शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जिल्ह्याचा १४३ कोटींचा आराखडा शासनाकडे

By admin | Updated: March 7, 2017 22:43 IST

वार्षिक योजना : वाढीव निधीसाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी

शोभना कांबळे--रत्नागिरी  सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०१७ - १८ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह््यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कमाल वित्तीय मर्यादेनुसार १४३ कोटी ६८ लाख रूपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी २५ ते ३० कोटींचा निधी वाढवून मिळावा, यासाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी केली असून, त्याला सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह््याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे उपस्थित होते. गाभा क्षेत्र, बिगर गाभा क्षेत्र आणि नाविन्यपूर्ण योजना व डाटा एंट्री अशा तीन क्षेत्रांसाठी रत्नागिरी जिल्ह््यासाठी १४३ कोटी ६८ लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. गाभा क्षेत्र २/३ तर बिगर गाभा क्षेत्र १/३ आहे. गाभा आणि बिगर गाभा क्षेत्रासाठी एकूण निधीच्या ९५ टक्के इतक्या खर्चाची तरतूद आहे तर नाविन्यपूर्ण योजना व डाटा एंट्रीसाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. गाभा क्षेत्रात कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास, सामाजिक व सामुहिक सेवा, पाटबंधारे या चार क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी प्रस्तावित तरतूद ९७ कोटी १४ लाख रूपये इतकी करण्यात आली आहे. बिगर गाभा क्षेत्रात विद्युत विकास, ग्रामीण व लघुउद्योग, परिवहन व वाहतूक, रस्ते विकास, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा अशा सहा क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी एकूण ३९ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण योजना आणि डाटा एंट्रीसाठी ७ कोटी १८ लाख रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह््यासाठी १४३ कोटी ६८ लाख रूपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असला, तरी जिल्ह््याची मागणी ५४७ कोटी ४६ लाख इतकी आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे हा निधी लवकर मिळण्याची आशा आहे. (प्रतिनिधी)दरवर्षी जिल्ह््यासाठी १५८ कोटींचा निधी आराखडा सादर केला जातो. जिल्ह््याच्या विकासाच्या दृष्टीने आणखी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे वित्त मंत्रालयाकडून २५ ते ३० कोटींचा निधी वाढवून मिळावा, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी वित्तमंत्र्यांकडे केली आहे. वित्तमंत्री केसरकर यांनीही याला सकारात्मकता दाखविल्याने हा निधी जिल्ह््याला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.मंत्रालयात बैठक : जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थितीएकूण गाभा क्षेत्रासाठी प्रस्तावित रक्कम९७ कोटी १५ लाख ६० हजारकृषी व संलग्न सेवा : ६ कोटी ४८ लाखग्रामीण विकास : ४८ कोटी २४ लाखसामाजिक व सामुहिक सेवा : ४२ कोटी १३ लाखपाटबंधारे : ३० लाख ४ विद्युत विकास : ३५ लाखग्रामीण व लघुउद्योग : ३५ लाखपरिवहन व वाहतूक : ३० लाखरस्ते विकास : १५ कोटीसामान्य आर्थिक सेवा : ७५ लाखबिगर गाभा क्षेत्रासाठी प्रस्तावित रक्कम : १३६ कोटी ५० लाखसामान्य सेवा : ७५ लाखएकूण नाविन्यपूर्ण व डाटा एंट्री : ७ कोटी १८ लाखएकूण जिल्हा वार्षिक योजना : १४३ कोटी ६८ लाख