शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पालकमंत्री निष्क्रिय ठरले

By admin | Updated: April 8, 2016 23:56 IST

परशुराम उपरकर यांचा आरोप : सत्ताधाऱ्यांचेच अधिकारी ऐकत नसल्याची खंत

मालवण : काँग्रेसला धुडकावून लावत केंद्रात आणि राज्यात युतीचे शासन आहे. कोकणा-तील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, तेच सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत आहेत. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवताना आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सत्ताधाऱ्यांत रंगले आहे. आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी अधिकारी करत नाही, असे विधानसभेत सांगण्याची वेळ सत्ताधारी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर येते याचाच अर्थ त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री निष्क्रिय बनले आहेत, असा आरोप करत, माजी आमदार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शिवसेनेवर प्रहार केला. दरम्यान, मालवण आनंदव्हाळ-कसाल या मुख्य रस्त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या डांबरीकरण कामात वापरण्यात आलेल्या साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी केली. या तपासणीत २७ टक्के डांबर प्रमाण कमी असण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे सर्वच रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून, जनतेच्या पैशांचा डल्ला मारण्याचे काम हे सरकार व ठेकेदार मंडळी करत आहेत असे सांगत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचे उपरकर यांनी मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष गणेश वाईरकर, शैलेश अंधारी, भिवा शिरोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, मालवण आनंदव्हाळ-कसाल या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याच्या कामात वापरलेल्या साहित्याचे नमुने घेत ते मनसेच्यावतीने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या साहित्याच्या तपासणीत प्रत्यक्षात ३.५ एवढ्या प्रमाणात डांबराचा वापर करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात २.५६ एवढेच डांबर म्हणजे सुमारे २७ टक्के डांबर कमी वापरण्यात आले असल्याचे दिसून आले. पाटबंधाऱ्यांच्या कामांना निधी नाही, वन संज्ञाप्रश्न ते सोडवू शकले नाहीत. विरोधी पक्षांना जे प्रश्न मांडायला हवेत, तेच प्रश्न मांडण्याची वेळ सत्तेतील आमदारांवर आली. आरोग्याचा प्रश्न अधांतरीच राहिला असून, जिल्ह्यातील आंबा नुकसान भरपाईचीही दाखल या अधिवेशनात घेण्यात आली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री कोटीच्या विकासाच्या घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात त्या योजना अधिकारी वर्गाला माहीतच नसतात. त्यामुळे जनतेची फसवणूक केली जात आहे. (प्रतिनिधी)कोकणातील जनतेचा भ्रमनिरासकाँग्रेसने जिल्ह्याचे वाटोळे केले. त्यानंतर सत्तेत एकत्र आलेले शिवसेना-भाजप एकमेकांच्या विरोधात शत-प्रतिशत सांगत असून, दुसरीकडे जनतेचा भ्रमनिरास करत आहेत. काँग्रेसला धुडकावून कोकणातील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, त्यांनीच कोकणातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्याचे काम केले आहे, असा आरोपही उपरकर यांनी केला आहे.