शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीतच चांगल्या कविता

By admin | Updated: February 19, 2015 23:50 IST

वीरधवल परब : वेंगुर्लेतील मराठी साहित्य संमेलनात सूर

वेंगुर्ले : कविता लेखन हा गंभीरपणे विचारात घेतला जाणारा वाङ्मय प्रकार आहे. प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या प्रकारच्या कवितांची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन कवी वीरधवल परब यांनी केले. यावेळी त्यांनी समकाळातील सामाजिक, राजकीय, वास्तवाचा आढावा घेतला. सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्लेतील पहिल्या मराठी साहित्य संमेलनातील कवितासत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या सत्रात उपस्थित कवींनी एकापेक्षा एक गंभीर आशयाच्या कविता सादर करून संमेलनाला वैचारिक पाठबळ मिळवून दिले. ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी ‘हाकेतून हद्दपार होत आहे आई’ ही कविता सादर करून आपल्या मातृभाषेसह बोलीभाषांचा समृद्ध वारसा जपण्यासाठी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘आपली नाळ ज्या गावात पुरली गेली, त्या मातीचे ऋण नाही फेडता आले आपल्याला अजून...’ अशी खंत त्यांनी आपल्या कवितेतून सादर केली. या कवी संमेलनात जिल्ह्यातील नामवंत कवयित्री उषा परब, डॉ. तरुजा भोसले, वैशाली पंडित यांनी स्त्रीवादी जाणिवेच्या कविता सादर करून आजच्या काळात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या उपेक्षेचे प्रत्ययकारी चित्र रसिकांसमोर उभे केले. उदयोन्मुख कवयित्री मधुरा आठलेकर यांनी माणसाच्या हसण्यामागील तऱ्हेतऱ्हेच्या कारणांचा आणि त्यायोगे होणाऱ्या गफलती आपल्या कवितेतून सादर केल्या. प्राजक्ता आपटे यांनी मानवीय जगण्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बहुजनवादी चळवळीतील वैचारिक गोंधळ व आत्मकेंद्रीपणाची वृत्ती वाढीस लागली असली, तरी खरा कार्यकर्ता असल्या भ्रामक चळवळींनी भुलणार नाही, अशी स्पष्टोक्ती मनीषा जाधव यांनी व्यक्त केली. मधुकर मातोंडकर यांनी माणसा-माणसांमधील तुटत चाललेल्या संवादावर भाष्य केले. ज्येष्ठ कवी लिलाधर घाडी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा संदर्भ देत मानवतेची भावना वैश्विक असण्याची गरज व्यक्त केली. गोविंद पायनाईक, मृण्मयी बांदेकर, स्नेहा राणे, अजित राऊळ, प्राजक्ता गवळी, सोनाली नाईक यांनीही कविता सादर केल्या. संमेलनाच्या शेवटी वीरधवल परब यांनी ‘बा देवा म्हाराजा गवळदेवा’ ही मालवणी बोलीभाषेतील कविता सादर केली. या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन विठ्ठल कदम, स्मिता राऊळ यांनी केले, तर आत्माराम सोकटे यांनी आभार मानले. (वार्ताहर) भोसले, नानिवडेकरांना रसिकांकडून वाहवा उषा परब यांनी आधुनिक काळातील जगण्याच्या भिन्न भिन्न पातळ्यांवरील स्पर्धांमुळे जी व्यामिश्रता व संवादाच्या पातळीवर तुटलेपणा आल्याचे सूचित केले. वैशाली पंडित यांनी आई-मुलांच्या नात्यातील जवळीक व निरपेक्षता आजच्या धकाधकीने संपवून टाकल्याची व्यथा आपल्या कवितेतून व्यक्त केली. डॉ. तरुजा भोसले व मधुसूदन नानिवडेकर यांनी आपल्या गझलांमधून उपस्थितांकडून चांगलीच वाहवा मिळविली. रघुवीर परब यांनी आपल्या कवितेतून रसिकांना आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यजाणिवेच्या प्रवाहाशी नेऊन भिडविले. कवी अरुण नाईक यांनी तळ फाटलेल्या ट्रंकेचे आत्मचरित्र कवितेतून सादर केले, तर विठ्ठल कदम यांनी हमरस्ता कवितेतून आजच्या सामाजिक व वैचारिक क्षेत्रातला गोंधळ व्यक्त केला. भोसले, नानिवडेकरांना रसिकांकडून वाहवा उषा परब यांनी आधुनिक काळातील जगण्याच्या भिन्न भिन्न पातळ्यांवरील स्पर्धांमुळे जी व्यामिश्रता व संवादाच्या पातळीवर तुटलेपणा आल्याचे सूचित केले. वैशाली पंडित यांनी आई-मुलांच्या नात्यातील जवळीक व निरपेक्षता आजच्या धकाधकीने संपवून टाकल्याची व्यथा आपल्या कवितेतून व्यक्त केली. डॉ. तरुजा भोसले व मधुसूदन नानिवडेकर यांनी आपल्या गझलांमधून उपस्थितांकडून चांगलीच वाहवा मिळविली. रघुवीर परब यांनी आपल्या कवितेतून रसिकांना आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यजाणिवेच्या प्रवाहाशी नेऊन भिडविले. कवी अरुण नाईक यांनी तळ फाटलेल्या ट्रंकेचे आत्मचरित्र कवितेतून सादर केले, तर विठ्ठल कदम यांनी हमरस्ता कवितेतून आजच्या सामाजिक व वैचारिक क्षेत्रातला गोंधळ व्यक्त केला.