शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

ग्रामसेवकांनी कामाचा वेगळा ठसा निर्माण करावा

By admin | Updated: December 30, 2015 00:45 IST

संदेश सावंत : सिंधुदुर्गनगरीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण, २३ ग्रामसेवकांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ग्रामसेवकाकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामसेवकांनी आपुलकी निर्माण करत कामाचा वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी मंगळवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले. स्वच्छ भारत मिशन मार्गदर्शन कार्यशाळा व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शरद कृषी भवन येथे झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती , ग्रामसेवक, स्वच्छता करंडक वक्तृत्व स्पर्धा विजेते विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. तर ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमात संदेश सावंत यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचे अभिनंदन केले. ग्रामसेवकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही दिले. मात्र ग्रामसेवकांनी समोरच्याच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करावा व कार्याचा वेगळा ठसा उमटवावा असे आवाहन केले आहे. शेखर सिंह म्हणाले, ग्रामसेवकांनी जनतेशी नम्रतापूर्वक व्यवहार ठेवावेत. प्रशासनाची प्रतिष्ठाही ग्रामसेवकांवर अवलंबून आहे. त्यामुळे चुकून झालेल्या चुकीला निश्चित क्षमा असेल पण जाणून बुजून केलेल्या चुकीला क्षमा असणार नाही. असे स्पष्ट केले. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी ग्रामसेवक हा जनता व लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असल्याचे सांगितले तर सभापती चौगुले यांनी महिला ग्रामसेवकांनी पुरस्कारात ५० टक्के आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पुरस्कारप्राप्त ग्रामसेविका अपर्णा पाटील यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले की, या आशीर्वादामुळे आत्मविश्वास जबाबदारी वाढली आहे. चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र व वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या विजेत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कनिष्ठ गटात आलिशा जॅकी फेराव (प्रथम), सौंदर्या सोनू शेळके (द्वितीय), जागृती मोहन राणे (तृतीय), तर वरिष्ठ गटात अनुक्रमे समृद्धी श्रीकृष्ण पेडणेकर, पूजा संतोष पाटणकर, गितांजली गुरूनाथ पेडणेकर. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.दोन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेते राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. समृद्धी हिंने मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेसाठी कृतीशिलतेतून प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)२३ ग्रामसेवकांचा सत्कारसंदिप पाटील, मुकुंद परब, विलास केळूूसकर, अपर्णा पाटील, अरूण जाधव, दीपक तेंडूलकर, रतिलाल बहिराम, दीपक अमृतसागर, पंढरीनाथ पांढरे, संदिप गोसावी, आनंद परूळेकर, रघुनाथ भोगटे, चंदू रावले, मंगेश राणे, राजेंद्र भुर्के, विनोद हेरवाडे, जनार्दन खानोलकर, मंगल गवळी, विवेक वजराटकर, आदम शहा, दिनेश चव्हाण, गिरीष धुमाळे, संजय शेळके, गोकुळ कोकणी यांचा सत्कार करण्यात आला.