शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वन्य प्राण्यांच्या त्रासाकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 1, 2014 23:57 IST

शेतकऱ्यांमध्ये नाराजी

सावंतवाडी : वन्य प्राण्यांचा त्रास, लहरी पाऊस यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यात भातशेती जमीन पडीक राहिली आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. भातशेती क्षेत्र झपाट्याने घटत चालले असून शहरीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. मूलत: शेतकरी वर्गाचा तारणहार नसल्यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. काही शेतकरी शेती आणि झाडे विकून उदर निर्वाह करीत असल्याचे दिसून येत आहे. महिला बचतगट चळवळ वेगाने फोफावत असल्याने शेतमजुरी करण्यास कामगार मिळत नाहीत. कामगार मिळाले तर शेती, मजुरी याचा ताळमेळ बसत नाही. उत्पादनापेक्षा मजुरीला जास्त खर्च करावा लागत असल्याने जमिनी पडीक राहत असल्याचेही कारण सांगण्यात येत आहे. या हंगामात उशिराने पाऊस सुरू झाल्याने तसेच मजूर आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली शेती पडीक ठेवली आहे. त्यामुळे लाकडे तोडणारे आणि जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या दलालांनी जमीन किंवा झाडे विकण्याचा तगादा लावत असल्याचे समोर येत आहे. या आणि अन्य कारणांमुळे शेतकरीवर्ग चहुबाजूंनी संकटात येत असल्याचे दिसून येत असून याचाच फायदा दलाल घेत असल्याचे बोलले जात आहे. संकटांच्या या खाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)