शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनींच्या किंमतीला सोन्याचा भाव

By admin | Updated: June 22, 2014 01:42 IST

कौलारू घरांची जागा घेतली बिल्डिंगने: सर्वसामान्यांना घर घेणे आवाक्याबाहेर

रामचंद्र कुडाळकर / तळवडे सिंधुुदुर्ग जिल्ह्यात एकीकडे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत असताना जमिनींच्या किमतीही गगनाला भिडत आहे. परजिल्ह्यातील व्यावसायिक कंपन्या व व्यावसायिकांच्या आगमनाने गेल्या पाच वर्षात जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे. तसेच कौलारु घरांच्या जागी मोठमोठ्या बिल्डींग दिसू लागल्या आहेत. जमिनीचे वाढते दर व फ्लॅटचे दर याचा विचार करता जिल्ह्यातील सर्वसामान्य जमिनी देऊन श्रीमंत होत असला तरीही त्याच जमिनीवरील घर घेणे हे आवाक्याबाहेर गेल्याची स्थिती आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, निरवडे भागाचा विचार करता या ठिकाणी असणाऱ्या मोक्याच्या जागा परजिल्ह्यातील व्यावसायिकांनी विकत घेतल्याने स्थानिकांचे जमीनदारीतील वर्चस्व कमी झाले. जिल्ह्यातील रो हाऊस, बंगल्यांचे प्रमाण वाढले आहे. रो हाऊस, बंगले, फ्लॅट यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणे असंभव भासू लागले आहे. निरवडे परिसरातील विचार करता, ४० टक्के घरांची संख्या वाढली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रो हाऊस, बंगले, फ्लॅट यामध्ये राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते आहे. ग्रामपंचायतीच्या महसुलात, शासनाच्या करात वाढ झाल्याने ग्रामपंचायतीला याचा फायदा झाला. मळगाव-निरवडे परिसराची शहरीकरणाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. निरवडे गावात प्रतिगुंठा दर दीड लाखापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील जमिनीच्या दराचा विचार करणेही कठीण बनले आहे. सावंतवाडी रेल्वेस्थानक व झाराप-पत्रादेवी चारपदरी महामार्गामुळे या ठिकाणी बिल्डरची संख्या वाढली आहे. परिसरातील बहुतांशी जमिनी उद्योगपतींनी घेतल्या आहेत. जमिनीचे योग्य भाव येत असल्याने शेतकऱ्यांनी या जमिनी उद्योगपतींना विकल्या आहेत. या ठिकाणी मोठे उद्योग येऊन स्थानिकांनाही रोजगार मिळेल, अशीही आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे नोकरी ग्रामीण भागात आणि वास्तव्य शहरात, अशी एक नवीनच पद्धत सुरू होत आहे. मुंबई सारख्या शहरात नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांना निसर्गरम्य, शांत परिसरात घर असावे, अशी इच्छा असते. अशा प्रकारचे पर्यटन, निसर्गरम्य, आरोग्यमय परिसर सावंतवाडी परिसरात असल्याने येथे बंगल्यांची कामे सुरू आहेत. मोठमोठ्या शहरातील श्रीमंत लोक हे बंगले खरेदी करतात. त्यामुळे याठिकाणी बांधकाम व्यवसायाला अनुकूल असेच वातावरण आहे. येथील सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेऊन सिक्युरिटीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.