शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनावर पालकमंत्र्यांचा वचक नाही

By admin | Updated: March 14, 2017 22:57 IST

नीतेश राणेंचा आरोप : बांदा येथील माकडतापग्रस्त भागाची भेट, वैभव नाईक यांच्याकडूनही पाहणी

बांदा : गतवर्षी दोडामार्ग आणि आता बांदा परिसरात माकडतापाने थैमान घातले असून यावर ठोस उपाययोजना करण्याचे सोडून पालकमंत्री दीपक केसरकर हे आढावा बैठका कसल्या घेतात? माणसे मरत असताना त्यांना मदत करायची सोडून कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनावर पालकमंत्र्यांचा वचकच नसल्याची टिका आमदार नीतेश राणे यांनी बांदा येथे केली. पालकत्व म्हणजे काय असते हे पालकमंत्र्यांना माहितीच नसल्याने त्यांनी ते प्रमोद कामत यांच्याकडून शिकावे असा टोलाही राणे यांनी लगाविला.बांदा येथे माकडतापाने थैमान घातले असून आतापर्यंत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जोखीमग्रस्त भागातील २ जणांचा तापसरीने मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत माकडतापाने बाधित रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यशासन, पालकमंत्री दीपक केसरकर व प्रशासनावर रोष व्यक्त केला. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, वेंगुर्ले काँग्रेस तालुकाध्यक्ष मनिष दळवी, बांदा विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, शहर अध्यक्ष जावेद खतीब, संदेश भोगले, गजानन गायतोंडे, प्रविण देसाई, मधुकर देसाई, गुरुनाथ सावंत, अक्रम खान, नाना सावंत, उदय धुरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होेते. आमदार नीतेश राणे म्हणाले, यापूर्वी जिल्हयात मृत माकडे आढळली नव्हती. गोवा व कर्नाटक राज्यातील मृत झालेली व मरणासन्न स्थितीत असलेली माकडे ही आपल्या सीमावर्ती भागात आणून सोडल्याने या रोगाचा फैलाव झाला आहे, याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे. मात्र ती जिल्हयाच्या प्रशासनाकडे, वनविभागाकडे किंवा पालकमंत्र्यांकडे कशी नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले. (प्रतिनिधी)मृतांना नुकसान भरपाईसाठी प्रयत्न : नाईकमाकडताप साथीच्या पार्श्वभूमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आरोग्य खात्याकडून आढावा घेत हलगर्जीपणा न करण्याबाबत आरोग्य व वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. येत्या अधिवेशनात माकडतापाने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले. यावेळी डॉ. जगदीश पाटील यांनी आमदार नाईक यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपतालुकाप्रमुख भैय्या गोवेकर, भाऊ वाळके, अर्चना पांगम, सुशांत पांगम, मगो सावंत, राकेश वाळके, पांडुरंग नाटेकर, उल्हास परब आदि उपस्थित होते.