शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

विकासाला उदासिनतेची कुंपणे...

By admin | Updated: October 2, 2014 22:24 IST

प्रश्न राजापूरचा : फाटकी झोळी ठरतेय बाधक

पाचल : राजापूर तालुक्याचा कायापालट करणारे अनेक अतिमहत्त्वाचे प्रकल्प राजापूर तालुक्यात येऊनसुध्दा नियोजनाचा अभाव, तोकडी अभ्यासूवृत्ती, विचारांचा अभाव, राजकीय स्वार्थ या सर्व बाबींमुळे देणाऱ्याने देऊनसुध्दा घेणाऱ्यांची फाटकी झोळी राजापूरच्या विकासाला बाधक ठरली आहे.राजापूर तालुका एका बाजूला डोंगराळ, तर दुसऱ्या बाजूला सागराच्या पाण्याशी जोडलेला तालुका स्वातंत्र्यानंंतरही म्हणावा तसा विकसित झालेला नाही. कोकणचा कायापालट करणाऱ्या कोकण रेल्वेचे राजापूर रेल्वेस्टेशनवगळता दुसरे रेल्वे स्टेशन नाही. वादग्रस्त अणुऊर्जा प्रकल्प, मोठ्या कष्टाने उभे राहिलेले अर्जुना धरण, पूर्णावस्थेत असलेले त्याचे कालवे, ग्रामीण रूग्णालय असणारे अपुरे कर्मचारी - अधिकारी, रखडलेला जामदा प्रकल्प, संधी असूनही वाढलेली बेरोजगारी, आंबा-काजू बागायतदार, मुंबई-गोवा महामार्ग अशा अनेक मुद्द्यांकडे कोणाचेच लक्ष नसल्याने विकास अजूनही रखडलेलाच आहे.एका बाजूला डोंगराळ भागाकडे झुकलेल्या राजापूर तालुक्यात सुमारे ६०० कोटींचे अर्जुना धरण आहे. त्याचे डावा-उजवा असे दोन्ही कालवे स्थानिक जनतेची तहान तसेच त्यांची आर्थिक उन्नती करू शकतात. मात्र. राजकीय उदासिनतेमुळे सुरु होवूनसुध्दा त्याचे काम प्रगतीपथावर नाही.पाचल पूर्व भागातील जामदा खोऱ्यातील जामदा प्रकल्प राजकीय अनास्थेमुळे पूर्वपदावर येऊ शकला नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून, काही मृतावस्थेत आहेत. राजापूर तालुक्याचे पूर्व पश्चिम विभाग करणारा मुंबई-गोवा महामार्ग आजही लुळ्या पांगळ्यागत झाला आहे. महत्त्वाचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. यासाठी उपाययोजना राबवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उदासिन प्रशासन, स्वार्थी लोकप्रतिनिधी, अल्पसंतुष्ट कार्यकर्ते आणि आहे त्यावर समाधान मानणारी जनता यामुळे विकास खुंटला आहे. स्वातंत्र्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक गैरसोयी दूर झालेल्या नाहीत. विविध प्रकल्पांवर केवळ चर्चा होत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य या प्रश्नांसोबत काही विकासाभिमुख कार्यक्रम तालुक्यात राबविल्यास त्यातून चांगले निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)अनेक प्रकल्प येवूनही विकासाची दारे बंदचस्वातंत्र्यानंतर राजापुरची स्थिती जैसे थेबेरोजगाराची प्रश्न तसाचृषी विकासाला चालना हवीराजकीय अनास्था ठरतेय विकासाला बाधकग्रामीण रूग्णालयाचा प्रशन्ही तसाच