शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राजवाडीत सामूहिक प्रयत्नाने फुलला शेतीचा मळा

By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST

सिंचनाखाली जमिन : पुण्यातील संस्थेच्या देणगीवर उभा राहिला प्रकल्प...

मिलिंद चव्हाण - आरवली=संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील ग्रामस्थांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सामूहिक प्रयत्नातून बंधाऱ्यातील पाणी दीड किलोमीटर अंतरावर आणून शेतीचा प्रयोग केला आहे. यासाठी येणारा सर्व खर्च पंधरा शेतकऱ्यांनी निधी संकलन करुन आणि पुण्यातील संस्थेच्या देणगीवर केला आहे. ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले असून, येथील १५ एकर जमिन सिंचनाखाली आली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संगमेश्वर पासून महामार्गाजवळ काही अंतरावर असणारे हे गाव, राजवाडीची गोधडी तर साता समुद्रापार गेली आहे. यासह कागदी पिशव्या, शेळीपालन सारख्या व्यवसायातून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करुन, येथील शेतकऱ्यांनी यापूर्वीच आदर्श घालून दिला. यासाठी विविध संस्था, स्थानिक ग्रामपंचायत आदींचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. भातशेती हे एकच उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेऊन कोकणातला शेतकरी राबत असतो. यात पालेभाज्या, फळे, कडधान्य इत्यादीच्या लागवडीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकते. ही गोष्ट आता येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येऊ लागली आहे. मात्र, यासाठी पाणी ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी राजवाडीचे सरपंच संतोष भडवलकर यांनी ‘पेम’ संस्थेचे सतीश कामत यांच्या सहकार्याने येथील शेतकऱ्यांना एकत्र केले. यांना सामूहिक शेतीसाठी प्रोत्साहित केले. ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. या गोष्टींना विरोध झाला. कालांतराने शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यात यश आले. गावातील जमिनमालकांना एकत्र आणून, त्यांची जमीन वापरण्याची परवानगी सामंजस्याने घेण्यात आली आणि येथील पंधरा शेतकऱ्यांनी हा विडा उचलला. या शेतकऱ्यांनी निधी संकलन केले. कामत यांच्या माध्यमातून पुण्यातील ‘बन्सुरी फाऊंडेशन’ या संस्थेने दीड लाखाची देणगी दिली. ग्रामस्थांनी प्रत्येकी सहा हजार रुपये काढून लाखभर रुपये जमा केले. एकात्मिक पाणलोट योजनेतून एक लाखाचा प्रस्ताव दिला. मात्र, आजही तो लाल फितीत अडकून पडला आहे. सरपंच संतोष भडवलकर यांनी एक लाखाची तूट भरुन काढत, साडेतीन लाखाची योजना अस्तित्त्वात आणली. गावाच्या एका बाजूला दीड किलोमीटर अंतरावर बाराही महिने पाणी असणारा बंधारा आहे. जिथे १५ अशा शक्तिचा पंच लाऊन जलवाहिनी टाकण्यात आली आणि पाणी उचलण्यात आले. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. पराग हळदणकर यांनी शेतकऱ्यांना पिकाविषयी माहिती दिली आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मुळा, लाल माठ, वांगी, चवळी, मिरची यांची लागवड करण्यात आली. काही दिवसातच शेतकऱ्यांना या पिकांचे उत्पन्न मिळू लागेल.