शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

जमिनींच्या किंमतीला सोन्याचा भाव

By admin | Updated: June 22, 2014 01:42 IST

कौलारू घरांची जागा घेतली बिल्डिंगने: सर्वसामान्यांना घर घेणे आवाक्याबाहेर

रामचंद्र कुडाळकर / तळवडे सिंधुुदुर्ग जिल्ह्यात एकीकडे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत असताना जमिनींच्या किमतीही गगनाला भिडत आहे. परजिल्ह्यातील व्यावसायिक कंपन्या व व्यावसायिकांच्या आगमनाने गेल्या पाच वर्षात जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे. तसेच कौलारु घरांच्या जागी मोठमोठ्या बिल्डींग दिसू लागल्या आहेत. जमिनीचे वाढते दर व फ्लॅटचे दर याचा विचार करता जिल्ह्यातील सर्वसामान्य जमिनी देऊन श्रीमंत होत असला तरीही त्याच जमिनीवरील घर घेणे हे आवाक्याबाहेर गेल्याची स्थिती आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, निरवडे भागाचा विचार करता या ठिकाणी असणाऱ्या मोक्याच्या जागा परजिल्ह्यातील व्यावसायिकांनी विकत घेतल्याने स्थानिकांचे जमीनदारीतील वर्चस्व कमी झाले. जिल्ह्यातील रो हाऊस, बंगल्यांचे प्रमाण वाढले आहे. रो हाऊस, बंगले, फ्लॅट यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणे असंभव भासू लागले आहे. निरवडे परिसरातील विचार करता, ४० टक्के घरांची संख्या वाढली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रो हाऊस, बंगले, फ्लॅट यामध्ये राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते आहे. ग्रामपंचायतीच्या महसुलात, शासनाच्या करात वाढ झाल्याने ग्रामपंचायतीला याचा फायदा झाला. मळगाव-निरवडे परिसराची शहरीकरणाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. निरवडे गावात प्रतिगुंठा दर दीड लाखापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील जमिनीच्या दराचा विचार करणेही कठीण बनले आहे. सावंतवाडी रेल्वेस्थानक व झाराप-पत्रादेवी चारपदरी महामार्गामुळे या ठिकाणी बिल्डरची संख्या वाढली आहे. परिसरातील बहुतांशी जमिनी उद्योगपतींनी घेतल्या आहेत. जमिनीचे योग्य भाव येत असल्याने शेतकऱ्यांनी या जमिनी उद्योगपतींना विकल्या आहेत. या ठिकाणी मोठे उद्योग येऊन स्थानिकांनाही रोजगार मिळेल, अशीही आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे नोकरी ग्रामीण भागात आणि वास्तव्य शहरात, अशी एक नवीनच पद्धत सुरू होत आहे. मुंबई सारख्या शहरात नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांना निसर्गरम्य, शांत परिसरात घर असावे, अशी इच्छा असते. अशा प्रकारचे पर्यटन, निसर्गरम्य, आरोग्यमय परिसर सावंतवाडी परिसरात असल्याने येथे बंगल्यांची कामे सुरू आहेत. मोठमोठ्या शहरातील श्रीमंत लोक हे बंगले खरेदी करतात. त्यामुळे याठिकाणी बांधकाम व्यवसायाला अनुकूल असेच वातावरण आहे. येथील सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेऊन सिक्युरिटीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.