शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना इतिवृत्तावर सहीला वेळ नाही

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

परशुराम उपरकर : वचनपूर्ती अहवालातून दिशाभूल

कणकवली : जिल्हा नियोजन बैठकीच्या इतिवृत्तावर सही करायला पालकमंत्री दीपक केसरकर यांना वेळ नाही. तेच केसरकर आपल्या वचनपूर्ती अहवालातूनही जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शुक्रवारी येथील पत्रकार परिषदेतून केली. उपरकर म्हणाले की, शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त पालकमंत्री केसरकर यांनी प्रसिद्ध केलेला वचनपूर्ती अहवाल म्हणजे फसव्या पालकमंत्र्यांचा फसवा अहवाल आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून १२५ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे म्हटले असून, हा संशोधनाचा विषय आहे. प्रसिद्धी माध्यमातून रस्ते, पुलांसाठी १०० कोटी रुपये आणल्याचे केसरकर सांगत असले, तरी माहितीच्या अधिकारात अशी कोणतीही तरतूद झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिलारी धरणग्रस्तांसाठी १२ कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान दिल्याचे केसरकर आपल्या अहवालातून सांगत असले, तरी हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अद्याप धरणग्रस्त वनटाईम सेटलमेंटप्रश्नी उपोषण करीत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांतून झालेल्या सावंतवाडी टर्मिनसचे श्रेय केसरकर आपल्या खात्यावर टाकीत आहेत. केंद्राचा प्रकल्प असलेल्या हत्ती पकड मोहिमेसाठी ३८ लाखांचा खर्च झाला. त्या मोहिमेत प्रत्यक्षात तीन हत्ती मरण पावले. या निधीत मोठा भ्रष्टाचार आहे. पर्यटनासाठी कोट्यवधी रुपये आणणार असल्याचे केसरकर सांगतात. प्रत्यक्षात ५० लाखांपैकी ३७ लाख रुपये एकट्या ‘कॉफीटेबल बुक’वर खर्च झाले. आठ लाख रुपये फक्त पर्यटनाच्या अहवालावर खर्च झाले आहेत. कॉफीटेबल बुकमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. चिपी विमानतळ ते गोवा विमानतळ या मार्गासाठी १७८ कोटी प्रस्तावित असल्याचे अहवालात सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. आरोग्य सुविधांसाठी २३ कोटीची तरतूद असताना आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी दोन वेळा केली. मात्र, रुग्णांचे हाल अद्याप सुरू आहेत. (प्रतिनिधी)पालकमंत्री वागतात पाहुण्यांसारखेजिल्ह्याचे पालकमंत्री स्वत:च्या जिल्ह्यातच पाहुण्यांसारखे वागतात. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांबद्दलही त्यांना आस्था नाही. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलीस स्थानकाविरोधात शिवसैनिकांना उपोषणाला बसावे लागते. सत्तेत असल्याचे समाधानही कार्यकर्त्यांना मिळत नसल्याचे दिसत आहे. पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने अधिकारी जिल्ह्याला लुटत आहेत, अशी टीका उपरकर यांनी केली.हत्ती मोहिमेच्या निधीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.