात्र, रुग्णांचे हाल अद्याप सुरू आहेत. (प्रतिनिधी)पालकमंत्री वागतात पाहुण्यांसारखेजिल्ह्याचे पालकमंत्री स्वत:च्या जिल्ह्यातच पाहुण्यांसारखे वागतात. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांबद्दलही त्यांना आस्था नाही. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलीस स्थानकाविरोधात शिवसैनिकांना उपोषणाला बसावे लागते. सत्तेत असल्याचे समाधानही कार्यकर्त्यांना मिळत नसल्याचे दिसत आहे. पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने अधिकारी जिल्ह्याला लुटत आहेत, अशी टीका उपरकर यांनी केली.हत्ती मोहिमेच्या निधीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.