शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

लाठीचार्जविरुद्ध न्यायालयात जाणार

By admin | Updated: March 7, 2016 00:40 IST

नारायण राणे : ‘कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्यास थेट मला फोन करा’

कुडाळ : गौण खनिज व्यावसायिक वाहतूकदार यांच्याकडे पोलीस किंवा महसूल विभागातील कोणीही कर्मचाऱ्याने पैशाची मागणी केल्यास त्याची माहिती मला फोनवरून द्या असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत करून येथे सुरु असलेल्या डंपर चालक-मालक आंदोलनाची भूमिका सोमवारी जाहीर करणार असून लाठीचार्ज ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने झाला त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे गौण खनिज व्यावसायिक व डंपरचालक-मालक संघटना व्यावसायिक यांचा मेळावा घेतला व या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शासनाच्या कार्यप्रणालीवर व सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर जाहीर टीका केली.यावेळी बोलताना राणे म्हणाले, येथे सुरु असलेले आंदोलन हे जिल्ह्यातील प्रशासनाने व जिल्हाधिकारी यांनी स्वत:च्या जाचक अटी घालून येथील गौण खनिज व्यावसायिकांना अडचणीत आणले आहे. येथील पोलीसच ४ ते ५ ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून पैसे घेतात. हे चुकीचे आहे.येथील आंदोलकांनी दगड घेऊन काचा फोडल्या नाहीत तर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संगनमताने लाठीचार्ज केला व या पोलिसांच्या लाठीचार्जात मोठ्या प्रमाणात काचा फोडण्यात आल्या, असेही राणे यांनी सांगितले.तसेच लोकप्रतिनिधी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी भेट घेणे गरजेचे असते. मात्र, ते केबिनला लॉक करून केबिनमध्ये बसले होते. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचे सांगितले आहे. हे कितपत योग्य आहे हे समजत नाही व ते चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे : राणेगौण खनिज वाहतुकीच्या प्रश्नाबाबत मी स्वत: मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांशी बोललो असून त्यांनी याबाबत तोडगा काढल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शासन आदेशात आवश्यक बदल करण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.आमदारांनी पळ काढला : राणेलाठीचार्जनंतर येथील सत्ताधारी आमदार व माजी आमदार यांनी पळ काढला व मुख्यमंत्र्यांकडे जावून फक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबतही राणे यांनी खिल्ली उडविली.हे सरकार फसवे आहेयेथील पालकमंत्री पळपुटा आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना वास्तव काय आहे ते माहिती नाही तसेच हे सरकार फसवे असून सर्वसामान्यांसाठी व कोकणी माणसांसाठी नाही. बेबंदशाहीचे सरकार आहे असेही ते म्हणाले.सोमवारपासून येथील सुरु असलेले दारुधंदे, जुगार व्यवसाय बाहेर काढून तेथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पाप असा बॅनर लावणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, व्हिक्टर डान्टस, सुरेश दळवी, संदीप कुडतरकर, रणजित देसाई, अबीद नाईक, अशोक सावंत आदी उपस्थित होते.