शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विकासाला उदासिनतेची कुंपणे...

By admin | Updated: October 2, 2014 22:24 IST

प्रश्न राजापूरचा : फाटकी झोळी ठरतेय बाधक

पाचल : राजापूर तालुक्याचा कायापालट करणारे अनेक अतिमहत्त्वाचे प्रकल्प राजापूर तालुक्यात येऊनसुध्दा नियोजनाचा अभाव, तोकडी अभ्यासूवृत्ती, विचारांचा अभाव, राजकीय स्वार्थ या सर्व बाबींमुळे देणाऱ्याने देऊनसुध्दा घेणाऱ्यांची फाटकी झोळी राजापूरच्या विकासाला बाधक ठरली आहे.राजापूर तालुका एका बाजूला डोंगराळ, तर दुसऱ्या बाजूला सागराच्या पाण्याशी जोडलेला तालुका स्वातंत्र्यानंंतरही म्हणावा तसा विकसित झालेला नाही. कोकणचा कायापालट करणाऱ्या कोकण रेल्वेचे राजापूर रेल्वेस्टेशनवगळता दुसरे रेल्वे स्टेशन नाही. वादग्रस्त अणुऊर्जा प्रकल्प, मोठ्या कष्टाने उभे राहिलेले अर्जुना धरण, पूर्णावस्थेत असलेले त्याचे कालवे, ग्रामीण रूग्णालय असणारे अपुरे कर्मचारी - अधिकारी, रखडलेला जामदा प्रकल्प, संधी असूनही वाढलेली बेरोजगारी, आंबा-काजू बागायतदार, मुंबई-गोवा महामार्ग अशा अनेक मुद्द्यांकडे कोणाचेच लक्ष नसल्याने विकास अजूनही रखडलेलाच आहे.एका बाजूला डोंगराळ भागाकडे झुकलेल्या राजापूर तालुक्यात सुमारे ६०० कोटींचे अर्जुना धरण आहे. त्याचे डावा-उजवा असे दोन्ही कालवे स्थानिक जनतेची तहान तसेच त्यांची आर्थिक उन्नती करू शकतात. मात्र. राजकीय उदासिनतेमुळे सुरु होवूनसुध्दा त्याचे काम प्रगतीपथावर नाही.पाचल पूर्व भागातील जामदा खोऱ्यातील जामदा प्रकल्प राजकीय अनास्थेमुळे पूर्वपदावर येऊ शकला नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून, काही मृतावस्थेत आहेत. राजापूर तालुक्याचे पूर्व पश्चिम विभाग करणारा मुंबई-गोवा महामार्ग आजही लुळ्या पांगळ्यागत झाला आहे. महत्त्वाचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. यासाठी उपाययोजना राबवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उदासिन प्रशासन, स्वार्थी लोकप्रतिनिधी, अल्पसंतुष्ट कार्यकर्ते आणि आहे त्यावर समाधान मानणारी जनता यामुळे विकास खुंटला आहे. स्वातंत्र्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक गैरसोयी दूर झालेल्या नाहीत. विविध प्रकल्पांवर केवळ चर्चा होत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य या प्रश्नांसोबत काही विकासाभिमुख कार्यक्रम तालुक्यात राबविल्यास त्यातून चांगले निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)अनेक प्रकल्प येवूनही विकासाची दारे बंदचस्वातंत्र्यानंतर राजापुरची स्थिती जैसे थेबेरोजगाराची प्रश्न तसाचृषी विकासाला चालना हवीराजकीय अनास्था ठरतेय विकासाला बाधकग्रामीण रूग्णालयाचा प्रशन्ही तसाच