शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा १४३ कोटींचा आराखडा शासनाकडे

By admin | Updated: March 7, 2017 22:43 IST

वार्षिक योजना : वाढीव निधीसाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी

शोभना कांबळे--रत्नागिरी  सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०१७ - १८ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह््यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कमाल वित्तीय मर्यादेनुसार १४३ कोटी ६८ लाख रूपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी २५ ते ३० कोटींचा निधी वाढवून मिळावा, यासाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी केली असून, त्याला सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह््याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे उपस्थित होते. गाभा क्षेत्र, बिगर गाभा क्षेत्र आणि नाविन्यपूर्ण योजना व डाटा एंट्री अशा तीन क्षेत्रांसाठी रत्नागिरी जिल्ह््यासाठी १४३ कोटी ६८ लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. गाभा क्षेत्र २/३ तर बिगर गाभा क्षेत्र १/३ आहे. गाभा आणि बिगर गाभा क्षेत्रासाठी एकूण निधीच्या ९५ टक्के इतक्या खर्चाची तरतूद आहे तर नाविन्यपूर्ण योजना व डाटा एंट्रीसाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. गाभा क्षेत्रात कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास, सामाजिक व सामुहिक सेवा, पाटबंधारे या चार क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी प्रस्तावित तरतूद ९७ कोटी १४ लाख रूपये इतकी करण्यात आली आहे. बिगर गाभा क्षेत्रात विद्युत विकास, ग्रामीण व लघुउद्योग, परिवहन व वाहतूक, रस्ते विकास, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा अशा सहा क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी एकूण ३९ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण योजना आणि डाटा एंट्रीसाठी ७ कोटी १८ लाख रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह््यासाठी १४३ कोटी ६८ लाख रूपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असला, तरी जिल्ह््याची मागणी ५४७ कोटी ४६ लाख इतकी आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे हा निधी लवकर मिळण्याची आशा आहे. (प्रतिनिधी)दरवर्षी जिल्ह््यासाठी १५८ कोटींचा निधी आराखडा सादर केला जातो. जिल्ह््याच्या विकासाच्या दृष्टीने आणखी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे वित्त मंत्रालयाकडून २५ ते ३० कोटींचा निधी वाढवून मिळावा, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी वित्तमंत्र्यांकडे केली आहे. वित्तमंत्री केसरकर यांनीही याला सकारात्मकता दाखविल्याने हा निधी जिल्ह््याला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.मंत्रालयात बैठक : जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थितीएकूण गाभा क्षेत्रासाठी प्रस्तावित रक्कम९७ कोटी १५ लाख ६० हजारकृषी व संलग्न सेवा : ६ कोटी ४८ लाखग्रामीण विकास : ४८ कोटी २४ लाखसामाजिक व सामुहिक सेवा : ४२ कोटी १३ लाखपाटबंधारे : ३० लाख ४ विद्युत विकास : ३५ लाखग्रामीण व लघुउद्योग : ३५ लाखपरिवहन व वाहतूक : ३० लाखरस्ते विकास : १५ कोटीसामान्य आर्थिक सेवा : ७५ लाखबिगर गाभा क्षेत्रासाठी प्रस्तावित रक्कम : १३६ कोटी ५० लाखसामान्य सेवा : ७५ लाखएकूण नाविन्यपूर्ण व डाटा एंट्री : ७ कोटी १८ लाखएकूण जिल्हा वार्षिक योजना : १४३ कोटी ६८ लाख