शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

पालकमंत्री निष्क्रिय ठरले

By admin | Updated: April 8, 2016 23:56 IST

परशुराम उपरकर यांचा आरोप : सत्ताधाऱ्यांचेच अधिकारी ऐकत नसल्याची खंत

मालवण : काँग्रेसला धुडकावून लावत केंद्रात आणि राज्यात युतीचे शासन आहे. कोकणा-तील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, तेच सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत आहेत. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवताना आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सत्ताधाऱ्यांत रंगले आहे. आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी अधिकारी करत नाही, असे विधानसभेत सांगण्याची वेळ सत्ताधारी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर येते याचाच अर्थ त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री निष्क्रिय बनले आहेत, असा आरोप करत, माजी आमदार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शिवसेनेवर प्रहार केला. दरम्यान, मालवण आनंदव्हाळ-कसाल या मुख्य रस्त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या डांबरीकरण कामात वापरण्यात आलेल्या साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी केली. या तपासणीत २७ टक्के डांबर प्रमाण कमी असण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे सर्वच रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून, जनतेच्या पैशांचा डल्ला मारण्याचे काम हे सरकार व ठेकेदार मंडळी करत आहेत असे सांगत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचे उपरकर यांनी मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष गणेश वाईरकर, शैलेश अंधारी, भिवा शिरोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, मालवण आनंदव्हाळ-कसाल या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याच्या कामात वापरलेल्या साहित्याचे नमुने घेत ते मनसेच्यावतीने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या साहित्याच्या तपासणीत प्रत्यक्षात ३.५ एवढ्या प्रमाणात डांबराचा वापर करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात २.५६ एवढेच डांबर म्हणजे सुमारे २७ टक्के डांबर कमी वापरण्यात आले असल्याचे दिसून आले. पाटबंधाऱ्यांच्या कामांना निधी नाही, वन संज्ञाप्रश्न ते सोडवू शकले नाहीत. विरोधी पक्षांना जे प्रश्न मांडायला हवेत, तेच प्रश्न मांडण्याची वेळ सत्तेतील आमदारांवर आली. आरोग्याचा प्रश्न अधांतरीच राहिला असून, जिल्ह्यातील आंबा नुकसान भरपाईचीही दाखल या अधिवेशनात घेण्यात आली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री कोटीच्या विकासाच्या घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात त्या योजना अधिकारी वर्गाला माहीतच नसतात. त्यामुळे जनतेची फसवणूक केली जात आहे. (प्रतिनिधी)कोकणातील जनतेचा भ्रमनिरासकाँग्रेसने जिल्ह्याचे वाटोळे केले. त्यानंतर सत्तेत एकत्र आलेले शिवसेना-भाजप एकमेकांच्या विरोधात शत-प्रतिशत सांगत असून, दुसरीकडे जनतेचा भ्रमनिरास करत आहेत. काँग्रेसला धुडकावून कोकणातील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, त्यांनीच कोकणातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्याचे काम केले आहे, असा आरोपही उपरकर यांनी केला आहे.