शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बागायतदार कर्जमाफीवर ठाम

By admin | Updated: June 29, 2015 00:27 IST

आग्रही मागणी : सध्याचे ‘भरपाई वितरण’ स्थगित करा

रत्नागिरी : संपलेल्या हापूस हंगामात बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा पिकासाठी घेतलेले कर्ज शासनाने शंभर टक्के माफ करावे, या मागणीवर बागायतदार ठाम आहेत. बॅँकांकडून घेतलेल्या ३०० कोटींच्या कर्जफेडीसाठी मिळालेल्या ३१ जुलैपर्यंतच्या वाढीव मुदतीत कर्जमाफीसाठी आंबा बागायतदार आग्रही राहतील, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव मंदार सरपोतदार यांनी पत्रकारपरिषदेत दिली. रविवारी दुपारी ३ वाजता झालेल्या या पत्रकारपरिषदेला संस्थेचे खजिनदार तु. सो. घवाळी, तात्या अभ्यंकर, सदस्य सुरेंद्र देवळेकर, सुहास मुळ्ये, प्रसन्न पेठे, प्रकाश साळवी, दत्ताराम तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे पदाधिकारी, उत्पादक यांची शुक्रवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या समवेत बैठक झाली होती. त्यात संस्थेने केलेल्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. ३० जूनपर्यंत कर्जफेड करावयाची होती. परंतु मोठे नुकसान झाल्याने इतक्या लवकर ही कर्जफेड कशी करणार, असा सवाल करीत वाढीव मुदतीची मागणी संस्थेने केली होती. त्यामुळेच ३१ जुलै २०१५ पर्यंत ही वाढीव मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे बाधित शेतकरी यादीत आहेत व ज्यांना कर्ज फेडणे शक्य नाही, त्यांच्या सध्याच्या कर्जाला पाच वर्षांपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. तसेच सध्याच्या कर्जाएवढेच नवीन कर्ज लगेच वितरित केले जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.ज्यांची नावे बाधित यादीत नाहीत त्यांना सुचविल्याप्रमाणे आवश्यक निकष लागू करण्याचे अधिकार संबंधित बॅँकांना देण्यात येणार असून त्याबाबत जिल्हा लिड बॅँक कमिटीमध्ये शिफारस करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बॅँकांनी बाधित शेतकऱ्यांच्यामागे लागू नये, असे सक्त निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नुकसान भरपाई म्हणून कर्जमाफीची आमची मागणी कायम असून ती मान्य होईपर्यंत सध्याची नुकसानभरपाई वितरीत करण्याची प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कर्जफेडीबाबत बॅँकांकडून त्रास झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टोल फ्री नंबरवर संबंधितांनी संपर्क साधावा, असेही या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी संस्थेच्या रॉकेलच्या मागणीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करून आंबा उत्पादक व मच्छिमार यांना सवलतीच्या दरात केंद्र शासनाच्या मदतीने रॉकेल पुरवठा करण्यात येईल, असे जाहीर केल्याबद्दल सरपोतदार यांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)बागायतदारांचा आग्रह...कोकणवर अन्यायच...गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात राज्याच्या अन्य प्रांतात नैसर्गिक आपत्तीत शेती, द्राक्ष, फळांचे नुकसान झाल्याने अनेकवेळा भरीव नुकसान भरपाई देण्यात आली. कोकणात मोठे नुकसान होऊनही फारशी नुकसान भरपाई मिळाली नाही. यावेळी आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात भाजपप्रणित सरकार आहे. त्यामुळे शासनाने आंबा बागायतदारांना कर्जमाफी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मतही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.