शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

गोळवण-कुमामे-डिकवल ग्रुप ग्रामपंचायत प्रथम

By admin | Updated: February 11, 2016 00:33 IST

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान

सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारने सुरू केलेल्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात कोकण विभागात मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे-डिकवल या ग्रुप ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ही ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.केंद्र सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरूकेले आहे. या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शासन निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच अभिनव योजना याची माहिती आॅनलाईन पद्धतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव स्वरूपात पाठविण्यात आली होती. कोकण विभागातून सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरल्या आहेत.या स्पर्धेत सिंधुदुर्गातील गोळवण या ग्रामपंचायतीने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवीत कोकणात अव्वल क्रमांक पटकावला आहे. या ग्रामपंचायतीचे वैशिष्ट म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजनेचा व अभियानाचा प्रारंभ या गावातून केला जातो. त्यामुळे प्रत्येक योजना, अभियान यशस्वी करणारी ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात या ग्रामपंचायतीने ओळख निर्माण केली आहे. गौरव ग्रामसभा स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, तंटामुक्त व निर्मलग्राम पुरस्कार या ग्रामपंचायतीने आधीच प्राप्त केला आहे. शासनाने निर्मलग्राम अभियान रद्द करून नव्याने सुरू केलेल्या हागणदारीमुक्त टप्पा दोनमध्येही या ग्रामपंचायतीने यश प्राप्त केले आहे. पर्यावरण विकासरत्न पुरस्कारप्राप्त असणाऱ्या या ग्रामपंचायतीने जागतिक बँकेच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य प्रकल्प व केंद्राच्या हरियाली प्रकल्पामध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. या यशाबद्दल विद्यमान सरपंच प्रज्ञा चव्हाण, तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच सुभाष लाड, ग्रामसेवक बी. एम. बालम तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन होत आहे. राज्यातून एकूण १५ ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यात गोळवण ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींचे मूल्यांकन भोपाळ राज्यस्तरीय समिती करणार आहे. (प्रतिनिधी)